Home महाराष्ट्र स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !

स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !

Self-Enumeration Campaign: An important step in the development of the country!

आपल्या कार्याला जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या, ‘बीजमाता’ म्हणून परिचित असलेल्या पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांनी एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावत आपली ‘स्वगणना’ यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

त्यांनी मौजे पोपेरेवाडी (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे डिजिटल प्रणालीचा वापर करून आपली नोंदणी केली. एका तंत्रज्ञान-स्नेही आणि प्रगत भारताचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील योजना आणि विकासाच्या योग्य नियोजनासाठी प्रत्येक नागरिकाची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांचा आदर्श घेत आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची स्वगणना वेळेत पूर्ण करावी.

आपली नोंद, देशाचा विकास !

स्थळ : मौजे पोपेरेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.

#स्वगणना#SelfEnumeration#CensusOfIndia#PadmaShri#RahibaiPopere#SeedMother#Ahilyanagar#Maharashtra#DigitalIndia#राष्ट्रीयकर्तव्य#माझीनोंदमाझाविकास#MaharashtraGovt#MyGovMaharashtra

error: Content is protected !!
Exit mobile version