Home टेक न्युज मंत्रालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या गाडीला ‘दे धक्का’; गृहविभागाच्या कारभाराचे उघडे पडले धिंडवडे,...

मंत्रालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या गाडीला ‘दे धक्का’; गृहविभागाच्या कारभाराचे उघडे पडले धिंडवडे, 8 ते 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी मारला धक्का | भंगार वाहनांच्या पुरवठ्यामुळे सुरक

1
Police vehicle 'shaken' in highly sensitive places like Mantralaya; Home Department's mismanagement exposed, 8 to 10 police personnel shook it | Surak due to supply of scrap vehicles

मुंबई(प्रतिनिधी):-राज्य कारभाराची मुख्य इमारत आणि अतिशय संवेदनशील परिसर मानल्या जाणाऱ्या ‘मंत्रालय’ क्षेत्रात आज दुपारी गृहविभागाची दैना उघड करणारा संतापजनक प्रकार घडला. सुरक्षेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणारी पोलिसांची एक मोठी ‘टेम्पो ट्रॅव्हल’ गाडी भर दुपारी मंत्रालयासमोरच बंद पडली. पूर्णपणे ‘डेड’ झालेली ही गाडी सुरू करण्यासाठी तब्बल 8 ते 10 पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः रस्त्यावर उतरून ‘दे धक्का’ करावा लागला. घटनेचा थरार आणि प्रत्यक्षदर्शींचे आश्चर्य आज दुपारी नेहमीप्रमाणे मंत्रालयाच्या आवारात गर्दी आणि व्हीआयपी हालचाली सुरू असताना, पोलीस खात्याची सदर टेम्पो ट्रॅव्हल गाडी अचानक जागेवरच बंद पडली. गाडी सुरू करण्यासाठी ड्रायव्हरने प्रयत्न केले, परंतु गाडी अत्यंत खराब अवस्थेत असल्याने सुरू झाली नाही. अखेर तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 8 ते 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येत गाडीला दोन वेळा मागे-पुढे करत जोरदार धक्का मारला. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनाच गाडी धकलताना पाहून परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि प्रसारमाध्यमांनी आश्चर्य व्यक्त केले.
उपस्थित होणारे गंभीर प्रश्न: अतिसंवेदनशील भागातील सुरक्षेचे काय? मंत्रालय हा राज्याचा सुरक्षा केंद्रबिंदू मानला जातो. अशा ठिकाणी आपत्कालीन प्रसंगी धावून जाण्यासाठी वाहने 24 तास सुस्थितीत असणे आवश्यक आहे. जर ऐनवेळी गाडी अशी बंद पडणार असेल, तर सुरक्षेची काय खात्री? पोलिसांचे काम नक्की काय?
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच जर गाड्यांना धक्के मारून घेण्याची वेळ येत असेल, तर कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती कर्तव्ये बजावायची?
ग्रामीण भागातील गाड्यांची अवस्था काय असेल?
मंत्रालयासारख्या व्हीआयपी आणि मुख्य ठिकाणी जर पोलीस खात्याकडून अशा भंगार आणि जुन्या गाड्या दिल्या जात असतील, तर सामान्य रस्त्यांवर आणि दूरवरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या गाड्यांची काय अवस्था असेल? अद्याप प्रशासकीय मौन! “मंत्रालयासारख्या ठिकाणी सुस्थितीतील वाहनांऐवजी अशी भंगार आणि जुनी वाहने का पुरवण्यात आली? या निष्काळजीपणाला कोण जबाबदार आहे?” याबाबत पोलीस प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. नागरिक व लोकप्रतिनिधींमधून तीव्र संताप
एकीकडे पोलीस दलाच्या आधुनिकतेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष कारभारात मात्र पोलिसांनाच गाड्यांना धक्के मारावे लागत आहेत, हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती (Maintenance) विभागाच्या कारभारावर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. गृहविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ जुनी वाहने बदलून सुस्थितीतील नवी वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.