
महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय देणे आणि विकासकामांना गती देणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी महसूल विभागाने अधिक संवेदनशीलता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाने कार्य करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा.विकास खारगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी महसूल अभिलेखांचे अद्ययावतीकरण, शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन, स्वामित्व योजना, आदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणे, हक्क अभिलेख, भूसंपादन, तक्रार निवारण व्यवस्था तसेच ई-कार्यालय प्रणालीच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी सर्व तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Nandurbar#RevenueDepartment#VikasKharge#DrMittaliSethi#GoodGovernance#TransparentAdministration#DigitalGovernance#LandRecords#SwamitvaYojana#CitizenCentricGovernance#MaharashtraGovernment#NandurbarDevelopment#JansamparkNandurbar