
पारितोषिकाचे वितरण सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील सोहळ्यात करण्यात आले.राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी झिरोब्युरोक्रसी ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने स्टार्टअप प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक विभागाने स्वतःकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिले पाहिजे. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते.