Home शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

मुंबई:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) घेण्यात आली. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in  व https://puppssmsce.in  या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन १० ते १७ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात करता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये ऑब्जेक्शन ऑन क्वेशन पेपर अँड इंटेरिम ॲन्सर की या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Home नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई: संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी, सायं. ६:३० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशावर आधारित संगीत, कथन आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

विविध कलाकारांच्या सहभागातून हा कार्यक्रम रंगणार असून प्रेक्षकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Home जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार

जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार

नशेला नकार देऊया.

#जागतिक_धुम्रपान_विरोधी_दिन

Home राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती

राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती

राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली असून वित्त विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानपरिषदलक्षवेधी

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात अमेरिकेतील किंवा लंडनमधील प्रसिद्ध उद्यानांपेक्षाही अधिक आकर्षक आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे असे उद्यान उभे राहावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मते विचारात घेतली जाणार आहेत. स्थानिक आमदारांकडून प्राप्त लेखी सूचनांचा अभ्यास करून त्यातील योग्य बाबींचा समावेश केला जाईल.

विधानपरिषदलक्षवेधी

सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

चालू वर्षी राज्यात पाऊस दीर्घकाळ पडल्याने तसेच काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने काही ठिकाणी ऊसाच्या वजनात घट झाल्याचे आढळून आले आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर आयुक्तालयामार्फत जिल्हास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच वैधमापन विभागामार्फत हंगाम सुरू होण्यापूर्वीच वजनकाट्यांची तपासणी करून त्यांना सील करण्यात येते, असे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त वाचा👉🏽https://mahasamvad.in/193596/

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६#अर्थसंकल्पीयअधिवेशन#MahaBudgetSession#MahaBudgetSession2026

Home नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला.

नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला.

कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

Home प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात

प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात

(नंदुरबार) “जमिनीचा ‘सातबारा कोरा’ असेल तर व्यवहार पारदर्शक व सुरक्षित होतात; त्याचप्रमाणे प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये पारदर्शक संवाद असेल तर शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो. महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’ असतो,” तो कोरा आणि पारदर्शक असेल तर शासनाची प्रतिमाही स्वच्छ मानली जाते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले.

महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी डायट संस्थेत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना येणाऱ्या अडचणी, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी दिले. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या प्रशिक्षण सत्रात प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील प्रभावी समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगूर्डे, तहसीलदार पंकज पाटील, तहसीलदार संतोष डेरे उपस्थित होते.

व्याख्यानाच्या सुरुवातीला बोलताना राजपूत यांनी महसूल अभिलेखातील ‘7/12’ उताऱ्याचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केले. “सातबारा कोरा” म्हणजे जमिनीचा स्वच्छ आरसा, असे सांगताना त्यांनी नमूद केले की महसूल अभिलेखातील ‘7/12’ उतारा हा जमिनीचे ओळखपत्र मानला जातो. या उताऱ्यावर कर्ज, तारण, वाद, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारचा बोजा नसणे म्हणजेच “सातबारा कोरा” होय. अशा जमिनीवर मालकी हक्क निर्विवाद असतो आणि व्यवहार करताना खरेदीदार, बँक किंवा प्रशासन यांचा विश्वास अधिक दृढ होतो.

ते पुढे म्हणाले की जमीन खरेदी-विक्री, कर्जप्रक्रिया किंवा वारसा नोंदणी करताना सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न एकच असतो, “सातबारा कोरा आहे का?” कारण कोरा सातबारा म्हणजे सुरक्षित व्यवहार, स्पष्ट मालकी आणि भविष्यातील वादांपासून दिलासा. जमिनीच्या व्यवहारातील ही पारदर्शकता जशी महत्त्वाची आहे, तशीच पारदर्शकता प्रशासनाच्या कामकाजातही आवश्यक आहे. म्हणूनच महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ आणि विश्वासार्ह प्रतिमेचा ‘7/12’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन आणि माध्यमांच्या कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की प्रशासनात कोणताही निर्णय घेण्यासाठी पंचनामा, कागदपत्रे, अहवाल आणि वरिष्ठांची मंजुरी अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी वेळ लागतो. दुसरीकडे माध्यमांना घटनांची माहिती तात्काळ देण्याची आवश्यकता असते. या दोन्ही प्रक्रियांमध्ये योग्य समन्वय साधला गेला नाही तर अनेकदा अपूर्ण माहितीवर आधारित बातम्या प्रसिद्ध होऊन गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबतही त्यांनी विशेष उल्लेख केला. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, युट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांवर अप्रमाणित माहिती वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये चुकीच्या धारणा, अपेक्षा निर्माण होतात. अशा वेळी महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी अधिकृत माहिती स्पष्टपणे मांडून अफवांना आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महसुली नोंदी, जमीनविषयक प्रकरणे, अतिक्रमण किंवा विविध शासकीय योजनांबाबत माध्यमांकडून वारंवार माहिती मागितली जाते. अशावेळी कोणती माहिती तात्काळ देता येते आणि कोणती माहिती कायदेशीर प्रक्रियेनंतरच देणे आवश्यक असते, याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माध्यमांशी संवाद साधताना संयमित व वस्तुनिष्ठ भूमिका ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रशासन-प्रसारमाध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी तहसील स्तरावर अधिकृत माहिती देवाणघेवाण व्यवस्था निर्माण करणे, जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तथ्याधारित प्रसिद्धीपत्रके देणे आणि अफवांवर त्वरित स्पष्टीकरण देण्याची प्रणाली विकसित करणे या उपाययोजना उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

