Home सरकारी योजना ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ द्वारे सर्व आदिवासी वाडे व पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार

‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ द्वारे सर्व आदिवासी वाडे व पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार

0
‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ द्वारे सर्व आदिवासी वाडे व पाडे मुख्य रस्त्यांना जोडणार
Bhagwan Birsa Munda Jod Raste Yojana

(मुंबई) राज्याच्या १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  हा प्रकल्प सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर ६८३८ कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. (tribal padas will be connected to main roads with ‘Bhagwan Birsa Munda Jod Raste Yojana’)

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना : आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडले जातील

आदिवासी गावे आणि पाड्यांमध्ये रस्त्यांअभावी अनेक दुर्देवी घटना घडतात.  या योजनेमुळे मुख्य रस्त्यांशी या वाड्यांचा सातत्याने संपर्क राहील. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन ‘भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना’ राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असेल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते बांधेल.

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना : आदिवासी जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होणार

त्यानुसार या योजनेंतर्गत सर्व आदिवासी वाडे/पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र /आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यास येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here