
नागरिकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना ‘राज्य सेवा हक्क दिन’ निमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे सेवा वितरण अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनाने सेवांमध्ये गती आणि सुलभता आणली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
मा.मुख्य सचिवांनी यावेळी डिजिटल समन्वय आणि एआय आधारित सेवा प्रणालींचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात नागरिकांच्या गरजा ओळखून स्वयंचलित सेवा देण्याच्या दिशेने शासन वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा.मुख्य आयुक्तांनी यशस्वी उपक्रमांचे दस्तऐवजीकरण करून ते राज्यभर राबविण्याची गरज व्यक्त केली.
नाविन्यपूर्ण, प्रभावी व परिणामकारक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या कार्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा गौरव संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
#राज्यसेवाहक्कदिन#Nandurbar#DrMittaliSethi#GoodGovernance#DigitalIndia#TransparentGovernance#PublicService#Innovation#Maharashtra#JilhaPrashasan