Home महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा ७ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा ७ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही अर्ज करू शकतात, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.या परीक्षेसाठी उमेदवार १ जानेवारी २०२७ रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. यासाठी वयोमर्यादा ११ वर्षे सहा महिने ते १३ वर्षे अशी असून जन्मदिनांक २ जानेवारी २०१४ ते १ जुलै २०१५ दरम्यान असावा. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाईन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मागविता येणार असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी शुल्क ६०० रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीसाठी ५५५ रुपये आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.

पूर्ण भरलेले अर्ज ५ एप्रिल २०२६ पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिवाजीनगर, पुणे येथे स्पीड पोस्टाने किंवा समक्ष जमा करावेत. अर्ज थेट डेहराडून येथे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.

Home मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून पोलीस दलाचे अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून पोलीस दलाचे अभिनंदन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (X) या समाजमाध्यमावरून गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करत ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनात घर केलेल्या भीतीवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, दुर्गम व अतिदुर्गम भागात माओवाद्यांकडून उभारण्यात आलेली ही स्मारके स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उभी करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण व ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, प्रभावी आत्मसमर्पण धोरण, पायाभूत विकास प्रकल्प आणि स्थानिक नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक दिशेने बदलत आहे.

या संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दल, सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या सुमारे ८०० जवानांनी नियोजनबद्ध शोध व तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या सखोल तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ४४ स्मारके नेस्तनाबूत करण्यात आली. एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील अतिसंवेदनशील भागांत ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

ज्या ठिकाणी पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते, त्या ठिकाणी आता प्रशासनावरील विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि विकासाची आशा दृढ होत असल्याचे चित्र आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक मानली जात असून, भीतीपासून विश्वासाकडे आणि हिंसेपासून विकासाकडे होत असलेल्या संक्रमणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे.

Home रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल

रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल

वर्धा: सध्याचे युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचे आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भविष्याचे नियोजन करुन रोबोटिक व स्टिम लॅब सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील पाच शाळांच्या अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

कर्वे समाज सेवा संस्था पुणे, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने बेंन्टलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. यांच्या सीएसआर निधितून नगर परिषदेच्या वसंत प्राथमिक शाळेत रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, बेंन्टलर ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद गणगणे, कर्वे समाज सेवा संस्थेचे डॉ.महेश ठाकूर, नगरसेवक सचिन होले, सोनल त्रिवेदी, युगांत कुंभलकर, मुध्याध्यापिका प्रणीता आखतकर, डॉ. चंदु पोपटकर आदी उपस्थित होते.

कर्वे शिक्षण संस्था समाजसेवेचे काम करित आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम सुरू आहे. वसंत प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी 25 लक्ष निधी उपलब्ध करुन दिला, असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

रोबोटिक आणि स्टीम लॅब या शालेय आणि तांत्रिक शिक्षणातील आधुनिक प्रयोगशाळा आहेत‌; ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून रोबोटिक्स, कोडिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिकवतात. कोडिंग सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी स्वतः रोबोट्स डिझाइन, प्रोग्राम आणि तयार करतात, ज्यामुळे सर्जनशीलता, समस्या निवारण आणि भविष्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

यावेळी मुकुंद गणगणे व डॉ.महेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरूवातीस पालकमंत्र्यांनी फित कापून रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन करुन पाहणी केली.

Home होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने ६७ कोटी निधी मंजूर – मंत्री भरत गोगावले

होळीनिमित्त मनरेगा मजुरांसाठी तातडीने ६७ कोटी निधी मंजूर – मंत्री भरत गोगावले

मुंबई:  होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

`महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट, पालघर तसेच इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

19 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने राज्याच्या 13 कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारित 16 कोटी मनुष्यदिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाईल, असेही मंत्री गोगावले स्पष्ट केले.

Home प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख – सुमनेश जोशी

प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख – सुमनेश जोशी

मुंबई: डिजिटल युगात डेटा हीच खरी शक्ती असून प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचे उपमहासंचालक  सुमनेश जोशी यांनी सांगितले.भारतीय लोकप्रशासन संस्था  महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी परिषद सभागृहात आयोजित “डिजिटल गव्हर्नर मेड सिंपल व्हॉट एव्हरी ऑफिस मस्टनो” या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भारतीय लोकप्रशासन संस्था  महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय, मानद खजिनदार  विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे, यांची उपस्थित होते.

