मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील मजुरांना सातत्याने काम उपलब्ध होणार असून, रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होणार आहे.
लवकरच हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येईल.
ज्या गावांतील लोक रोजगारासाठी स्थलांतर करतात, त्या गावांतच पुरेशी मनरेगा व इतर योजनेची कामे उपलब्ध करून दिली जातील.
तसेच, स्थलांतरित मजुरांची विशेषतः कुपोषित बालके व गरोदर माता यांची अंगणवाडीत नोंदणी करून त्यांचे ट्रॅकिंग करण्यात येईल. त्यामुळे ते जिथे कामावर असतील, तिथेही त्यांना आरोग्य व शासकीय सुविधा पुरवल्या जातील.
#मनरेगा#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#रोजगारहमी#ग्रामविकास#मागेलत्यालाकाम#MGNREGA#Nandurbar#DistrictAdministration#JobCard#RuralEmployment