Home आजची लेक सक्षम आहे

आजची लेक सक्षम आहे

स्वावलंबी आहे व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवत आहे—हीच विकसित भारताची नवी ओळख.

#नारीशक्तीवंदन#NariShaktiVandan#महिला_सशक्तीकरण#नवभारत#महिला_नेतृत्व

Home महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे सुरक्षा

महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे सुरक्षा

शिक्षण व आर्थिक स्वावलंबनाला नवी गती मिळत आहे.

#नारीशक्तीवंदन#NariShaktiVandan#महिला_सक्षमीकरण

Home कोशल विकास योजनेच्या माध्यमातून आरती गमे यांनी प्रतिकूलपरिस्थितीवर मात करत स्वावलंबनाची नवी वाट निर्माण केली आहे

कोशल विकास योजनेच्या माध्यमातून आरती गमे यांनी प्रतिकूलपरिस्थितीवर मात करत स्वावलंबनाची नवी वाट निर्माण केली आहे

शासकीय प्रशिक्षणाच्या आधारावर त्यांनी शिवणकाम व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करत दरमहा स्थिर उत्पन्न मिळवले आहे.आज त्या स्वतः सक्षम झाल्या असून इतर महिलांनाही प्रेरणा देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवत आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आत्मविश्वासाने उभी राहिलेली ही यशोगाथा महिलांच्या सशक्तीकरणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

#NariShaktiVandan#नारीशक्तीवंदन#महिला_सक्षमीकरण#स्वावलंबन#यशोगाथा

Home महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

अहिल्यानगर: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५५ रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना नवी दृष्टी लाभली असून त्यांनी या मोफत आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या यशस्वी उपक्रमात संगमनेर, साकूर, तळेगाव, लोणी, राहता, श्रीरामपूर, कर्जत, जामखेड व नगर या तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश होता.

या शस्त्रक्रिया मोहिमेचे नियोजन जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक वर्ग-१ डॉ. संतोष रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. नेत्रतज्ज्ञ डॉ. भूषण अनभुले, डॉ. साजिद तांबोळी, डॉ. अजिता गरुड, डॉ. ज्योती शिंदे व डॉ. सुप्रिया सोनवणे यांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया पार पाडल्या. या कार्यात नोडल अधिकारी संतोष चौधरी, नेत्रचिकित्सा अधिकारी मधुकर जत्ती, पाचारणे, रामानंद, भुईगळ, स्वाती गायकवाड, सांगारे, इन्चार्ज सिस्टर डापसे व परिचारिका कर्मचारी तसेच शस्त्रक्रियागृह विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

रुग्णालयामार्फत या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या असून रुग्णांची ने-आण, निवास, भोजन व आवश्यक औषधोपचारांची उत्तम व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली होती. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये नेत्र रुग्णांना सातत्याने अशा प्रकारची उत्तम सेवा पुरवली जात आहे.

या शिबिरादरम्यान केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर सामाजिक प्रबोधनावरही भर देण्यात आला. सतीश अहिरे यांनी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देत त्याबाबत सविस्तर समुपदेशन केले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अंधत्व निर्मूलन मोहिमेला मोठे बळ मिळाले असून सर्व स्तरांतून या कार्याचे कौतुक होत आहे.

#EyeHealth#CataractSurgery#DistrictHospital#AhilyanagarUpdate#FreeMedicalCamp#VisionMission#HealthCare#SanjayGhogare#BlindnessControl#RuralHealth#SocialService#अहिल्यानगर#जिल्हारुग्णालय#मोफतशस्त्रक्रिया#HealthForAll#NationalHealthMission#OrganDonationAwareness#MedicalSuccess#MaharashtraHealth#SeniorCitizenCare

Home महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Home नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्वाची

नोकरीमध्ये शिस्तबद्ध सर्जनशीलता महत्वाची

नवी दिल्ली: प्रशासकीय सेवेतील कठोर शिस्त आणि साहित्यातील सृजनशीलता यांचा सुवर्णमध्य साधत आपली प्रशासकीय सेवा केली असल्याचे मत आज महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव ‘परिसंवादा’च्या माध्यमातून मांडले. निमित्त होते नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६’ चे.

सरहद (पुणे) आयोजित आणि महाराष्ट्र सदन ,नवी दिल्ली व मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातील पहिल्या सत्रात ‘अडथळ्यांपलीकडचे कर्तृत्व: शासकीय सेवेतील महिला कर्तृत्वाची वाटचाल’ या विषयावर रंगलेल्या परिसंवादाने उपस्थितांची मने जिंकली.

