भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नवकल्पनांच्या माध्यमातून पुढे यावे व विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन राज्यपाल श्री. देवव्रत यांनी युवकांना केले.
