(नंदुरबार) मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत नंदादीप गाव, न्याहली (ता. नंदुरबार) येथे झालेल्या विविध विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज केली. ग्रामीण भागातील शाश्वत विकास, जलसंवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले.
वैयक्तिक सिंचन विहीर बांधकाम
जलतारा आणि शोषखड्डा विकास
फळबाग लागवड प्रकल्प
धान्य साठवण गोडाऊन निर्मिती
अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, कंपाउंड व स्वयंपाकगृह उभारणी
अंगणवाडी परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली
जिल्हाधिकारी यांनी न्याहली येथील महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले.
डॉ. सेठी यांनी गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, तसेच सौरऊर्जेचा शंभर टक्के वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. स्वच्छ, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक गाव उभारण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
या भेटीदरम्यान तहसीलदार प्रदीप पवार, कृषी विभाग अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील स्वावलंबन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकास यांना नवे बळ मिळत आहे.
#Nandurbar#MahatmaGandhiNREGA#DrMitaliSethi#SustainableDevelopment#RuralEmpowerment#WomenEmpowerment#WaterConservation#CleanVillage#SolarVillage#RainWaterHarvesting#SmartVillage#NandurbarDistrict#GovernmentOfMaharashtra
