Home माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

🗒️ ४ आणि ५ जून, २०२६

⏰ सकाळी : ७.२५ वाजता

📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.

Home महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक

नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ९ जणांचे १४ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येईल. ४ जून २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियुक्त केली असून त्यांचे नाशिक येथे आगमन झाले आहे. ते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण ६२२ मतदार असून मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. मतदारांना मत पत्रिकेवर आपला प्राधान्य क्रम नोंदवायचा आहे. त्यासाठी संबंधित मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

Home पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० अब्ज डॉलरच्या कराराद्वारे भारताला अमेरिकेचा गुलाम बनवले असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० अब्ज डॉलरच्या कराराद्वारे भारताला अमेरिकेचा गुलाम बनवले असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.

#FactCheck

#DGIPRFactCheck

सुंदर पिचाई यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या नावाने आणि एबीपी माझाच्या नावाचा गैरवापर करून ही खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’कडूनही या माहितीचे खंडन करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=1612609643989292&set=a.771947711388827

Home कृतिशील एसटी… गतिशील महाराष्ट्र…

कृतिशील एसटी… गतिशील महाराष्ट्र…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) ‘एक वृक्ष – एक जीवन’ संकल्प; ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त ७८ हजार वृक्षलागवड…

#वर्धापनदिन

#वृक्षारोपण

#Maharashtra

#MSRTC

#MahaDGIPR

Home नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसर विकासाला मिळणार चालना – पालकमंत्री जयकुमार रावल

नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसर विकासाला मिळणार चालना – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे : वीज कंपनीच्या नवीन उपकेंद्रामुळे साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरातील वीज सुविधा अधिक सक्षम होऊन विकासाला गती मिळणार असून शेती, घरगुती वापर तसेच भविष्यातील औद्योगिक गरजांसाठी मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

साक्री तालुक्यातील बळसाणे (सतमाने फाटा) येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ३३/११ के.व्ही. नवीन उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री श्री.रावल बोलत होते. यावेळी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बळसाणेचे सरपंच ज्ञानेश्वर हालोरे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व दर्जेदार होणार आहे. सिंचन, शेती, उद्योग, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट लाभ मिळेल. तसेच वीज यंत्रणेवरील ताण कमी होऊन भविष्यातील वाढती गरजही पूर्ण करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी पाणी, वीज आणि शेतीमालाला योग्य भाव या बाबींवर शासनाचा भर आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना शाश्वत विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे. विहिरी, बंधारे, सिंचन सुविधा आणि शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

परिसरातील वीजपुरवठा मजबूत करण्यासाठी बळसाणे येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात येत असून त्यासोबत मुख्य व जोडणी लाईनची कामेही केली जाणार आहेत. या उपकेंद्रामुळे बळसाणे परिसरातील बळसाणे, कढरे, सतमाने, आगरपाडा, दुसाने, इंदवे, हट्टी, ऐचाळे, डोंगराळे तसेच अन्य 3 पाड्यांसह एकूण १२ गावांना लाभ होणार आहे. शेती, घरगुती वापर तसेच आगामी औद्योगिक विकासासाठीही हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शिंदखेडा मतदारसंघात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. शिंदखेडा शहरासाठी १३२ के.व्ही.चे मोठे सबस्टेशन उभारण्यात आले असून, शिरपूर येथे २२० के.व्ही. सबस्टेशन दहिवद परिसरातही ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. धुळे जिल्ह्यात सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धुळे जिल्हा सोलर हब म्हणून विकसित होत असताना येथील सौरऊर्जेचा लाभ सर्वप्रथम जिल्ह्यातील नागरिकांना मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी बांधवांना सोलर पंपाची योजना लागू केली असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला. ‘कुसुम’ योजनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी सोलरचे हब निर्माण करण्यात येवून सोलर हबच्या माध्यमातून किमान 24 तास शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. धुळे जिल्हा हा भारतात सोलर हब म्हणून विकसित झाला आहे. सोलरची वीज बॅटरीमध्ये स्टोअर करता येईल का यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामांना गती मिळत असून अनेक ठिकाणी नवीन सबस्टेशन व वीज प्रकल्प राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातही जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले तर अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांनी प्रास्ताविक केले.

