जनधन खात्यांनी 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. जनधन खात्यांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. यातली निम्मी खाती नारी शक्तीची असणं हे अधिक आनंददायी आहे असं त्यांनी म्हटले आहे. Nandurbar News
पत्र सूचना कार्यालयाने केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले; “हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यापैकी निम्मी खाती ही नारी शक्तीची असणे हे अत्यंत आनंददायी आहे. यातील निम्म्याहून अधिक खाती आपल्या नारी शक्तीची आहेत हे पाहून आनंद होतो. ग्रामीण आणि निम-शहरी भागात 67% खाती उघडण्यात आलीत, यातून आम्ही हे देखील सुनिश्चित करत आहोत की आर्थिक समावेशाचे फायदे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील.” ( Jan Dhan accountss crossed the 50 crore milestone: PM Narendra Modi )
गेल्या पाच वर्षात देशातील साडेतेरा कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले. भारत सरकारने गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक समावेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले आहे. मोठ्या संख्येने लोक आर्थिक सेवांपासून वंचित राहिल्यास ते आपल्या देशाच्या विकासाला बाधक ठरेल. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेची गरज होती जेणेकरून प्रत्येकजण त्यातून निर्माण होणाऱ्या फायद्यांचा आणि विकासाचा भाग बनू शकेल.
प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY), जगातील सर्वात मोठी आर्थिक समावेश योजना, पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून जाहीर केली होती, जी 28 ऑगस्ट 2014 रोजी देशभरात सुरू झाली होती. योजनेच्या शुभारंभाच्या वेळी, माननीय पंतप्रधानांनी या दुष्टचक्रापासून मुक्तीचा उत्सव म्हणून गरिबांना साजरे करण्याची संधी असे वर्णन केले.
प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) हे आर्थिक समावेशनासाठी एक राष्ट्रीय मिशन आहे ज्याचा उद्देश बँकिंग/बचत, ठेव खाते, प्रेषण, क्रेडिट, विमा, पेन्शन इत्यादीसारख्या वित्तीय सेवांमध्ये प्रभावी सार्वत्रिक प्रवेश आहे.