Home अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

Home भारत सरकार सन २०२६ मध्ये प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरी देणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

भारत सरकार सन २०२६ मध्ये प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरी देणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

‘एक परिवार एक नोकरी योजना’ अशी कोणतीही योजना भारत सरकारने जाहीर केलेली नाही. फसवणूक टाळण्यासाठी नोकरीसंदर्भातील कोणतीही माहिती अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरून पडताळून पाहावी.

#FactCheck

#DGIPRFactCheck

Home मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

सांगली – ऊसपट्टा, द्राक्षपट्टा अशी ओळख असणाऱ्या पलूस तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधणाऱ्या कार्वी ब्रँडची ही यशोगाथा.

कोविडच्या आव्हानाच्या काळात सोनिया प्रशांत चौगुले यांनी कार्वी या ब्रँडने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय सुरू केला. लग्नापूर्वी घेतलेल्या फूड टेक्नॉलॉजीच्या शिक्षणाच्या पायावर व मेहनतीच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

सोनिया चौगुले यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड तालुक्यातील नेज हे असून, त्यांचे वडील शिक्षक होते. 2004 साली त्यांनी बी. एस्सी फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. भिलवडी येथील प्रशांत चौगुले यांच्याशी 15 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. पती प्रशांत चौगुले औद्योगिक कंपन्यांच्या एअर कूलिंग यंत्रांसदर्भात काम करतात. प्रापंचिक जबाबदारी पार पाडताना सोनिया यांना स्वतःचा व्यवसाय असावा, असे नेहमी वाटे. त्यामुळे प्रशांत चौगुले यांच्या भक्कम साथीतून सोनिया यांनी प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली. स्वतःचे फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण, पतींची साथ व कुटुंबियांच्या प्रोत्साहनातून सोनिया यांनी कार्वी या ब्रँडने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसाय सुरू केला.

याबाबत सोनिया चौगुले म्हणाल्या, 2019 साली कोविडच्या आव्हानाच्या काळात आमच्या व्यवसायाची मुहुर्तमेढ आम्ही रोवली. त्यापूर्वी जिल्हा उद्योग केंद्रांशी संपर्क साधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती घेतली. व्यवस्थित अभ्यास करून रक्कम रूपये 50 लाखांच्या कर्जमागणीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर केला. त्यानंतर अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे आम्हाला वेळेत कर्ज मिळण्यासाठी मदत झाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून प्रस्ताव केल्याने 35 टक्के अनुदानही मिळाले, याबद्दल त्या राज्य शासनाचे तसेच जिल्हा उद्योग केंद्र व बँकेच्या अधिकाऱ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतात.

भिलवडीजवळ माळवाडी येथे अडीच गुंठ्यामध्ये सोनिया चौगुले यांच्या कार्वी ब्रँडचे युनिट सुरू आहे. मिळालेल्या कर्जातून चौगुले यांनी कोल्हापूर, सांगली येथून आवश्यक यंत्रे खरेदी केली. सध्या त्यांच्या युनिटमध्ये पाश्चरायझेशन यंत्र, खवा निर्मिती यंत्र, प्लॅनेटरी मिक्सर, चक्का श्रेडींग मिक्सर, बल्क कूलर, दूध पॅकिंग यंत्रणा, प्रयोगशाळा असून, जवळपास चार हजार लिटर्स क्षमतेचे कोल्ड स्टोरेज आहे. त्यांच्याकडे जवळपास 10 कामगार आहेत. युनिटमध्ये रोज 1200 लिटर्सचे दूध हँडलिंग केले जाते. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे दोन दूध संकलन केंद्रांमधून दुधाची खरेदी केली जाते.

कार्वी ब्रँडखाली दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर आदि गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार केली जातात. सुरवातीला आलेल्या अडचणींवर जिद्द व चिकाटीच्या जोरावर चौगुले दांपत्याने यशस्वी मात केली. सध्या त्यांची उत्पादनांना चांगली मागणी असून, सांगली, मिरज, पलूस, तासगाव या ठिकाणी त्यांच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो.

Home एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Home मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य

मेळघाटातील ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गसौंदर्याने नटलेला असला तरी, येथील दुर्गम भौगोलिक रचना आणि सामाजिक आव्हानांमुळे कुपोषण आणि माता-बाल आरोग्याचा प्रश्न नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या पार्श्वभूमीवर, मेळघाटातील आदिवासी माता आणि बालकांना आरोग्याचे कवच प्रदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. कुपोषणमुक्त मेळघाट हे स्वप्न साकारण्याच्या दिशेने ही योजना आरोग्यपूर्ण पिढीचा पाया रचत आहे.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याची योजना दि. 1 डिसेंबर 2015 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मेळघाटमध्ये दोन टप्प्यात कार्य करण्यात येते. पहिल्या टप्प्यात, आदिवासी क्षेत्रातील सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या गर्भावस्थेच्या शेवटच्या सहा महिन्यांत आणि प्रसूतीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत (स्तनदा माता) चौरस आहार दिला जातो. यामध्ये केवळ पोट भरणे हा उद्देश नसून, आहारात प्रथिनांची आणि जीवनसत्त्वांची मात्रा वाढविण्यावर भर दिला जातो. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी यासोबतच अंडी आणि पौष्टिक लाडूंचा समावेश असतो. मार्च 2026 मध्ये, मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 5 हजार 816 मातांनी या अमृत आहाराचा लाभ घेतला असून, त्यावर 60 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यामुळे महिलांमधील रक्ताल्पतेचे (अ‍ॅनिमिया) प्रमाण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

योजनेचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून चार दिवस केळी, अंडी असा पूरक आहार दिला जातो. बालपणातील कुपोषण हे शारीरिक आणि बौद्धिक वाढीतील सर्वात मोठा अडथळा असते. हा अडथळा दूर करण्यासाठी बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी किंवा तत्सम प्रथिनयुक्त आहार दिला जातो. मार्च महिन्यात मेळघाटातील एकूण 28 हजार 985 बालकांपर्यंत हा लाभ पोहोचला आहे. बालकांच्या या पोषण आहारासाठी सुमारे 36.32 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मेळघाटातील 462 अंगणवाडी केंद्रांचे जाळे आणि तिथे कार्यरत असणाऱ्या स्थानिक आहार समित्या यामुळे ही योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.