दृष्टीकोन आणि जबाबदारीची जाणीव महत्त्वाची

अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आवश्यक असलेली दृष्टी आणि जबाबदारीची जाणीव अधिक स्पष्ट झाली. प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील सकारात्मक समन्वयामुळे शासनाच्या योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी व्यक्त केला.

Home देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती

देशभरातील उद्योजकांचा संगम, नंदुरबारची दमदार उपस्थिती

परिषदचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी ६०० हून अधिक सहभागींना मार्गदर्शन करत उद्योजकतेचे महत्त्व, नवकल्पनांची गरज आणि युवकांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. देशातील २० राज्यांमधून उद्योजक, नवउद्योजक, महिला उद्योजक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील तज्ज्ञांनी परिषदेला उपस्थिती नोंदवून उद्योजकतेसंबंधी सूक्ष्म व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत महिला व युवकांमध्ये उद्योजकता विकसित करणे, स्टार्टअप्स घडवणे तसेच समाज व अर्थव्यवस्थेतील उद्योजकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. बिझनेस पिचिंग कॉम्पिटिशन हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरले.

परिषदेत विक्री प्रदर्शन (Exhibition) देखील भरविण्यात आले होते. देशातील २० राज्यांतील उद्योजकांनी आपले स्टॉल्स उभारून नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना, उत्पादने व स्टार्टअप मॉडेल्स सादर केली. यामुळे उपस्थितांना विविध क्षेत्रांतील नवउद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

नंदुरबार जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग:

नंदुरबार जिल्ह्यातून एकूण २७ उद्योजकांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. आयोजकांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. या स्टॉलवर पुढील उद्योजकांनी आकर्षक पद्धतीने आपली उत्पादने मांडली—

मयुरी खाकरा – सक्षम गृह उद्योग

शिवशक्ती हळदी पावडर

नर्मदा पुनर्वसन मशरूम उद्योग

राजेश्वरी मिरची पावडर

मोगी भोग मोहा लाडू

विश्वाची परिवार तांदूळ विक्री व्यवसाय

कालो कुणबी सेवाभावी संस्था

श्री बद्री केदार प्रायव्हेट लिमिटेड

विशाल ट्रायबल पावडर

सूर्यदर्शन फार्म प्रोड्युसर कंपनी

वेद ऊर्जा हेअर ऑइल सोल्युशन

समर्थ ग्रुप उद्योग – पुरणपोळी रिमिक्स

प्रतीक चार्टकोण – मिलेट चार्ट (झिरो वेस्ट)

मीनाक्षी आर्ट अँड क्राफ्ट

बिझनेस पिचिंग स्पर्धेत नंदुरबारची घवघवीत कामगिरी:

नंदुरबार जिल्ह्यातून १५ उद्योजकांनी बिझनेस पिचिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यामधून फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील पुढील तीन उद्योगांची निवड करण्यात आली—

मयुरी मिलेट्स – रागी लड्डू : मयुरी राजेश निकुंबे

श्री बद्रीकेदार प्रायव्हेट लिमिटेड : वैभव रघुवंशी

विशाल ट्रायबल पावडर : विशाल माधव वसावे

वरील तिघांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमास जिल्हा प्रशासन नंदुरबार, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, नंदुरबार, निती आयोगचे विशेष सहकार्य लाभले.