Home दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

सोलापूर: दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले काम म्हणजे त्यांच्यावरील कृपादृष्टी नसून तो त्यांचा हक्क आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बडे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन समितीच्या आढावा बैठकीत श्री. बडे बोलत होते. यावेळी उप आयुक्त श्रीमती एच. एस. गाढे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलभा वटारे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका योगेश डोके यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

दिव्यांग आयुक्त श्री. बडे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय विभागांनी दिव्यांग व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे, त्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा व काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यात समन्वय ठेवावा. दिव्यांगांना योजनांचा लाभ देऊन त्यांच्या तक्रारी येणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकूण निधीच्या 1% निधी दिव्यांग कल्याणासाठी ठेवणे अनिवार्य आहे. हा निधी खर्च करताना ग्रामविकास विभागाच्या 25 जून 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामविकास विभाग आणि नगर विकास विभागाने त्यांच्या मंजूर निधीच्या 5 टक्के निधी दिव्यांग योजनांसाठी राखीव ठेवावा, असे निर्देश दिव्यांग आयुक्त श्री. बडे यांनी देऊन सर्व बँकांनी दिव्यांगांसाठी आलेली कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावीत तसेच प्रत्येक बँकांना जास्तीत जास्त दिव्यांगाची प्रकरणे मंजूर करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून द्यावे, असेही त्यांनी सूचित केले.

ग्रामपंचायत विभागातील 1,026 ग्रामपंचायत अंतर्गत सन 2025-26 मध्ये पाच टक्के प्रमाणे दिव्यांगांसाठी 2 कोटी 74 लाखाच्या निधी ठेवून 2.61 कोटी निधी खर्च केलेला आहे. तसेच जिल्ह्यातील 17 नगरपालिका अंतर्गत 2589 असून त्यांच्यावर प्रतिवर्षी एक कोटी 14 लाखाचा खर्च करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. परंतु हा दिलेला लाभ कमी प्रमाणात असून ग्रामविकास व नगर विकास विभागाने आणखी मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांना वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना श्री. बडे यांनी दिल्या. तसेच लातूर जिल्ह्यात दिव्यांगांसाठी दोन सेंसरी पार्क उभारलेल्या असून सोलापूर जिल्ह्यात ही सेंसरी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी दिव्यांग श्री बडे यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभाग, नियोजन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, नगर विकास, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा अग्रणी बँक आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणावर काम करून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्रीमती वटारे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांगापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Home ७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे.

एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. अनेक संकटांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा देत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असून अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आज सलाम करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी परिवाराने यावर्षी ‘७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प’ केल्याची माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असून ‘एक वृक्ष – एक जीवन’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.

यासोबतच “स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर, एसटी बसेस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित करत मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

एसटी ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद करत त्यांनी आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा, आर्थिक शिस्त, हरित उपक्रम, स्वच्छता आणि प्रवासी-केंद्रित सेवा यांच्या माध्यमातून एसटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.

७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा संकल्प करून महाराष्ट्राच्या विकासात अधिक प्रभावी योगदान द्यावे, असे आवाहन करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक तसेच राज्यातील सर्व प्रवाशांना एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘चला, स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि सक्षम एसटी घडविण्याचा निर्धार करूया,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Home म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे शिष्टमंडळासह मुंबईत आगमन

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे शिष्टमंडळासह मुंबईत आगमन

मुंबई: म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग व त्यांच्या शिष्टमंडळाचे येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ११.३० वाजता आगमन झाले.राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, म्यानमारचे भारतीय राजदूत अभय ठाकूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मुंबई अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्यानमारचे महावाणिज्यदूत मोहनराव पिंपळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवर नियोजित स्थळी रवाना झाले.

Home ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

#विकसितमहाराष्ट्र

#MSRTC

Home अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोहिमेअंतर्गत २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे

अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोहिमेअंतर्गत २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे

बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणा चिक्की इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त केला.

अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड व नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती सांभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली.

संशयित कमी दर्जा /असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर अन्नपदार्थाच्या प्रकरणी ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक तक्रारीत नमूद भेसळ होणाऱ्या ठिकाणाचा वा आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची विशिष्ट माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांना केले आहे.

#FDA

error: Content is protected !!