‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ ची वैशिष्टये ![]()
किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक क्षमता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे.
या मोहिमेत ५० टक्के महिला सहभागी आहेत
सामाजिक सहभागाच्या माध्यमातून ५२ किनारी गावांना ‘तटप्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले आहे.
किनारी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले.
मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?
परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-२०२६
मतदार बंधू-भगिनींनो, आपले प्रत्येकी एक मत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) आणि पंचायत समिती निर्वाचक गणासाठी (गण) अवश्य द्या!
दि. ७ फेब्रुवारी २०२६ | वेळ : सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वा.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी तालुका क्रीडा संकुल, अंबरनाथ येथे भेट देऊन तेथील पाहणी केली व आवश्यक ते मार्गदर्शन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तहसिलदार अमित पुरी, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, रुही शिंगाडे आणि क्रीडा विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
#Thane#UpdateCMOMaharashtraMaharashtra DGIPRCollector ThaneDdikonkan Konkanbhavan
“हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी समागम शताब्दी कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
त्या तयारीच्या अनुषंगाने आज मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक संपन्न होत आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे उपस्थित आहेत.
#HindDiChadar#Thane#UpdateCMOMaharashtraMaharashtra DGIPRCollector ThaneHind Di Chadar MaharashtraDdikonkan Konkanbhavan
पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे
मुंबई:- राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.
राज्यात औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण ८,९६९ एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्याने २०,४३१ एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी येत असून उद्योजकांना लागणाऱ्या जागेचा विचार करुन एमआयडीसीने एक लाख एकर जागा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मुंबई-पुणे-नागपूर बरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी भागांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत आहे. यादृष्टीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विविध जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनाबरोबरच ‘एमएसआरडीसी’कडील शक्तिपीठ एक्स्प्रेस वे, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, नागपूर-गोंदिया एक्स्प्रेस वे, भंडारा-गडचिरोली एक्स्प्रेस वे, नागपूर चंद्रपूर एक्स्प्रेस वे, नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर, जालना नांदेड एक्स्प्रेस वे आदी प्रकल्पांच्या सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतील, असे नियोजन करावे. यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी. त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचे भूसंपादन करुन ती उद्योजकांना उपलब्ध करुन द्यावीत. याशिवाय, विविध विभागाकडील शासकीय जमिनी औद्योगिक वापरासाठी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करावा, यामुळे उद्योजकांना कमी दरात भूखंड उपलब्ध होऊन राज्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी, कोकणातील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान कुठेही वन जमिनीचे संपादन केले नसल्याची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त गोंडपिंपरी औद्योगिक क्षेत्रात उद्योजकास जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव मान्यतेसाठी प्राप्त झाला आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
बैठकीत ‘एमआयडीसी’ आणि ‘एमएसआरडीसी’च्या वतीने विविध ठिकाणी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
अमरावती: जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच लवकर निदान व योग्य उपचारांचे महत्त्व रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. अतुल यादगिरे, डॉ. रोहित मुंदडा , डॉ. माधुरी गाडेकर तसेच ऑन्को गायनॅकोलॉजिस्ट डॉ. भावना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कर्करोगाचे प्रकार, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. अतुल यादगिरे यांनी कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे नमूद केले. डॉ. रोहित मुंदडा यांनी बदलती जीवनशैली, तंबाखूचे सेवन व चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे सांगितले. डॉ. माधुरी गाडेकर यांनी रक्तामधील कर्करोगांविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांनी नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ आदित्य भागवत यांनी कीमोथेरेपी बद्दल मार्गदर्शन केले.
सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग शस्त्रक्रिया मोफत होतात याबद्दल देखील माहिती देण्यात आली .
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला उपस्थित डॉ आयुष हेडा , डॉ रणजित मांढवे, डॉ भूषण मुंदडा, डॉ अमित बागडिया, डॉ तृप्ती जवादे, डॉ सत्यम सत्यार्थ, डॉ मनीष नाथणकर, डॉ तेजश्री कीनखेडे, डॉ अलकेश गुल्हाने, डॉ किरण परिसे, डॉ ऐश्वर्या , डॉ अभिनव, डॉ स्नेहल चव्हाण, डॉ सपना गुप्ता, नर्सिंग स्टाफ मंगल मगरदे, ज्योती काळे, कविता बेरड, शालू केवाळे, नंदा टेटु, एनसीडी विभागातील दिनेश हिवराळे यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर संपन्न
अमरावती: धावपळीच्या जीवनशैलीत पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अमरावतीतील पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आज एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 226 पत्रकारांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
पत्रकारिता हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे. सततची धावपळ, कामाच्या अनिश्चित वेळा आणि मानसिक ताण यामुळे पत्रकारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. ही गरज ओळखून पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून सर्वांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील चरबीचे प्रमाण तपासण्यासाठी संपूर्ण ‘लिपिड टेस्ट’, तसेच ‘फुल बॉडी चेकअप’ करण्यात आले. वाढत्या डिजिटल कामामुळे डोळ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन विशेष ‘नेत्र तपासणी’ आणि ‘दंत चिकित्सा’ शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉ. श्याम गावंडे, ससंसर्गजन्य रोग विभागाचे डॉ. प्रज्ञा कडू, वैभव झुकरे, पल्लवी बोरकर, श्रद्धा कडू, टीबी हॉस्पीटलचे नितीन बेदरकर, शुभांगी उमरकर, दंत महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. अपूर्वा रोडे, डॉ. जान्हवी अंबाडकर, डॉ. पूजा शिंदे, डॉ. वेदश्री भडवे, डॉ. प्रितीका काळे, डॉ. अमिषा जुनघरे, डॉ. इशान पाटील, प्रमोद बकाडे, सुभाष दिघेकर, वैद्यकीय चमूतील डॉ.रूपाली ठाकरे, डॉ. प्रज्ञा चौधरी, डॉ. वैभव देशमुख, धीरज राऊत, संजीवनी सोनवणे, डॉ. नायब शेख आदी यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे शशांक चौरे यांनी पुढाकार घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये पत्रकारांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी 48 पत्रकारांना आयुष्मान भारत कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. या कार्डमुळे पत्रकारांना भविष्यात विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा अन्य कारणांमुळे श्वास थांबल्यास व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या विषयावर यावेळी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉ. राधा सावदेकर प्रात्यक्षिक देऊन उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.
अशा स्वरूपाच्या आरोग्य तपासणीमुळे पत्रकारांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शिबिरामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
ऊर्जा परिवर्तनातील कामगिरी; महावितरणला हरित ऊर्जा शिखर परिषदेत मानाचा पुरस्कार
नंदुरबार: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत राहून महावितरणकडून हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे. यासह इतर कामगिरीची दखल घेऊन १४ व्या हरित ऊर्जा शिखर परिषदेत महावितरणला हरित ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता उत्कृष्टता पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. ४) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित या शिखर परिषदेचे अध्यक्ष व केंद्रीय ऊर्जा सचिव (सेवानिवृत्त) श्री. अनिल राजदान यांच्याहस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर तसेच श्री. मोहन मुजूमदार व श्री. शुभम चोरमले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्याच्या वीज क्षेत्रासाठी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होईल. तसेच सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे.
या नियोजनाला अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे.
ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ३५२० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्यातून ९ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर देशात सर्वाधिक ८ लाखांवर सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहे. यासह प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत राज्यात ४ लाख ४३ हजारांवर घरगुती ग्राहकांकडे १७३३ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे व त्यांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.



