Home ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत

 मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. “जनगणना २०२७ ची तयारी” या विषयावर आधारित या मुलाखतीत जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व, आगामी जनगणना प्रक्रियेचे नियोजन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच नागरिकांचा सहभाग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन AIR’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

भारतातील जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे पायस यांनी यावेळी स्पष्ट केले. जनगणनेतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध योजना आखते, संसाधनांचे नियोजन करते तसेच विकासाच्या प्राधान्यक्रमांना दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. या मुलाखतीत जनगणना २०२७ ही पूर्वीच्या जनगणनांपेक्षा अधिक तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख कशी असेल, याची माहिती देण्यात आली आहे. “आमची जनगणना, आमचा विकास” या संकल्पनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले.

१ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या जनगणना प्रक्रियेचा आराखडा, घरगणना आणि लोकसंख्या गणना हे टप्पे, स्व-गणना (Self Enumeration) आणि प्रगणकाद्वारे घरभेटीची प्रक्रिया याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकृत पोर्टलवर नोंदणी, लॉग-इन प्रक्रिया, OTP पडताळणी, भाषा निवड, SE ID चे महत्त्व तसेच नागरिकांनी स्व-गणना करताना घ्यावयाची काळजी याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Home पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील 50 वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

Home ‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार

‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार

मुंबई: यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो,  घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या  हस्ते लोकार्पण झाले.

महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे.

सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Home नसरापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सक्रिय

नसरापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सक्रिय

मुंबई: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिचे पालक व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्रिय झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाने पोलीस प्रशासनाकडून तपशील मागवून चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळीही आयोगाची उपस्थिती होती.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच न्याय मिळेपर्यंत आयोग पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Home पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

मुंबई : नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. पीडित बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिली.

या प्रकरणातील न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबत तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. पीडित बालिकेच्या कुटुंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Home धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज इथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून व्यथा ऐकून घेत जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत २.५ लाख रुपये, राज्य शासनाकडून २३ हजार रुपयांची मदत, तसेच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून २० लाख रुपये, अत्यावश्यक भांडी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मंत्री बावनकुळे आज दुपारी तातडीने अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड आशिष जैस्वाल, स्थानिक आमदार डॉ. संजय मेश्राम, सरपंच वैशाली चौधरी, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, आनंदराव राऊत, प्रमोद घरडे, उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन बाधित कुटुंबियांच्या व्यथा ऐकून त्यांना धीर दिला.

काल रात्री अचानक आलेल्या वादळवाऱ्यात आगीने अनेक घरांना वेढून टाकले. घटना कशी घडली ते पोलीस यंत्रणा पूर्ण तपास करेल; मात्र, गावकऱ्यांनी जी एकजूट व धैर्य दाखवत कोणतीही जीवित हानी होवू दिली नाही हे महत्वाचे आहे. संपूर्ण गावकऱ्यांच्या या धैर्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना सलाम करतो या शब्दात त्यांनी शासनाच्या वतीने ऋण व्यक्त केले.

अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदत व पुनर्वसनाच्या कामांचा आढावाही आम्ही घेतला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. यासोबतच अन्नधान्य, जीवनावश्यक साहित्य याचे वाटप आरोग्य शिबिर, पाणी टँकर, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व गणवेश, तसेच जळालेल्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली त्यांच्या नुकसानी प्रमाणे ही मदत राहील. सर्व घरांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात शासन निश्चित मदत करेल असे स्पष्ट करून पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांच्या घरबांधणीसाठी मोफत रेती व्यवस्था करू असे सांगितले.

ज्यांच्याकडे अतिरिक्त खोल्या उपलब्ध आहेत त्यांनी आपली घरे बाधित कुटुंबांना तात्पुरती भाड्याने द्यावीत अशी गावकऱ्यांना त्यांनी विनंती केली. प्रशासनाच्या माध्यमातून सर्व बाधित कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, याची खात्री गावकऱ्यांना त्यांनी दिली.

Home नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

मुंबई: नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्या सातत्याने कुटुंबाच्या संपर्कात आहेत. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाणार असून,  आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी विशेष सरकारी वकिलामार्फत संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री तटकरे यांनी ग्रामस्थांशी  संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे असून, प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा यासाठी सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा प्रशासनामार्फत कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक सहाय्य दिले जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Home स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !

स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !

आपल्या कार्याला जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या, ‘बीजमाता’ म्हणून परिचित असलेल्या पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांनी एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावत आपली ‘स्वगणना’ यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

त्यांनी मौजे पोपेरेवाडी (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे डिजिटल प्रणालीचा वापर करून आपली नोंदणी केली. एका तंत्रज्ञान-स्नेही आणि प्रगत भारताचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील योजना आणि विकासाच्या योग्य नियोजनासाठी प्रत्येक नागरिकाची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांचा आदर्श घेत आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची स्वगणना वेळेत पूर्ण करावी.

आपली नोंद, देशाचा विकास !

📍 स्थळ : मौजे पोपेरेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.

#स्वगणना#SelfEnumeration#CensusOfIndia#PadmaShri#RahibaiPopere#SeedMother#Ahilyanagar#Maharashtra#DigitalIndia#राष्ट्रीयकर्तव्य#माझीनोंदमाझाविकास#MaharashtraGovt#MyGovMaharashtra

Home सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.

सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.

त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

#जनगणना२०२७

#Census2027

#IndiaCensus2027

Home ‘महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन – २०२६’ ला भेट द्या…

‘महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन – २०२६’ ला भेट द्या…

‘उमेद’च्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजनांची, बचत गटांच्या चळवळीची माहिती घ्या. चला तर ‘सरस’ला भेट देऊया…

#महालक्ष्मीसरस२०२६

#MahalaxmiSaras2026

error: Content is protected !!