
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधताना काढले. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा ४ हजार ३९९ दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल श्री.मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले.
‘विकास भी और विरासत भी’ या ध्येय वाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान मोदी यांनी विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/203568/