1. बालविवाह म्हणजे काय?
जर लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला ‘बालविवाह’ मानले जाते. असा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
2. कायद्यानुसार शिक्षेच्या तरतुदी
पुरुषासाठी शिक्षा:18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवयीन मुलीशी लग्न केल्यास, त्याला 2 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो.
विवाह लावणाऱ्यांसाठी शिक्षा: जो कोणी बालविवाह घडवेल, पार पाडेल किंवा त्याला प्रोत्साहन देईल (उदा. आई-वडील, नातेवाईक, भटजी, वाजंत्रीवाले इत्यादी), त्यांनाही 2 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो.
3. बालविवाहाचे दुष्परिणाम
कमी वयात लग्न झाल्यामुळे मुलींचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला नसतो.
कमी वयात मातृत्व आल्याने मातामृत्यू किंवा अर्भक मृत्यूचा धोका वाढतो. तसेच कुपोषणाची समस्या निर्माण होते.
4. तक्रार कोठे करावी?
चाइल्डलाईन (CHILDLINE):कोणत्याही बालविवाहाची माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी 1098 या टोल-फ्री क्रमांकावर फोन करा. हा नंबर 24 तास उपलब्ध असतो.
याशिवाय तुम्ही पोलिस स्टेशन 112, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधू शकता.
थोडक्यात संदेश:
खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असताना मुला-मुलींचे लग्न लावणे हा गुन्हा आहे. आपण सर्वांनी मिळून बालविवाह थांबवला पाहिजे.
संपर्क:
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नंदुरबार
पत्ता: मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, खोली क्रमांक 226, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकनलाव रोड, नंदुरबार
#बालविवाहबंद#StopChildMarriage#SaveGirlChild#BetiBachao#LetGirlsLearn#ChildRights#WomenEmpowerment#EndChildMarriage#SpreadAwareness#BeTheChange
