Home महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Home नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ

नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ

हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने शासनाकडून महिला लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात येतो. शासन निर्णय क्र. मलोदि-२०१३/प्र.क्र.११/मकक दि. ४ मार्च २०१३ नुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.

याच अनुषंगाने मार्च महिन्यातील महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे होणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी, अडचणी व समस्या शासकीय यंत्रणेकडून ऐकून त्यावर मार्गदर्शन व सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध होण्यास मदत होते.

तक्रारदार महिलांनी आपल्या समस्यांबाबतचे तक्रार अर्ज घेऊन दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास महिलांना ऑनलाइन माध्यमातूनही तक्रार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन सहभागी होण्यासाठी महिलांनी दुपारी १.०० ते २.०० या वेळेत खालील लिंकवरून सहभागी होऊन आपली तक्रार मांडू शकतात:

https://meet.google.com/ber-wrvp-kmp

या महिला लोकशाही दिनात नोंदविण्यात येणारी तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, आस्थापना विषयक बाबी तसेच सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

#mahilalokshahidin#womenempowermentmovement#PublicGrievance#collectorofficenandurbar

Home आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ व जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ व जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र

विधानमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर सर्वपक्षीय महिला विधानमंडळ सदस्य व तज्ज्ञांच्या सहभागातून विशेष चर्चासत्र पार पडले.यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार मोनिका राजळे, आमदार मंजुळा गावीत, आमदार ज्योती गायकवाड, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, एम. एस. स्वामीनाथन फांऊडेशनच्या संस्थापक सौम्या स्वामीनाथन आणि सह संस्थापक नित्या राव उपस्थित होत्या.

महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आता ही शेती खऱ्या अर्थाने महिलांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वात प्रवेश करत आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करण्यात येईल. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन केल्यामुळे महिलांचे कृषी प्रश्न सोडविण्यास मदत होईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

केंद्र सरकारने २०२५ राष्ट्रीय कृषी संशोधन व शिक्षण प्रणालीमध्ये लिंग समानतेबाबत धोरण जाहीर केले आहे. महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणामध्येही शेतीतील महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यात महिला शेतकऱ्यांच्या हक्क व सक्षमीकरणासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. पुरुष रोजगाराच्या शोधात शहरांकडे गेल्यानंतर गावात राहणाऱ्या महिलांवर शेतीची संपूर्ण जबाबदारी येते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये महिला कुटुंबप्रमुख बनल्या आहेत. आज शेती क्षेत्रात सुमारे ८० टक्के महिलांचे योगदान असल्याचे विविध अभ्यासातून दिसून येते – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

भारतात ८१ टक्क्यांहून अधिक महिला प्रत्यक्ष शेती करतात. ७/१२ वर नाव असो वा नसो, घर आणि शेती खऱ्या अर्थाने महिलाच सांभाळतात. त्यामुळे महिलांना केवळ ‘होममेकर’ न म्हणता त्या शेती व्यवसायातील खऱ्या उद्योजक आहेत.

राज्य शासनाने आईचे नाव लावण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ग्रामीण भागातील महिलांना शेतीपूरक व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे – मंत्री पंकजा मुंडे

कृषी विभाग आणि महिला व बालविकास विभाग समन्वयाने काम करत शेती क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान लक्षात घेऊन त्यांना नवतंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्यांना शेती करताना तंत्रज्ञानाच्या उपयोगाने शेतीतून आर्थिक उन्नती साधता येईल – मंत्री आदिती तटकरे

हवामान बदल आणि आर्थिक अडचणींमुळे पुरुषांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीचा संपूर्ण डोलारा महिला सांभाळत आहेत. सिंचन आणि भूजल कायद्यात सुधारणा करून महिलांना पाण्याचे कायदेशीर अधिकार मिळावेत. महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (एफपीओ) कोल्ड स्टोरेज, सोलर ड्रायर आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ‘कृषी विकास निधी’ स्थापन करावा – नित्या राव, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन

#आंतरराष्ट्रीयमहिलादिन

#InternationalWomensDay2026

Home कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजना राबविली जाते.

कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजना राबविली जाते.

अंतर्गत सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत बोगस आयडी देण्यात आल्याची कोणतीही तक्रार नाही. तथापि असे निदर्शनास आल्यास त्याबाबत चौकशी करुन सामूहिक सुविधा केंद्रावर कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

विधानसभाप्रश्नोत्तरे

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने १५ दिवसांऐवजी सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचीही त्यांनी माहिती दिली. राज्यात सध्या खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना खताच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभाप्रश्नोत्तरे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने तत्काळ शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

उपरोक्त प्रश्नोत्तरांसंदर्भातील सविस्तर वृत्त – 👉🏾https://mahasamvad.in/193739/

अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

Home राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले.

राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले.

सर्वप्रथम राज्यपालांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.त्यांनतर राज्यपालांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे व प्रतीक कांबळे यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत भेट दिली.

त्यानंतर राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट दिली सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर व खजिनदार मंजिरी मराठे उपस्थित होते. स्मारकाच्या वतीने राज्यपालांना सावरकरांची प्रतिमा तसेच सावरकर विषयक ग्रंथ भेट देण्यात आले.

Home नंदुरबार येथे पशुसंवर्धन विभागाची एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा संपन्न

नंदुरबार येथे पशुसंवर्धन विभागाची एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तांत्रिक बाबींवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहा मोगी सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील पशुधनावर उद्भवणाऱ्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान विविध तांत्रिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. मिलिंद भणगे, सहाय्यक आयुक्त, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक; डॉ. स्वप्निल लोणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) आणि डॉ. रवी सोनकांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय (ता. नवापूर) यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सध्या सुरू असलेल्या लाल खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या आठव्या फेरीचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार गीते, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कार्यालय यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज पावरा, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार, श्री. राजेंद्र गावित, पशुधन पर्यवेक्षक, पशुचिकित्सालय गव्हाळी (ता. अक्कलकुवा), श्री. प्रवीण निकम, कनिष्ठ लिपिक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार तसेच श्री. लक्ष्मीकांत खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम आणि प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

#animalhusbandrydepartment#LivestockHealth#VeterinaryServices#collectorofficenandurbarजिल्ह्यातील पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तांत्रिक बाबींवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत एकदिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद नंदुरबार येथील याहा मोगी सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. चंद्रकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील पशुधनावर उद्भवणाऱ्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी तसेच पशुधन पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेदरम्यान विविध तांत्रिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. मिलिंद भणगे, सहाय्यक आयुक्त, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक; डॉ. स्वप्निल लोणकर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) आणि डॉ. रवी सोनकांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय (ता. नवापूर) यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सध्या सुरू असलेल्या लाल खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या आठव्या फेरीचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार गीते, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कार्यालय यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज पावरा, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार, श्री. राजेंद्र गावित, पशुधन पर्यवेक्षक, पशुचिकित्सालय गव्हाळी (ता. अक्कलकुवा), श्री. प्रवीण निकम, कनिष्ठ लिपिक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नंदुरबार तसेच श्री. लक्ष्मीकांत खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम आणि प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

#animalhusbandrydepartment#LivestockHealth#VeterinaryServices#collectorofficenandurbar

Home शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

मुंबई:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) घेण्यात आली. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://puppssmsce.in  या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन १० ते १७ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात करता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये ऑब्जेक्शन ऑन क्वेशन पेपर अँड इंटेरिम ॲन्सर की या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Home नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई: संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी, सायं. ६:३० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशावर आधारित संगीत, कथन आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

विविध कलाकारांच्या सहभागातून हा कार्यक्रम रंगणार असून प्रेक्षकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Home जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार

जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार

नशेला नकार देऊया.

#जागतिक_धुम्रपान_विरोधी_दिन

Home राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती

राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती

राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली असून वित्त विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानपरिषदलक्षवेधी

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात अमेरिकेतील किंवा लंडनमधील प्रसिद्ध उद्यानांपेक्षाही अधिक आकर्षक आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे असे उद्यान उभे राहावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मते विचारात घेतली जाणार आहेत. स्थानिक आमदारांकडून प्राप्त लेखी सूचनांचा अभ्यास करून त्यातील योग्य बाबींचा समावेश केला जाईल.

विधानपरिषदलक्षवेधी

सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

चालू वर्षी राज्यात पाऊस दीर्घकाळ पडल्याने तसेच काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी ऊसाच्या वजनात घट झाल्याचे आढळून आले आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्तालयामार्फत जिल्हास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच वैधमापन विभागामार्फत हंगाम सुरू होण्यापूर्वीच वजनकाट्यांची तपासणी करून त्यांना सील करण्यात येते, असे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त वाचा👉🏽https://mahasamvad.in/193596/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६#अर्थसंकल्पीयअधिवेशन#MahaBudgetSession#MahaBudgetSession2026

error: Content is protected !!