सुमनेश जोशी म्हणाले, कागदी फाईल्सऐवजी डिजिटल वर्कफ्लो, नोंदवहींऐवजी डॅशबोर्ड आणि विलंबाऐवजी रिअल-टाइम मॉनिटरिंगकडे प्रशासनाची वाटचाल झाली आहे.

डेटा संरचना, अचूक डेटा संकलन, पेपरलेस कामकाज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या वापरावर त्यांनी भर दिला. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) ला डिजिटल महामार्गाची उपमा देत आधार आणि एमआधार ॲपद्वारे डेटा सुरक्षित ठेवण्याबाबत माहिती त्यांनी दिली. तसेच सायबर सुरक्षेसाठी ‘संचार साथी’ पोर्टल वापरण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणार्थी आणि शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना डिजिटल गव्हर्नन्स या विषयाबाबत भविष्यात काही नवीन प्रश्न, शंका, मुद्दे उपस्थित झाल्यास फोन करून ईमेल पाठवून केव्हाही विचारू शकता असे जोशी यांनी यावेळी सांगितले.

Home राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय प्रवेश;  ७ जून रोजी परीक्षा

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय प्रवेश;  ७ जून रोजी परीक्षा

मुंबई: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा 7 जून 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही अर्ज करू शकतात, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी उमेदवार 1 जानेवारी 2027 रोजी इयत्ता सातवीमध्ये शिकत असावा किंवा सातवी उत्तीर्ण असावा. यासाठी वयोमर्यादा 11 वर्षे सहा महिने ते 13 वर्षे अशी असून जन्मदिनांक 2 जानेवारी 2014 ते 1 जुलै 2015 दरम्यान असावा. या परीक्षेसाठीचे अर्ज ऑनलाईन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मागविता येणार असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी शुल्क 600 रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीसाठी 555 रुपये आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.

पूर्ण भरलेले अर्ज 5 एप्रिल 2026 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, शिवाजीनगर, पुणे येथे स्पीड पोस्टाने किंवा समक्ष जमा करावेत. अर्ज थेट डेहराडून येथे पाठवू नयेत. अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त महेश चोथे यांनी केले आहे.

Home एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: एसटीच्या सुमारे ८६  हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे शासनाने ती जबाबदारी उचलावी. अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी केली होती. त्यानुसार त्यांच्या अनुमतीने  दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला देण्याचे बैठकीमध्ये ठरले होते.

थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत देण्यास सुरुवात झाली. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे थकीत हप्ता न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात नाराजी पसरली. अशा परिस्थितीत काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून परिवहन मंत्री तथा  एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचीशी चर्चा करून या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत, अशी विनंती केली. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे त्या २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले असून उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाच्या वतीने दिले आहे.

त्याचप्रमाणे, सध्या दहावी व बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Home ‘हिंद-दी-चादर’शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’मध्ये रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

‘हिंद-दी-चादर’शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’मध्ये रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांत “हिंद-दी-चादर”  श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी 350 व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत बुधवार, 25 आणि गुरूवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येणार असून ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका शिबानी जोशी यांनी केले आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 2025-26 हे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.  या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी अंदाजे 10 लाख भाविक नवी मुंबई मध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी व्यवस्था तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांशी कशा प्रकारे समन्वय साधण्यात येत आहे. याबाबत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Home एआय  फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय  फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’() ही परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार,वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

एआय  फार ॲग्री २०२६  ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम,एफएओ,युएनडीपी,आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (ADB), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर इी सेमी ॲरीड ट्रापीक्स(ICRISAT), भारतीय विज्ञान संस्था (IISc), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.

दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल.सकाळी १० ते ११.२० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होईल. जस्मीन हॉल येथे कृषि क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर करून लिंग आधारित  डिजिटल दरी भरून काढणे मिटींग रुम २०४ मध्ये ‘कृषी उत्पादनासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI): लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलबजावणी “ आणि मिटींग रूम २०२ मध्ये ‘संस्थात्मक वित्तपुरवठा माध्यमातून संरचनात्मक आराखडा तयार करूनएआय फॉर ॲग्रीला गती देणे “या तीन विषयावर एकाच वेळी चर्चासत्र होतील.सकाळी ११.२० ते ११.३० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल.सकाळी ११.३० ते १ वाजून ५ या वेळेत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय  कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सचिव देवेश चतुर्वेदी, मुख्य सचिव. राजेश अग्रवाल, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर , डिजीटल एफएओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देजान जाकोवेजिक, सीफोरआयर इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण , आयएफएडीच्या आयसीटीच्या तांत्रिक कायदेशीर सल्लागार बेंड्रा गुंडे,युनडीपीच्या निवासी सल्लागार डॉ.ॲजेला लुसिगी यांची  व्याख्यान होणार आहेत.