भारतीय नागरी लेखा सेवेतील (ICAS) वरिष्ठ अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांनी प्रशासकीय कसरत आणि ‘प्राधान्यक्रम’ यावर भाष्य केले. “घर आणि कार्यालयाचा समतोल राखणे हे केवळ महिलांचेच कर्तव्य आहे, हा सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. महिलांनी ‘अपराधीपणाची भावना’ (Guilt) बाजूला सारून मुलांच्या संगोपनात त्यांना आपल्या कामाच्या ‘इकोसिस्टम’ची ओळख करून द्यावी, जेणेकरून ते अधिक सक्षम होतील, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय विदेश सेवेतील अधिकारी वल्लारी गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे पदर उलगडले. मेक्सिको आणि स्पेनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना आलेले अनुभव सांगताना त्यांनी एआय आणि सायबर डिप्लोमसी यांसारख्या आधुनिक आव्हानांवर प्रकाश टाकला. मेक्सिकोतील भारतीय क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत त्यांनी आपल्या कामात ‘व्हॅल्यू ॲड’ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

नौदलातील साहसी प्रवासाचा उलगडा करताना, नागरी संरक्षण संचालनालयातील अधिकारी राजेश्वरी कोरी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला. युद्धनौकेवर नियुक्त होणाऱ्या उपखंडातील पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. संकट काळ कधीही लिंगभेद पाहत नाही, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या महत्त्वपूर्ण परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली फुले आणि निवेदिता खांडेकर यांनी केले.

Home नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: महानगर पालिका,एमएसआयडीसी, मिहान,विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण व सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या.

येथील मुख्यमंत्री सचिवालयात (हैदराबाद हाऊस) शहरातील विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार माया इवनाते,आमदार मोहन मते आणि कृष्णा खोपडे,नागपूरच्या महापौर नीता ठाकरे,गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत १ लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट,फूड मॉल व हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले त्यासाठी ‘एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’चा आधार घ्यावा व आवश्यक बदल करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पार्किंग बाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तोडगा काढावा अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दिल्या.

नागपूर शहराचा विकास करताना येथील शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या, पान मसाल्याची दुकाने तातडीने हटवावी, मुख्य रस्त्याच्या शेजारी करण्यात आलेले अतिक्रम तत्काळ काढावे आणि महामार्गावरील बेकायदेशीर व्यवसाय बंद करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

सक्करदरा बाजार, सोख्ता भवन बुधवार बाजार आणि ५व्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची शहरातील कामे पूर्ण करताना आधी समस्या पुढे ठेवून सोडविण्याच्या दिशेने कार्य करण्या बाबतही यावेळी निर्देश देण्यात आले. ५व्या टप्प्या अंतर्गत शहरातील ९ झोनमध्ये ८९ की.मी.चे १३५ रस्ते प्रस्तावित आहेत.

शहरातील पाणी पुरवठ्या विषयी झालेल्या चर्चेत पाणी गळती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत राज्यातील अन्य शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आदर्श पद्धतींचा अभ्यास करून त्या आधारे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डीग दवाखाना यांच्या पुनर्विकास करताना घ्यावयाच्या काळजी बाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

दाभा येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरच्या स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच विभागीय क्रीडा संकुला बाबत सौर ऊर्जेचा वापर करणे, वेळोवेळी कामाची गुणवत्ता तपासणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, प्रशासकीय इमारत, क्रीडांगण उभारणे आदी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली व काही मागण्या आहे प्रस्तुत करण्यात आल्या.

यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्प, नाग व पोहरा नदी प्रकल्पांची प्रगती, वाढत्या लोकसंख्येसाठी भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन,पावसाळी नाले व सांड पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली.काचीपुरा कृषी महाविद्यालय परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.

या बैठकीत शहरातील विकास कामाशी संबंधित महानगर पालिका,महाराष्ट्र -राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. नागपूर (मिहान),क्रीडा विभाग,वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Home प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणाचा हुंकार

प्रशासकीय महिलांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ‘महिला सक्षमीकरणाचा हुंकार

नवी दिल्ली : महिलांमध्ये काम करण्याची प्रचंड ताकद असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जिद्द त्यांच्यात उपजत असते. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला केवळ महिला म्हणून न पाहता एक सक्षम अधिकारी म्हणून सिद्ध करणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी येथे केले.

