नवी दिल्ली: खते, रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि व्यवस्थापन अभ्यासक श्री. आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ या पुस्तकाचे प्रकाशन हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. सुमेधा कटारिया यांच्या हस्ते येथे करण्यात आले.
नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक श्री. हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त श्री. नितीन शेंडे आणि जनसंपर्क अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे, श्रीमती मालती राजगोपालन आदी उपस्थित होते.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लेखक श्री. राजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि आपल्या कॉर्पोरेट प्रवासातील अनुभव सांगताना अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. खते- रसायन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील आपल्या ४५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ व समृद्ध अनुभवाबाबतही माहिती दिली.
या पुस्तकात नेतृत्वगुण, कॉर्पोरेट गव्हर्नन्स (संस्थात्मक सुशासन), व्यावसायिक नीतिमत्ता आणि शाश्वत विकास या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. केवळ तांत्रिक किंवा वित्तीय यश हेच कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचे मोजमाप असू शकत नाही. उत्तम चारित्र्य, कामातील सचोटी आणि लोककेंद्री नेतृत्व हेच दीर्घकालीन संस्थात्मक यशाचे खरे गमक आहे,असे श्री. राजन यांनी यावेळी संवाद साधताना स्पष्ट केले.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष-126/ दि.29.05.2026
एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi
अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय सामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका
अक्राणी येथे आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्र विकास, रोजगार हमी योजना आणि निधी नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयात्मक पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.
बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत मजुरी समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नरेगा अंतर्गत अनुज्ञेय नसलेल्या कामांसाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) किंवा इतर उपलब्ध निधीतून कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विकासकामांना आर्थिक अडचणींमुळे विलंब होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
संबंधित सामुदायिक वनहक्क (CFR) समितीकडून पुढील दोन दिवसांत अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, अंदाजे १००० हेक्टर क्षेत्र विकासाच्या निकषांनुसार कामांची मागणी प्रस्तावित करण्यात येणार आहे. वनसंवर्धन, वृक्षलागवड, जलसंधारण आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी या प्रस्तावाला महत्त्व दिले जात आहे.
बैठकीत रोजगार हमी योजना विभागाला आगामी ६ जूनपर्यंत मस्टर काढून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांना वेग मिळणार आहे.
यावेळी ‘बिहार पॅटर्न’नुसार कामांची अंमलबजावणी करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली. सामुदायिक सहभाग, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत विकास या तत्त्वांवर आधारित मॉडेलद्वारे वनक्षेत्र संवर्धनासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रशासन, ग्रामस्तरावरील समित्या आणि विविध विभागांच्या समन्वयातून अक्राणी परिसरात वनसंवर्धन आणि शाश्वत विकासाचे प्रभावी मॉडेल उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
#नंदुरबार#अक्राणी#CFR#वनहक्क#MGNREGA#रोजगारहमी#प्रोजेक्टहरियाली#वृक्षलागवड#जलसंधारण#शाश्वतविकास#जिल्हाप्रशासन#डॉमित्तालीसेठी#ForestRights#HaritNandurbar
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस#मदतीसाठी_सदैव_तत्पर
‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
नंदुरबार : जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी अॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६‘ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते व प्रामुख्याने विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता यावर विचारमंथन झाले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी ८६ हजार कर्मचारी आणि सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून विद्युत सुरक्षिततेचे उपक्रम व त्यासाठी जागतिक विक्रमी लोकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरण, कर्मचारी संघटना संवाद-उपक्रम, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण, मानव संसाधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला कर्मचारी सन्मान व सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहन यासारखे कर्मचारी-हितैषी अनेक उपक्रम राबविले. व्यवस्थापनाच्या मंजुरीने धोरणात्मक निर्णय अंमलात आणले.
या कामगिरीचे मूल्यमापन करून ‘जीईईएफ’च्या निवड समितीकडून जागतिक परिषदेत पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकासाच्या योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६‘ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते श्री. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कॅप्शन : नवी दिल्ली येथे जागतिक परिषदेत महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना मानव संसाधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रशियाचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन, नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल.
सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी आणि आपत्तीव्यवस्थापन विभागांकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :
शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये.
विजेच्या कडकडाटाच्या वेळी स्वतःसह व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.
‘ई-श्रम कार्ड’मुळे मत्स्यव्यवसायातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना व अन्य लाभ.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी – http://eshram.gov.in
https://register.eshram.gov.in/#/user/self
महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप
नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला ३३ वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाल्या. नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, तसेच हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य डॉ. सुमेधा कटारिया ( निवृत्त आयएएएस) प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली: थोर समाजसुधारक, आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित आज महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी माजी मंत्री महादेव जानकर, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह सदनातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचाही थोडक्यात परिचय करून दिला.
निवासी आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती सिंघल यांनी स्विकारला
नवी दिल्ली– महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज श्रीमती आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी विशेष आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सिंघल यांची निवासी आयुक्त व सचिव म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
श्रीमती सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००९ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव, सातारा जिल्हाधिकारी आदी पदांचा कार्यभार सांभाळला आहे.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई :- ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक देदिप्यमान सुवर्ण पर्व संपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपट संगीताच्या विश्वात सुमनताईंनी आपला अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे हक्काचे स्थान निर्माण केले. साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



