(नंदुरबार) जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तत्परतेने निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात दुपारी 1:00 वाजता जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
शासकीय यंत्रणेकडून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय मिळावा यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन राबविले जातात. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील जनतेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो.
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया:
• तालुकास्तर: नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी किंवा निवेदने प्रथम तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनात सादर करणे आवश्यक आहे. हा दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो .
• जिल्हास्तर: जर तालुकास्तरीय लोकशाही दिनातील निर्णयावर समाधान झाले नसेल, तर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार किंवा निवेदन सादर करावे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते बोरझर येथे 30 मधपाळांना साहित्याचे वाटप
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या संकल्पनेतून राज्यातील 10 गावांची ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर (ता. नवापूर) या गावाची निवड करण्यात आली असून, 27 मार्च 2026 रोजी प्रशिक्षित 30 लाभार्थ्यांना मध संकलन साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
रोजगार आणि पर्यटनाची सांगड
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गीतांजली बाविस्कर आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती बाविस्कर म्हणाल्या की, “मधाचे गाव या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. केवळ मध उत्पादनच नव्हे, तर पर्यटन क्षेत्रातही यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील”. श्री. ठाकरे यांनी बोरझरच्या वनसंपत्तीचे कौतुक करत हा उद्योग वाढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद केले.
प्रशिक्षण आणि साहित्य वाटप
बोरझर, उकळापाणी व प्रतापपूर येथील 30 मधपाळांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. या लाभार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पूर्ण झाले होते. या कार्यक्रमात या सर्वांना आधुनिक मध साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना योजनेमुळे मिळालेला अनुभव आणि प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले .
महिलांसाठी विशेष प्रयत्न
कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या सौ. कातूताई गावीत यांनी महिला वर्गासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याची विनंती केली, तसेच कर्ज प्रकरणांसाठी बँकांच्या सहकार्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. सरपंच सौ. रुंधा गावीत यांनी मधपाळांनी हे कौशल्य इतरांनाही शिकवावे, असे आवाहन केले.
सामूहिक सुविधा केंद्र आणि सेल्फी पॉईंट
यावेळी श्रीमती बाविस्कर व श्री. ठाकरे यांनी गावात उभारण्यात येणारे सामूहिक सुविधा केंद्र, ‘मधुबन’ आणि ‘सेल्फी पॉईंट’च्या जागेची पाहणी केली. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सविस्तर माहिती रुपेश पाटील यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गंवादे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
अफवांना बळी पडू नका!
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाबरून खरेदी टाळा व शासनाच्या अधिकृत माहितीनरच विश्वास ठेवा.
#NoPanic#StayInformed#FuelSupply#Nandurbar
महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या
उर्वरित १३ परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ व ‘लाइफ सायन्सेस हब’ उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग प्रधान सचिव डॉ. पी.अन्बळगन, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
नागरिकांनो लक्ष द्या!
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (CNG) चा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अनावश्यक गर्दी करू नका
वाहतुकीत अडथळा होईल असे वर्तन टाळा
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
मृत व बेपत्ता जनावरांसाठीही मदत जाहीर
#Maharashtra#FarmersRelief#Nandurbar
पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
१ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
कृपया सतर्क राहा व सुरक्षितता पाळा
#WeatherAlert#StaySafe#Maharashtra#RainUpdate
एलपीजी बुकिंग कालावधी बदललेला नाही
अफवांवर विश्वास ठेवू नका ![]()
शहरात २५ दिवस, ग्रामीण भागात ४५ दिवस नियम लागू ![]()
#LPG#FactCheck#StayInformed#DGIPR
मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस विविध विषयांवरील सखोल चर्चासत्रे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला.
दिवसभरात मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, लिंग समानता तसेच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विविध मान्यवरांनी विचार मांडले. टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर धोरणात्मक विश्लेषण सादर केले.
‘धुरंधर’ या विषयावरील चर्चेत प्रकाश बेलावडी, कर्नल अशुतोष काले आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सशस्त्र दलांचा दृष्टिकोन मांडला. अमेरिका–इराण संबंधांवरील चर्चेत राजदूत टी.सी.ए. राघवन, मिन्हाज मर्चंट आणि प्रबळ दासगुप्ता यांनी सखोल विश्लेषण केले. ‘भारताची सभ्यता: अवकाश आणि काळाच्या पलीकडील प्रवास’ या सत्रात या पॅनेलमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, लेखक व कथाकार राजेश एम. अय्यर, लेखक अजय चतुर्वेदी यांनी सहभाग घेत भारतीय सभ्यतेचे सातत्य आधारांवर प्रकाश टाकला.
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन मोडमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून विशेष कॅम्पचे आयोजन करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित उद्योग आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पुणे महानगरपालिकेचे अपर आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत उद्योगांची उत्पादन क्षमता अबाधित राखणे ही राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नैसर्गिक गॅस हा उद्योगांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत असल्याने कोणत्याही उद्योगाला केवळ गॅस जोडणीअभावी अडथळे निर्माण होऊ नयेत. त्यामुळे एमआयडीसी, गॅस वितरण कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे नियोजन करून प्रत्येक पात्र उद्योगापर्यंत PNG जोडणी पोहोचवावी.
एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, घरगुती गॅसला प्राधान्य दिले जात असून व्यावसायिक गॅसचा पुरवठा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केला जात आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेंतर्गत जिल्हानिहाय व औद्योगिक वसाहतीनिहाय विशेष शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, तांत्रिक तपासणी जलद गतीने पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे यावर भर दिला जाणार आहे. “इझ ऑफ डुइंग बिझनेस”च्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रिनिव्हेबल ऊर्जा धोरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, उद्योगांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एमआयडीसीमधील उपलब्ध जागा ३० वर्षांच्या दीर्घकालीन करारावर उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे उद्योगांना वीज खर्चात बचत होऊन स्वयंपूर्ण ऊर्जाव्यवस्था उभारता येईल. इच्छुक उद्योगांनी पुढाकार घेतल्यास आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांसमोरील इतर अडचणींबाबत बोलताना त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि एमआयडीसी यांनी समन्वयाने काम करून उद्योगांसाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एमआयडीसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हिंजवडी औद्योगिक परिसरात तात्पुरत्या मोबाईल टॉयलेटच्या ऐवजी कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उद्योग संघटनांनी पुढाकार घेऊन ही सुविधा उभारावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, पोलीस स्टेशनसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर उद्योग संघटनांनी बांधकाम करून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश देण्यात आले.
बारामती एमआयडीसीच्या धर्तीवर हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांमध्ये जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट गेस्ट हाऊस उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच, ज्या ठिकाणी ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून संबंधित उद्योग संघटनांकडून त्याचे व्यवस्थापन करण्याची संकल्पनाही पुढे आली.
युद्धजन्य परिस्थितीमुळे विशेषतः लघुउद्योगांवर आर्थिक ताण निर्माण झाल्याने वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी उद्योग संघटनांकडून करण्यात आली. या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उद्योगांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रात उद्योग प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी व्हॉट्सअॅप गट स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उद्योगमंत्र्यांच्या निर्देशानुसार लवकरच विशेष बैठक घेऊन या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.