या संपूर्ण उपक्रमाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक व टीम लीडर शिवाजी परमार, NITI Fello वैष्णवी रामदोहकर, CYDA, YEFi, Youthaid Foundation यांनी प्रभावी नेतृत्व केले. National YESummit 9th ही परिषद युवकांसाठी प्रेरणादायी ठरली असून ग्रामीण व आदिवासी भागातील उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.

YouthAid Foundation

#NationalYesummit#YouthEntrepreneurs#WomenEntrepreneurs#DrMittaliSethi#MSME#TribalEntrepreneurship#collectorofficenandurbar

Home ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. ता.शहादा जि.नंदुरबार

ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. ता.शहादा जि.नंदुरबार

पारंपरिक माती मणी उद्योगातील इंधनटंचाई, बाजारपेठेचा अभाव व शासनमान्यतेअभावी येणाऱ्या अडचणी संशोधनातून पुढे आणल्या. MSFDA आणि Indian Institute of Technology मुंबई यांच्या “आपले प्रश्न – आपले विज्ञान” उपक्रमांतर्गत नर्गुस मन्यार व मोगी वळवी या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रशासनासमोर मांडणी केली.

महाविद्यालयाच्या पुढाकारामुळे प्रशिक्षण कार्यक्रमास चालना मिळाली तसेच उद्योगाला “नवीन उद्योग” म्हणून मान्यता मिळविण्यासाठी Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University येथील KCIIL विभागाशी स्टार्टअप प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण युवक-युवतींना पूरक उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

प्रशिक्षणाचे आयोजन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था आणि ATMA नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथील नवोपक्रम व इनक्युबेशन कक्षाचा महत्त्वाचा पुढाकार आहे.

या प्रशिक्षणातून कौशल्य, सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची सांगड घालत ग्रामीण युवक-युवतींना शाश्वत उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

#traditionalknowledge

#SDGgoals

#aspirationalblock

#AspirationalDistrict

#namamisatpudamission

#GVS

#fishing

#livelyhood

#pmo

#cmo

#hmpatil

Home सिंगपूर (ता. अक्कलकुवा) येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

सिंगपूर (ता. अक्कलकुवा) येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

अक्कलकुवा तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपालभाई पटेल उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र मोरे (डीडीएम, नाबार्ड) व नंदकुमार पैठणकर (जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार) उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार) व कांता गौरी बनकर (जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास ग्रामसेवक वसावे तसेच शाळेचे मुख्याध्यापक भामरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आरती देशमुख (विषय विशेष तज्ञ – गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिन २०२६ ची थीम, महिला सक्षमीकरणाचे महत्त्व तसेच ग्रामीण महिलांसाठी मूल्यवर्धित अन्नपदार्थ व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या कौशल्याच्या आधारे लघुउद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.

नाबार्डचे डीडीएम रविंद्र मोरे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करून उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सोया टोफू या पौष्टिक पदार्थाविषयी माहिती देत त्याचे महत्त्व सांगितले तसेच उपस्थित महिलांना सोया टोफूचे वितरण केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी महिलांसाठी बँकमार्फत उपलब्ध असलेल्या विविध बचत योजना, विमा योजना आणि आर्थिक सुविधांबाबत माहिती दिली. महिलांनी बचत व विमा यावर भर देऊन आर्थिक सुरक्षिततेकडे पावले टाकावीत, असे त्यांनी सांगितले.

आत्मा नंदुरबारचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गट, महिला गट आणि अभ्यास सहली याबाबत माहिती देत महिलांनी शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता गौरी बनकर यांनी बचत गटांचे महत्त्व, दूध संकलन व्यवसाय तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बचत गटांची भूमिका स्पष्ट केली. महिलांनी एकत्र येऊन बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम आणि खेळ देखील आयोजित करण्यात आले. विशेषतः संगीत खुर्ची यांसारख्या खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना सीएमआरसीच्या व्यवस्थापक सौ. ज्योती वळवी यांनी सुंदर पद्धतीने केले, तर शैलजा पाडवी यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमातून महिलांना विविध शासकीय योजना, आर्थिक संधी, प्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

#WomenEmpowerment#MahilaDin#KrishiVigyanKendra

Home छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

नंदुरबार: महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी ५ लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॅटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या टेंडरला मान्यता देण्यात आली. बैठकीस राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला उपस्थित होत्या.

राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॅट पन्नास हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॅट सुमारे साठ हजार रुपये आकारत आहेत. पण महावितरणने आज मंजूर केलेल्या टेंडरमध्ये प्रती किलोवॅट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॅटला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये व तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॅटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॅटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील.

महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४५,४५० रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.

सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या वेबसाईटवर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केली आहे.

error: Content is protected !!