मुंबई : १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना समारंभ राज्यभरात सकाळी ८.०० वा साजरा करण्यात येणार आहे. तथापि, सद्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. सबब, दक्षता म्हणून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांना उष्माघातामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम पाहता त्यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला शक्यतो उपस्थित राहू नये, असे आवाहन जनतेस करण्यात येत आहे.
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
















