
(नंदुरबार) येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीला जिल्ह्यात प्रभावी गती देण्यासाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे नेतृत्व आत्मा प्रकल्पाचे संचालक श्री. दीपक पटेल यांनी केले. त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी क्षेत्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या प्रबोधन कार्यक्रम, ओरिएंटेशन प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्र (KVK) स्तरावरील शेतकरी प्रशिक्षण, ब्लॉक रिसोर्स सेंटर (BRC) पातळीवरील नियोजन अशा विविध घटकांवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय मिशनच्या यशासाठी कालबद्ध नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत कृषी सखी या स्थानिक महिला स्वयंसेवकांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. त्यांच्या साहाय्याने नैसर्गिक शेतीविषयक जनजागृती, प्रशिक्षण व सल्लागार प्रणालीला गती मिळवता येईल, यावर भर देण्यात आला.
या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी, कार्यालयीन कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तसेच गट तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मा कार्यालयातील श्री. देवरे (BTM) व श्री. साळवे (CP) यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही कार्यशाळा नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरण स्नेही, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवणारी, व शेतीस शाश्वतता मिळवून देणारी दिशा स्पष्ट करणारी ठरली.
#नैसर्गिकशेती#ATMA#NandurbarAgriculture#कृषिसखी#शाश्वतशेती#DeepakPatel#BTM#NaturalFarmingMission#KVKTraining#FarmerEmpowerment#NandurbarNews