दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सन २०२५-२६ मधील दरच सन २०२६-२७ साठी कायम ठेवण्यात आले असून, यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह घरखरेदीदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.
व्हायरल होत असलेला लॉकडाऊनचा व्हिडिओ सध्याचा नसून मार्च २०२० मधील कोविड-१९ काळातील आहे. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती.
प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातून उपनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम
ॲथलेटिक्स, शूटिंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक क्रीडा प्रकारात सुमारे २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/…/1FAIpQLSeeVvJ…/viewform या लिंकवर १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा मार्क धरमाई – ८८९८०९०९०७. प्रीती टेमघरे – ९०२९२५०२६८, अभिजीत गुरव – ८१०८६१४९११, मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, तसेच ई-मेल: mishanlakshvedhmumsub@gmail.com यावर संपर्क साधावा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत
दिशेने पुढचे पाऊल म्हणून ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २७ मार्च २०२६ रोजी नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. ADHO डॉ. निपटे सर, RMO डॉ. सुलोचना बागुल मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनय सोनवणे यांनी ब्रेन हेल्थ या विषयाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत, प्राथमिक स्तरावर मानसिक व मेंदूविषयक आरोग्य सेवा बळकट करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी ब्रेन हेल्थ संदर्भात जनजागृतीचे महत्त्व विषद करत, प्रत्येक व्यक्तीस या सेवांची आवश्यकता कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करून पुढील काळातही ही उपक्रमशीलता कायम ठेवण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी जिल्हा ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक ओजस भावसर यांनी कार्यक्रमाची मूलभूत माहिती, आतापर्यंत झालेली प्रगती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच CMF मानसी एंडोले व CMF अभिनव कोल्हे यांनीही या उपक्रमाविषयी माहिती देत त्याच्या अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबी मांडल्या.
प्रशिक्षण सत्रामध्ये ब्रेन हेल्थ क्लिनिक चे तज्ञ फिजिओ थेरपिस्ट डॉ. कल्याणी माळी, मानसोपचार समुपदेशक पूजा शर्मा उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिनेश वळवी, स्पीच थेरपिस्ट डॉ. कल्पेश चौधरी तसेच मुंबई येथील किंग जॉर्ज मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. ईश्वरी गुलहाणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ब्रेन हेल्थशी संबंधित विविध पैलूंवर सखोल प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनय सोनवणे व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे FMC श्री मनोज चौधरी आणि श्री निलेश शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रशिक्षणामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्रेन हेल्थ विषयक समज वाढून, रुग्णांना अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#NandurbarDistrict#नीतीआयोग#BrainHealth#MentalHealthAwareness#HealthyMindHealthyLife#BrainCare
SATHI पोर्टल, बियाण्यांची शुद्धता आता तुमच्या हातात!
आता बियाण्यांची गुणवत्ता तपासणे झाले अधिक सोपे! ![]()
SATHI पोर्टल आणि AgriStack Farmer ID च्या मदतीने शेतकरी आता बियाण्यांची शुद्धता, गुणवत्ता आणि संपूर्ण माहिती थेट मोबाईलवर पाहू शकतात. ![]()
ठळक फायदे:
उत्तम गुणवत्ता:
चांगल्या बियाण्यांमुळे उत्पादनात २०% पर्यंत वाढ.
फसवणुकीपासून संरक्षण:
बनावट व कालबाह्य बियाण्यांपासून सुरक्षितता.
QR कोड स्कॅनिंग:
बियाण्याचा दर्जा आणि उत्पादनाचा इतिहास त्वरित पाहा.
पूर्ण पारदर्शकता:
उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती ट्रॅक करा.
विशेष बाब:
AgriStack Farmer ID मुळे विक्री प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे.
आजच SATHI पोर्टलचा वापर करा आणि खात्रीशीर बियाण्यांची निवड करा!
अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.
अधिकृत संकेतस्थळ: https://seedtrace.gov.in
#SATHIPortal#SeedQuality#agritech#AgriStack#SmartFarming#maharashtragovt#कृषितंत्रज्ञान#स्मार्टशेती#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन
भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून इशारा
दिनांक: 31 मार्च 2026
वेळ: रात्री 10:00 वाजता
वैधता: पुढील 3 तास
यलो अलर्ट
जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी:
• अनावश्यक बाहेर जाणे टाळावे
• झाडे, वीज खांब व कमकुवत बांधकामांपासून दूर राहावे
• विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा
कृपया सतर्क राहा आणि अधिकृत सूचनांचे पालन करा.
हवामान_इशारा सतर्क_रहा
ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती आणि निधी खर्चाबाबत राज्य सरकारचे जिल्हा परिषदांना महत्त्वाचे निर्देश
राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ३० मार्च २०२६ रोजी विशेष परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
अलंकार बाळासाहेब कांचन आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या रिट याचिका क्र. २९१२/२०२६ च्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने १८ मार्च २०२६ रोजी काही आदेश दिले आहेत. सरपंचांऐवजी ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेबाबत हे आदेश आहेत. शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित विभागांना या न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निधी खर्चाबाबत पेच आणि उपाययोजना:
या परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या निधीबाबत आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत जर प्राप्त निधी खर्च झाला नाही, तर तो शासनाला समर्पित करावा लागतो. मात्र, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निधी खर्चाच्या अधिकारांबाबत तांत्रिक पेच निर्माण झाला होता.
यावर उपाय म्हणून, प्रलंबित निधी खर्च करण्याचे अधिकार संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) प्रदान करण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयात ‘सिव्हिल अॅप्लिकेशन’ दाखल करत आहे. जोपर्यंत न्यायालय यावर परवानगी देत नाही, तोपर्यंत न्यायालयाचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेशही अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिले आहेत.
बातमीचे ठळक मुद्दे:
उच्च न्यायालयाच्या १८ मार्चच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला निर्देश.
३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी सरकारकडून न्यायालयात धाव.
गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निधी खर्चाचे अधिकार देण्याबाबत विनंती करणार.
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना.
या निर्णयामुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांचा निधी अखर्चित राहून परत जाण्याची भीती काही प्रमाणात कमी झाली असून, सर्वांचे लक्ष आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे
द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश बैठकीतदिले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिल पर्यंत देण्यात यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात ११ एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी युक्त खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली : “जनगणना ही शासनाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून या कार्याची अचूकता व पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणातील सर्व बाबी आत्मसात करून जनगणना कार्य विहीत वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले.
जनगणना संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 ते 28 मार्च 2026 या कालावधीत जनगणना-2027 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, यावेळी होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून त्यासाठी तांत्रिक कौशल्य व अचूक माहिती संकलन अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक बाब बारकाईने समजून घेतली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जनगणना प्रक्रियेत लहानसहान त्रुटीदेखील भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व जनगणना अधिकारी, लिपीक व तांत्रिक सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती तसेच डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालय, मुंबई येथील सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे व चेतन गायधाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे व तहसिलदार संतोष आष्टीकर यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
जनगणना-2027 ही देशातील 16 वी व स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ती दोन टप्प्यांत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनगणना कार्य अधिक सक्षम व परिणामकारक होण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.