दुपारी २ ते २.५० या वेळेत एच. टी. पारेख फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख,केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महासंचालक, आयसीएआर आणि सचिव (डीएआरई) डॉ. मांगी लाल जाट, इंडिया अल मिशन, अतिरिक्त मिशन संचालक आणि सीईओ अभिषेक सिंह,एडीबी इंडिया रेसिडेंट मिशन श्रीमती मियो ओका कंट्री डायरेक्टर, कंट्री संचालक मिया ओका,यूएन वुमनच्या कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह इंडिया श्रीमती कांता सिंह यांची व्याख्यान होतील.

कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ ते ४.१० या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री  इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्र सिंह,कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,इंडिया एआय मिशनचे अतिरिक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह,अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाएजिक्स , भिली आदिवासी भाषा मोठ्या भाषा मॉडेल (LLM) चे लाँचिंग  इव्हेंट, महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी , वनस्पतींचे कीटक व रोग ओळख या विषयी सामन्जस्य करार होणार

दुपारी ५ ते ५.३० या वेळेत जस्मीन हॉल येथे मूल्य साखळी ओलांडून : समावेशकता, शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढवणे   , मिटींग रूम २०४ येथे एफॉर ॲरन साठी सामायिक डिजिटल पाया निधीची तरतूद करणे, मिटींग रूम २०२ येथे “स्टॉर्टअप साठी नव्या संधी “ या विषयावर व्याख्यान होतील.

दुपारी ५.३० ते ७.३० या वेळेत “महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज : सुरक्षित, कृषी नवोपक्रमाला गती देणे, “एफपीओ शेतीमधील स्टार्टअप्ससाठी प्रवेशद्वार”या विषयावर मिटीम रूम २०४ येथे व्याख्यान होतील. एआय कन्व्हर्जन्स मार्ग: उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर मिटींग रूम २०२ मध्ये व्याख्यान होतील.संध्याकाळी ७.३० ते ९.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २३  फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जॅस्मिन  हॉल येथे  “कृषी क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक यांची जागतिक स्थिती” या विषयावर त्याचवेळी मीटिंग रूम २०४ मध्ये “डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार” या विषयावर तर मीटिंग रूम २०२ मध्ये “ “समानतेसाठी कोडिंग : लिंग-आधारित  कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय” या विषयावर चर्चा होणार आहे.

दुपारी १२ ते १ या वेळेत जॅस्मिन 1 सभागृहात “कृषी-एआय भविष्यकालीन गुंतवणूक : गुंतवणूक, बाजारपेठ व विस्तारक्षम नवकल्पना” या विषयावर ,मीटिंग रूम २०४ मध्ये “सुरक्षा, पारदर्शकता व जोखीम व्यवस्थापन यंत्रणा” या विषयावर, तर मीटिंग रूम 202 मध्ये “दूरसंवेदन व स्थानिक बुद्धिमत्तेद्वारे मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन” या विषयावर चर्चा होणार आहेत.

दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत जॅस्मिन 1 सभागृहात “जागतिक एआय-सक्षम कृषी संशोधन नेटवर्कची  उभारणी”या विषयावर,. मीटिंग रूम 204 मध्ये “‘तिच्यासाठी सह-रचना’ : भारत व जागतिक स्तरावर महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक एआय उपाय” या विषयावर. तर मीटिंग रूम 202 मध्ये “कृषी क्षेत्रातील जनरेटिव्ह एआय” या विषयावर चर्चा सत्र होणार आहेत. दुपारी 3.30 ते 5.00 या वेळेत ‘गुंतवणूक चर्चा’,सायंकाळी 5.00 ते 5.30 या वेळेत समारोप सत्र,  एआयफॉर अॅग्री 2027 परिषदेच्या थीमची घोषणा करण्यात येणार आहे.

Home रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

जय भवानी, जय शिवाजी!

error: Content is protected !!