
नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाईसारख्या दीर्घकालीन समस्येवर स्थानिक लोकसहभाग आणि प्रभावी नियोजनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याच्या उद्देशाने “मिशन जलबंधू” ही चेतना जागृती कार्यशाळा धडगाव येथील श्रॉफ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ही कार्यशाळा अक्कलकुवा तालुक्यातील ५ व धडगाव तालुक्यातील २० गावे — अशा एकूण २५ गावांच्या लोकप्रतिनिधींना आणि ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना उद्देशून घेण्यात आली. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, पेसा मोबिलायझर यांचा समावेश होता.
पाण्याच्या टंचाईचे स्वरूप आणि तीव्रतेचे मूल्यांकन
स्थायी जलस्रोतांचे संरक्षण आणि व्यवस्थापन
ग्रामपंचायती, स्वयंसहायता गट आणि समुदायाची जबाबदारी
‘जलबंधू’ आणि ‘जलसखी’ यांची निवड आणि भूमिकेचे प्रशिक्षण
सरकारी योजनांचे समन्वयन (Convergence of schemes)
यशोगाथा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाययोजना
कार्यशाळेतील चर्चा बिंदू:
नंदुरबारच्या भूरचना व पर्जन्यमानाचे महत्त्व
स्थलांतर व टंचाईची कारणमीमांसा
‘बौधला पाडा’, ‘तीनसमाल’ इ. गावांतील स्थानिक उपायांची उदाहरणे
जलस्रोतांची ओळख व टिकावू व्यवस्थापन
विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी
लोकसहभागातून जलस्रोतांचे नकाशीकरण व संवर्धन
जलबंधू व जलसखी यांची निवड प्रक्रिया
जलसंधारणाच्या कामांची प्राथमिकता व तांत्रिक मार्गदर्शन
सरपंचांच्या अनुभव कथनाद्वारे वास्तव मांडणी
कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते –
गटविकास अधिकारी, धडगाव – श्री. भोसले
गटविकास अधिकारी, अक्कलकुवा – श्री. पावरा
तहसीलदार, धडगाव – श्री. सपकाळे
वरिष्ठ भूवैज्ञानिक, GSDA – श्री. भगवान
अतिरिक्त जिल्हाधिकारी (रोहयो) – श्री. चौधरी
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा – श्री. अजय पाटील
उप अभियंता – श्री. वाघ व श्रुती मेघे
नॅचरल सोल्युशन संस्थेचे जलतज्ज्ञ – श्री. सुमन पांडे
जलविभाग, पंचायत राज व उमेदचे कर्मचारी
पुढील वाटचाल:
कार्यशाळेतील चर्चांनंतर मिशन जलबंधू अभियानाची दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी, ग्रामविकास योजनेशी समन्वय, आणि संरचनात्मक कामांचे नियोजन निश्चित करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपाला मा. जिल्हाधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांनी सर्व सहभागी घटकांना मार्गदर्शन केले व मिशन जलबंधूच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय संकल्प व्यक्त करण्यात आला.
विशेष नोंद:
या कार्यशाळेमुळे ‘मिशन जलबंधू’ ही योजना केवळ एक प्रशासकीय उपक्रम न राहता, जलचळवळ बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले गेले आहे, जे भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी निर्णायक ठरेल.
#MissionJalbandhu#WaterConservation#CommunityDrivenChange#SustainableWater#VillageDevelopment#SaveWaterSaveLife#WaterSecurity