परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
उद्घाटन सत्राला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद, CSRBOX चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह आणि Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या-तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नाविन्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी
ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडेमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा.एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.
सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी १०० टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पसकडून उचलण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना
स्वयंसहाय्यता बचतगटाने १० टक्के हिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान देण्यात येते. अनुदान मर्यादेच्या अधिकच्या रकमेचा, क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केल्यास अधिकचा खर्च बचतगटास करावा लागतो.
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक च्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार (२७ फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे.
संमेलनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित करण्यात येत असलेल्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकासह विविध विभागांची एकूण ३३ विषयांवरील दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज झाली आहेत.
या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी व पर्यटकांनी या दालनांना अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार
नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी ३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मुंबई उपनगर यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणारी व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर (चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पूर्व) ४०००७१ येथे उपलब्ध असून दि. ३ मार्च २०२६ सायं. ५ पर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणेकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अजमेर, राजस्थान येथून ‘गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ’ करण्यात आला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#कर्करोग#गर्भाशयकर्करोग#कॅन्सर#HPVVaccination#Cancer
मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे
विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस आहे, अशा शब्दात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला.
उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून जगभरात विविध देशांमध्ये कार्यरत असलेले मराठी बांधव आपण एकत्र आणण्याचे काम केले आहे. अशा या समृद्ध मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे.
प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा उपयोग करीत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने आयोजित ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.. सर्वजण या महान शौर्यगाथेचे भागीदार होऊया…
दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत…
ओवे मैदान सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’ च्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोहयो मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



