Home नंदुरबार जिल्हा मनरेगा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारणाचे भक्कम पावलं!

मनरेगा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारणाचे भक्कम पावलं!

Strong steps for water conservation in Nandurbar district under MGNREGA!

नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात, गावागावात सध्या गाळ काढणे, शेततळे निर्माण व अस्तरीकरण यांसारखी जलसंधारण कामे वेगात सुरू आहेत.

या उपक्रमांमुळे स्थानिक रोजगार निर्माण, जलसाठा वाढ, आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा साधली जात आहे.

प्रमुख कामे व ठिकाणे:

ग्रामपंचायत खर्डी बु., ता. तळोदा

– गाळ काढण्याचे सामूहिक श्रमदान

– जलप्रवाह सुधारणा, भूजल वाढ व मृदासंवर्धन

मौजे न्याहली, ता. तळोदा

– 2 बंधाऱ्यांतून गाळ काढण्याची कामे सुरू

– एकूण 179 मजुरांना रोजगार, सुमारे 4950 घन मीटर पाणी संचयाची क्षमता

– सिंचन विहिरींच्या पातळीत वाढ, बागायत क्षेत्र विस्तार

ग्रा. पं. भुजगाव, ता. धडगाव

– शेततळ्याचे अस्तरीकरणाचे काम

– शाश्वत सिंचनासाठी पाऊल

ग्रामपंचायत मांजरे, ता. नंदुरबार

– शेततळ्याचे नवीन काम सुरु

– शेतकऱ्यांसाठी पाणीसाठ्याचा नवा आधार

गाळ काढण्याचे फायदे (थोडक्यात):

1. पाण्याचा प्रवाह सुरळीत होतो

2. पूर नियंत्रणास मदत

3. जलसाठ्याची क्षमता वाढते

4. गाळ शेतीसाठी फायदेशीर

5. पाणीटंचाई कमी होते

6. मृदासंवर्धन होते

अक्राणी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर व नंदुरबार –

या सर्व तालुक्यांतून मनरेगा अंतर्गत जलसंधारण व मृदासंवर्धनाची कामे सुरू आहेत, ज्यामुळे समृद्ध शेती, रोजगाराची हमी आणि जलशक्तीची सुरक्षितता निर्माण होत आहे.

“पाणी आहे तिथं प्रगती आहे!”

#NandurbarWaterMission#MahatmaGandhiNREGA#Jalsandharan

#SustainableFarming#GramVikas#DistrictWorkInProgress#मनरेगा

#ShashwatPaniYojana#nandurbardevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version