
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे ६१ ,आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोपडा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७, वा तर दिक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे.