Home महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

अमरावती: महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. खारगे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आदी अधिकारी उपस्थित होते.

श्री. खारगे यांनी महसूलमधील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस दौरा करावा. यामुळे प्रशासनावर पकड मजबूत करण्यास मदत होणार आहे. दौरा करताना विविध विकासकामांची तपासणी केल्यास तथ्य जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच जनतेशी भेटावे. त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. निवेदनावर केलेली कारवाई कळवावी. यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात येतात. हे सर्व करीत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्याही जाणून घ्याव्यात. प्रशासनाने नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. त्यांच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार 12 दुरूस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रामुख्याने जिल्ह्यात लोकसहभागातून निर्माण करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याची माहिती दिली. तसेच रहिवासी जमिन नियमानुकूल करणे, पट्टेवाटप करणे, मिळकत पत्रिका वाटप करणे याबाबत माहिती दिली.

दरम्यान श्री. खारगे यांनी सकाळी अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती तहसील कार्यालय, सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वडाळी मंडळ अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.

Home महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून राज्याला जागतिक मेरीटाईम हब बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील नांदगांव (वाढवण परिसर) आणि दिघी येथे शिपयार्ड विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेडचे वेदांत चौधरी, अंबर आयडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डासमोर सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पानुसार, वाढवण या आगामी खोल पाण्याच्या बंदराजवळ ६०० एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे एकात्मिक जहाजबांधणी, दुरुस्ती, ड्राय डॉक, ऑफशोअर सेवा आणि ग्रीन शिप रिसायकलिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत काम सुरू होणार आहे.

प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे ३० वर्षांच्या नूतनीकरणीय भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध करून देणे, मेगा प्रकल्प दर्जा, सिंगल विंडो मंजुरी, भांडवली अनुदान, कौशल्य विकास सहाय्य आणि विविध नियामक प्रक्रियांमध्ये समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष नांदगाव परिसराची पाहणी करुन अहवाल सादर करावेत असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, सागरी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, हरित तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकार प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्राला ‘ब्लू इकॉनॉमी’ मध्ये देशातील अग्रणी राज्य बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Home महाराष्ट्र येत्या काळात डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र येत्या काळात डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी. राज्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील १० प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याची जबाबदारी देण्यात येणार आहे.येत्या काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा आणि त्यानंतर राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सहायभूत सेवा धोरण व एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क धोरण-२०२४ अंतर्गत स्थापित झालेल्या/होणाऱ्या डेटा सेंटर्स/एकात्मिक डेटा हरित सेटर पार्कच्या सद्यःस्थितीविषयी आढावा घेतला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी. वेलारासु, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या पुढील तीन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य डेटा सेंटर क्षेत्रातही वेगाने पुढे जात असून महाराष्ट्र देशातील सर्वात मोठ्या डेटा सेंटर गुंतवणूक केंद्रांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या राज्यातील डेटा सेंटर प्रकल्प ‘इन्व्हेस्टमेंट इन प्रोग्रेस’ टप्प्यात असून त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे. याचबरोबर या डाटा सेंटर साठी लागणारी ऊर्जा आणि पाणी महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत आणि कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रक्रिया सुलभीकरणावर अधिक भर द्यावा तसेच जागा उपलब्धता आणि वितरणाचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नवी मुंबई हे राज्यातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून महापे आणि परिसरात मोठे प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच खालापूरला तिसरे महत्त्वाचे डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. पनवेल परिसरात पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उत्पादन क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स, एरोस्पेस, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग आणि संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांचा मोठा वाटा असून सेवा क्षेत्रात डेटा सेंटर, आयटी-आयटीईएस, फिनटेक आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी सिडकोमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. एरोसिटी परिसरातील विद्यापीठ प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट हब, डेटा सेंटर आणि स्टुडिओ अपार्टमेंट्स प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Home महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य जहाजबांधणी व सागरी औद्योगिक केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे सुमारे ४,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक ‘युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून राज्याला जागतिक मेरीटाईम हब बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील नांदगांव (वाढवण परिसर) आणि दिघी येथे शिपयार्ड विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेडचे वेदांत चौधरी, अंबर आयडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डासमोर सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पानुसार, वाढवण या आगामी खोल पाण्याच्या बंदराजवळ ६०० एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे एकात्मिक जहाजबांधणी, दुरुस्ती, ड्राय डॉक, ऑफशोअर सेवा आणि ग्रीन शिप रिसायकलिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत काम सुरू होणार आहे.

प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे ३० वर्षांच्या नूतनीकरणीय भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध करून देणे, मेगा प्रकल्प दर्जा, सिंगल विंडो मंजुरी, भांडवली अनुदान, कौशल्य विकास सहाय्य आणि विविध नियामक प्रक्रियांमध्ये समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष नांदगाव परिसराची पाहणी करुन अहवाल सादर करावेत असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, सागरी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, हरित तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकार प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्राला ‘ब्लू इकॉनॉमी’ मध्ये देशातील अग्रणी राज्य बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Home सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.

कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, रमेश गोवानी, खासदार मनोज तिवारी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

Home वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी गुंठेवारी नियमित करून घ्यावी -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (CMRDA) हद्दीतील नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनीही त्यांच्या जमिनी व बांधकामे दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत, असे आवाहन महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

वाळूज येथील मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MASSIA) कार्यालयात गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहआयुक्त अंजली धानोरकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करूणा खरात यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

यावेळी बोलताना जी. श्रीकांत म्हणाले की, वाळूज एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकास योजनांमध्ये आवश्यक फेरबदलांची प्रक्रिया गतिमान करण्यात येत आहे.

प्राधिकरणाच्या हद्दीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून, शासन नियमांनुसार ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचीच विनापरवाना बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यानंतरची बांधकामे अनधिकृत मानून हटविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रमाणपत्र व बांधकाम परवाने नसल्यास बँकांनी गृहकर्ज मंजूर करू नये, असे निर्देश देण्यात आल्याचे सांगून भविष्यात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत यासाठी उद्योजकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

वाळूज परिसरातील उद्योगांनी शहराच्या औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यामुळेच आज शहरात टोयोटासारखे उद्योग आले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरला “इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल” म्हणून ओळख मिळत आहे, असे सांगून त्यांनी उद्योग क्षेत्रातील अनियमितता दूर करून हा परिसर आदर्श औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योजकांनी नियमितीकरण प्रक्रियेला प्रतिसाद द्यावा, असे नमूद केले.

उद्योजकांच्या शंकांचे निरसन व अर्ज स्वीकृतीसाठी MASSIA कार्यालयात CMRDA च्या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, समाजकंटकांकडून त्रास होत असल्यास उद्योजकांनी केवळ संदेशाद्वारे तक्रार करावी, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राधिकरणामार्फत वाळूज औद्योगिक परिसर व ३६ गावांच्या झालर क्षेत्रासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, फायर स्टेशन उभारणी आणि रस्ते विकासाची कामे लवकरच हाती घेतली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीत वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये चुकीने रूपांतर, विनापरवाना हस्तांतरण अथवा विक्री झालेल्या जमिनींची प्रकरणेही गुंठेवारी नियमितीकरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात तहसीलदार व नायब तहसीलदारांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यावेळी अभय योजनेंतर्गत गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी शुल्क सवलतीची माहिती देण्यात आली. त्यानुसार १ मे २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत बेटरमेंट चार्जेसवर केवळ १० टक्के शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५० टक्के शुल्क आकारले जाईल, तर १ नोव्हेंबर २०२६ पासून पूर्ण शुल्क आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Home ‘लाईव्ह इव्हेंट्स’ च्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था तयार करण्यात येणार – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

‘लाईव्ह इव्हेंट्स’ च्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था तयार करण्यात येणार – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

मुंबई : राज्यातील ‘लाईव्ह इव्हेंट‘ क्षेत्राला चालना देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानग्या मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. लाईव्ह इव्हेंट संदर्भातील सर्व परवानग्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या एसओपी करिता (सर्वसमावेशक विशिष्ट कार्यपद्धती) संबंधित विभागांनी सूचना द्याव्यात आणि सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

लाइव्ह इव्हेंट क्षेत्राला विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी, २४ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत राज्यस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीत प्रधान सचिव सिंह बोलत होते. मंत्रालयातील परिषद सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस  महाआयटी आयुक्त भुवनेश्वरी बी, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, पोलीस उपायुक्त अकबर पठाण आदी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकेतून लाईव्ह इव्हेंटसाठी करण्यात येणाऱ्या एसओपीची बैठकीत माहिती दिली.

प्रधान सचिव सिंह म्हणाले, सद्यस्थितीत कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांना पोलीस, अग्निशमन, वीज, महापालिका, महसूल आदी विविध विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत अधिकचा वेळ लागतो. यामध्ये आता वेळ, प्रक्रिया आणि कागदपत्रांची संख्या कमी करून संपूर्ण प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यात येणार आहे. परवानग्या ‘सिंगल विंडो सिस्टीम‘ मध्ये  देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे.

देशातील लाईव्ह मनोरंजन अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासह विकास करण्यासाठी महाराष्ट्रात केंद्राने दिलेल्या मॉडेल एसओपीमध्ये (मॉडेल एक्झिक्यूटिव्ह ऑर्डरमध्ये) आवश्यक बदल करुन राज्याची एसओपी तयार करण्यात येत आहे. कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. लाईव्ह मनोरंजन अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा विषय हा राज्य प्रशासनातील विविध विभागांशी संबंधित असल्याने विविध विभागांकडून कालमर्यादेत यासंदर्भातील कार्यवाही करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

लाईव्ह इव्हेंट, कन्सर्ट आदी कार्यक्रमांच्या परवानग्यांचे समन्वयन आणि इतर अनुषंगिक बाबीच्या नियोजनासाठी केंद्र शासनाच्या मॉडेल लाईव्ह इव्हेंट क्लिअरन्स प्रमाणित कार्यपद्धतीनुसार राज्याकरिता एक प्रभावी व उद्योग पूरक कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे.  या निर्णयामुळे लाईव्ह इव्हेंट्स आयोजित करण्याची प्रक्रिया सुलभ, गतिमान होऊन लाईव्ह इव्हेंट्स उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळेल. याशिवाय पर्यटन, गुंतवणूक विकासासह रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वासही प्रधान सचिव सिंह यांनी व्यक्त केला.

यावेळी पोलीस, बृहन्मुंबई महापालिका, अग्निशमन सेवा, बेस्ट उपक्रम, ग्रामविकास, राज्य पुरातत्व, आयटी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट कार्यपद्धतीकरिता सूचना केल्या.

Home पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे वितरण

पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे वितरण

मुंबई : सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार’ तसेच विविध मानाच्या पुरस्कारांचे वितरण प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. इंटरनॅशनल थिएटर अँड स्पोर्ट्स फाउंडेशन (itsf) आणि साईदिशा प्रतिष्ठान मार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला कला, क्रीडा, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

अभिनेते बोमन इराणी यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि मुंबई पोलीस दलातील उप आयुक्त बजरंग बनसोडे यांना ‘रणझुंजार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना ‘सेवा रत्न पुरस्कार’ देण्यात आला.

‘महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार’ संतोष लक्ष्मण जाधव, डॉ.सायली पालखेडकर, क्रिकेटपटू आयुष म्हात्रे, डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना आयटीएसएफचा जीवन गौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. ‘ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड’ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना प्रदान करण्यात आला.

गायक हर्षद गोळेकर आणि दुहिता गोळेकर, शहजाद अली यांना पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार देण्यात आला. रायझिंग स्टार अवॉर्ड गायक जेटशेन लामा, गायक देवानश्रीया के. यांना देण्यात आला. कला रत्न पुरस्काराने चित्रकार शेखर साने यांना गौरवण्यात आले. सुहाना ग्रुपचे विशाल चोरडिया यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात कालीपुत्र कलिचरण महाराज यांनी शिवस्रोत पठण केले. घाटकोपर येथील विशेष मुलांनी विशेष सादरीकरण केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान मुंबईकर प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माने यांनी सांगितले.

Home Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा आढावा

Mission 150” मोहिमेला वेग; उच्च प्राधान्य गावांसाठी आरोग्य व पोषण कृती आराखड्याचा आढावा

नंदुरबार जिल्ह्यात आज “Mission 150 – A Convergent Life Cycle Approach for 150 High-Burden Villages” अंतर्गत जिल्हास्तरीय कृती आराखडा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील उच्च प्राधान्य असलेल्या १५० गावांमध्ये आरोग्य, पोषण आणि माता-बाल विकास सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

👩‍⚕️ बैठकीमध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, RBSK तसेच विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

📊 गावनिहाय बेसलाईन डेटा, प्रमुख KPIs (Key Performance Indicators), क्षेत्रीय भेटींचे नियोजन, मासिक आढावा यंत्रणा आणि सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डेटा-आधारित नियोजनाद्वारे प्रत्येक गावातील वास्तविक गरजा ओळखून त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.

🤱 किशोरी, गर्भवती व स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी जीवनचक्र आधारित दृष्टिकोन स्वीकारण्यात येत असून, कुपोषण कमी करणे, मातृ व बाल आरोग्य निर्देशांक सुधारणे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🏡 दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम करणे, समुदाय सहभाग वाढविणे आणि विभागीय एकत्रित कृतीद्वारे शाश्वत बदल घडवून आणण्यावर भर देण्यात आला.

🤝 “Mission 150” हा उपक्रम प्रशासन, विविध विभाग आणि विकास भागीदार यांच्या समन्वयातून आरोग्य व पोषण क्षेत्रात दीर्घकालीन आणि परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

🌱 प्रत्येक माता, बालक आणि किशोरीपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवून निरोगी व सशक्त नंदुरबार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

#Mission150#Nandurbar#माताआरोग्य#बालआरोग्य#NutritionMission#HighBurdenVillages#PublicHealth#WomenAndChildDevelopment#RBSK#TribalHealth#HealthyNandurbar#CommunityHealth#DataDrivenGovernance#IntegratedDevelopment#कुपोषणमुक्तनंदुरबार

Home नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कार्यवाही करण्यात यावी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कार्यवाही करण्यात यावी

शासनाच्या अटींनुसार फार्मर आयडीमधील आवश्यक दुरुस्त्या करून शेतकऱ्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. तुषार सिंचन संचासाठी ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर द्यावा. तसेच रेशीम योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी रेशीम विभागासमवेत समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आमदार प्रकाश सोळंके, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मीनल करणवाल उपस्थित होते.

error: Content is protected !!