नवी दिल्ली येथे आयोजित प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाल्या होत्या.  या संमेलनात विविध सत्रांच्या माध्यमातून प्रशासकीय अनुभव, भाषा-संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनाच्या सृजनाची मुक्त झेप स्वप्न आणि वास्तव या विशेष संवाद सत्रात आश्विनी भिडे यांची ऑनलाइन प्रकट मुलाखत दैनिक पुढारीच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी घेतली. यावेळी भिडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतील विविध पैलू उलगडले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि लोकांशी थेट संवाद यामुळे प्रशासनात विश्वासार्हता निर्माण होते, असे नमूद करून त्यांनी वर्क-लाईफ बॅलन्स, कौटुंबिक सहकार्य आणि टीम बिल्डिंगच्या महत्त्वावर भर दिला. सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळेच मेट्रोसारखे अनेक मोठे आणि क्लिष्ट प्रकल्प यशस्वी करता आले, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मराठीशी समरस होताना या परिसंवादात परराज्यातून महाराष्ट्रात सेवा बजावत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपला भाषिक आणि सांस्कृतिक प्रवास मांडला. गृह मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांनी मराठी साहित्यातील श्रेष्ठ रचनांच्या अनुवादाची गरज व्यक्त केली, तर संचालक सुमन रावत यांनी ‘जोगवा’ आणि ‘उंबरठा’ सारख्या चित्रपटांतून महाराष्ट्राची संस्कृती जवळून अनुभवता येते असे नमूद केले. याच सत्रात श्वेता सिंघल यांनी भावनांचे महत्त्व अधोरेखित करत, आता मी उत्तर प्रदेशची कमी आणि मराठीच जास्त झाले आहे,अशा शब्दांत आपली मराठी मातीशी असलेली जवळीक व्यक्त केली. त्यांच्या घरी आता मराठी संस्कृती आणि व्यंजने पूर्णतः स्वीकारली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

संमेलनाच्या पुढील  सत्रात भाषा, संस्कृती आणि प्रशासन  परराज्यातील मराठी महिला अधिकाऱ्यांचे अनुभव या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अनुपमा निलेकर यांनी बिहारमधील मराठी समाजाचा उल्लेख करत, तेथील मराठी लोक गणेशोत्सवासारखे अनेक महाराष्ट्रीयन सांस्कृतिक उपक्रम उत्साहाने साजरे करत असल्याचे सांगितले. भारतीय सेवेतील अधिकारी प्रतिभा पारकर यांनी भाषा, संस्कृती आणि साहित्य ही आपली ओळख असून ती जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी अंगोला देशात भारतीय टीम तयार करून मराठी व हिंदी नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार केल्याचे स्पष्ट केले. तर ग्रामविकास विभाग सचिव रोहिणी भाजीभाकरे यांनी स्थानिक भाषा समजून घेण्याचे महत्त्व सांगताना तमिळ भाषा शिकताना आलेले अनुभव हलक्या-फुलक्या शैलीत मांडले. डोरेमॉन’च्या माध्यमातून भाषा शिकण्याचा त्यांचा किस्सा सभागृहात हास्याची लहर पसरवून गेला. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला भाषा आणि संस्कृती जोडतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरण संधी, आव्हाने आणि धोरणात्मक दिशा  या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवरांनी महिलांच्या प्रशासकीय संधींवर भाष्य केले. भारत सरकारच्या एलपीएआय (LPAI) सदस्य रेखा रायकर यांनी जागतिक स्तरावरील महिलांच्या संघर्षाचा संदर्भ देत ‘जेंडर न्यूट्रल’ प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे यांनी कष्टकरी आणि नोकरदार महिलांच्या समस्यांचे स्वरूप भिन्न असल्याचे सांगत प्रश्नांच्या स्वरूपानुसार धोरणे आखली जावीत, असे मत व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी डॉ. निशा चव्हाण यांनी महिलांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने समाजात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले, तर संयुक्त आयकर आयुक्त कविता पाटील यांनी महिलांच्या नैसर्गिक गुणांचा प्रशासकीय कामात सकारात्मक वापर करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

या संपूर्ण संमेलनातील विविध विशेष सत्रांचे सूत्रसंचालन मंत्रालयातील उपसचिव टीना संखे आणि पुणे येथील उपवनसंरक्षक स्नेहल पाटील यांनी केले. तसेच भारतीय सेवेतील अधिकारी क्रांती खोब्रागडे, सुचिता लोखंडे, अपर आयुक्त प्रांजल चोभे-शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रगती बाणखेले यांनी संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि मराठी साहित्याप्रती असलेली ओढ यांचा एक अनोखा संगम या संमेलनाच्या निमित्ताने राजधानीत पाहायला मिळाला.

Home स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे.

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करून टाकणारी आहे.

सुरांनी केवळ गाणी नाही, तर अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या. शास्त्रीय संगीताची बांधिलकी आणि आधुनिक संगीताची जाण यांचा अप्रतिम संगम त्यांच्या गाण्यात जाणवत असे. अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

#आशाभोसले

Home मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून

महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC) करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC) करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!