नंदुरबार: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. ४) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-२०२६’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा क्षेत्रात राज्याने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शाश्वत व स्वस्त विजेसाठी ऊर्जा परिवर्तनाचा ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठी गती दिली आहे. सौर ऊर्जेच्या योजनांद्वारे सद्यस्थितीत २० लाख ६६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. तर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आतापर्यंत ५ लाखांवर घरगुती ग्राहकांनी लाभ घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. नाईक यांनी प्रदर्शनीतील महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध योजना, उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. त्यांचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी स्वागत केले व माहिती दिली. यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री. सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष श्री. देवांग ठाकूर, सरचिटणीस श्री. अमरनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.
या तीन दिवसीय प्रदर्शनीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा मोहिमेचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सत्रात विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन केले. महावितरणच्या अभियानामध्ये सहभागी होत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमच्या वतीने देण्यात आली.
महावितरण प्रदर्शनीद्वारे अधीक्षक अभियंता श्री. संजय खंदारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठौर यांच्यासह अभियंता, अधिकाऱ्यांनी महावितरणच्या विविध योजना व विद्युत सुरक्षेसंदर्भात नागरिकांना माहिती दिली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न
भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने होणाऱ्या विलंबामुळे पर्यवेक्षिका पदासाठीची वयोमर्यादा उलटून जाणाऱ्या सेविकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अन्य मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस एकात्मिक बालविकास प्रकल्प आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि.रा.ठाकूर, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अनिल ढुमणे आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली
उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी सांगितले.
३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत असलेल्या विघ्नेश अतुल कोंढारे (वय ४) या बालकाला मारहाण झाली. या मारहाणीत विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
सध्या विघ्नेशवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत उपचार सुरू आहेत. या मदतीबद्दल विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीने केलेल्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. या सहाय्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि आता विघ्नेशची प्रकृती स्थिर आहे.”
गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र
राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. देशातील विविध राज्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यात्मक सक्षमीकरणासाठी या परीषदेतील प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे.
नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्रात केले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली.
ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या द्विपथ वाहिनीवरून सुमारे ३००० अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या वेगाने निर्णय प्रक्रियेत महापारेषणचे संचालक (प्रकल्प/संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत व परिमंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी कामगिरी पूर्ण केली. यंत्रणांच्या समन्वयामुळे अखेर मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून द्विपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. हा भव्य प्रकल्प २०१० मध्ये मंजूर करण्यात आला पण विविध अडचणींमुळे लांबला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महसूल विभाग, पोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आल्याचे महापारेषणने म्हटले आहे.
व्हॉट्स ॲपवर mParivahan या अॅपच्या नावाने येणारा ₹ २,०००/- दंडाचा संदेश खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.
अधिकृत लिंक असल्याचे भासवनू त्या लिंकवर क्लिक करुन तपशील पाहण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या मोटार वाहन विभागाकडून वाहतूक दंडासंदर्भातील संदेश व्हॉट्सॲप लिंकद्वारे पाठविले जात नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे.
अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!
६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये
‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला
राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते
SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान ![]()
AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे
सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!
Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!
संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!
#AkolaPolice#ProjectTrinetra#BestITProject#AIPDM#MaharashtraPolice PoliceInnovation
सावधान! बनावट नोटांच्या आमिषाला बळी पडू नका. महाराष्ट्र सायबरची इंस्टाग्रामवरील रॅकेटवर मोठी कारवाई!
महाराष्ट्र सायबर विभागाद्वारे सोशल मीडियावरील बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर ‘Reels’ च्या माध्यमातून बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) विकणाऱ्या आणि कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या खात्यांची दखल घेण्यात आली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबई, बुलढाणा आणि जळगाव येथे एकूण ४ गुन्हे (FIRs) दाखल केले आहेत. आतापर्यंत राहुल अनिल पवार आणि योगिता हितेश भोसले या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटांचा वापर केवळ आर्थिक गुन्हा नसून तो देशविघातक कारवाया आणि मनी लाँड्रिंगला खतपाणी घालणारा प्रकार आहे. नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी.
आम्ही डिजिटल जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. ![]()
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणी संदर्भातील महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात येत आहेत.
परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी Hall Ticket व वैध Photo ID Proof (आधार कार्ड / पॅन कार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या किमान १.५ तास आधी उपस्थित राहावे.
सकाळी १०:०० नंतर प्रवेश बंद करण्यात येईल.
जर Hall Ticket प्राप्त झाले नसेल, तर दिलेल्या लिंक किंवा QR कोडद्वारे ते डाउनलोड करता येईल.
अधिक माहितीसाठी व Hall Ticket संदर्भात काही अडचण असल्यास, दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
WhatsApp : 7972757482
#PrakashVata#ImportantNotice#ExamInstructions#HallTicket



