
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, चित्रपट अभिनेता प्रसाद ओक, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तन, भक्ती आणि ग्रामसेवेच्या माध्यमातून समाजाला समाधानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या ‘ग्रामगीता’मधून ग्रामविकास, आध्यात्मिक उन्नती आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संदेश दिला गेला आहे. आज जग विकासाचे खरे मॉडेल शोधत असताना राष्ट्रसंतांनी दिलेला ग्रामविकासाचा मार्ग अत्यंत पायाभूत आणि वास्तववादी असल्याचेही ॲड. शेलार यांनी सांगितले.