या योजनेमुळे मेळघाटात मातांना सकस आहार मिळतो, तेव्हा जन्माला येणाऱ्या बाळाचे वजन सुदृढ असते, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. तसेच, या योजनेच्या निमित्ताने महिलांचा अंगणवाडीशी संपर्क वाढल्यामुळे त्यांना लसीकरण, वैयक्तिक स्वच्छता आणि कौटुंबिक नियोजनासारख्या महत्त्वाच्या विषयांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होत आहे. स्थानिक महिलांचा आहार समित्यांमध्ये असलेला सहभाग त्यांच्यात निर्णयक्षमता आणि नेतृत्वाचे गुण विकसित करत आहे.

 भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जीवनात चैतन्य फुंकणारी योजना ठरली आहे. जिल्हा प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील माता आणि बालके आज खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सशक्त होत आहेत. कुपोषणाच्या अंधारातून आरोग्याच्या प्रकाशाकडे मेळघाटाची ही वाटचाल भविष्यात एक आदर्श आरोग्य मॉडेल म्हणून निश्चित समोर येईल.

Home घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे.   संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला.  १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणुसकीचे शिल्पकार  – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महापुरुष शांततेतून जेव्हा कृती करतात, तेव्हा ती क्रांती ठरते. महाड चवदार तळे सत्याग्रहातून समाजात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषित, दलित आणि वंचित घटकांसाठी काम करून त्यांना सक्षम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगात भक्कमपणे उभी आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतभर साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमान आणि विवेकाचा उत्सव असून त्यांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

चैत्यभूमी बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले. चैत्यभूमी ही बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. एकता, समता आणि बंधुता या मूल्यांमध्ये समाजाला बांधून त्यांनी प्रत्येकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांची मशाल सतत तेवत ठेवून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे केंद्र ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एक वर्षाच्या कामकाजावर आधारित ‘समाजनायक संजय शिरसाट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार सना मलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Home व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल

व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शानाखाली शासन गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य सुरळीत पार पडावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. हे सहकार्य महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील परस्पर विश्वास व समान आर्थिक दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या बळावर समृद्धीच्या नव्या पर्वाची आम्ही अपेक्षा करतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री रावल यांनी व्हिएतनाममधील अग्रगण्य उद्योगसमूह विंग ग्रुप, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले. सुमारे 54 हजार कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीतून राज्यात जागतिक दर्जाची एकात्मिक परिसंस्था उभारण्यात येणार असून, यात टाउनशिप, आरोग्य, शैक्षणिक सुविधा तसेच इलेक्ट्रिक बसेस व टॅक्सींसह हरित ऊर्जा अशा गतिशीलता प्रकल्पांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

व्हिएतनामच्या उच्चस्तरीय नेतृत्व व व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाच्या आगामी मुंबई दौऱ्याचे स्वागत करण्यास महाराष्ट्र शासन सज्ज असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्तपणे ‘व्हिएतनाम – महाराष्ट्र व्यवसाय मंच’ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा मंच उद्योग क्षेत्रातील थेट संवाद वाढवून आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई (भारत) आणि हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) यांच्यात ट्विनिंग सिटी करार अंतिम टप्प्यात असून राष्ट्रपतींच्या आगामी भेटीदरम्यान या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या शहरांच्या नात्यामुळे शहरी पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि थेट व्यापार संबंध अधिक मजबूत होतील.

बैठकीत कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातही सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कृषी विपणन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्राने पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी तसेच कृषी उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापारासाठी व्हिएतनामसोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रात बी-टू-बी सहकार्य वाढवून जागतिक निर्यात क्षमतेचा लाभ घेण्यावर भर देण्यात आला.

Home “माणसाने जन्माने नाही, तर कर्माने मोठं व्हावं.”

“माणसाने जन्माने नाही, तर कर्माने मोठं व्हावं.”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीव्यवस्थेवर प्रहार करणारा संदेश…

#drbabasahebambedkar#AmbedkarJayanti#BharatRatna#डॉबाबासाहेबआंबेडकर @mahadgipr #gadchiroli

Home महिला आता फक्त घरापुरत्या मर्यादित नाहीत; त्या उद्योगही उभे करत आहेत!

महिला आता फक्त घरापुरत्या मर्यादित नाहीत; त्या उद्योगही उभे करत आहेत!

📊 महिला कर्जवाटपात मोठी झेप

📈 २०१७ च्या तुलनेत ५ पट वाढ

🏢 व्यवसायिक कर्जाकडे महिलांचा वाढता कल

स्वावलंबनाकडे महिलांची दमदार वाटचाल! 🚀

#WomenEmpowerment#FinancialInclusion#NewIndia

Home महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल!

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल!

राज्यात २३ ठिकाणी २९ ‘शक्तिसदन’ उभारण्याचा प्रस्ताव; निराधार, पीडित व संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होणार.

👉 १८ ते ६० वयोगटातील महिलांना मिळणार आधार

👉 निवारा, समुपदेशन व कौशल्य विकासाची संधी

#महिला_सक्षमीकरण#शक्तिसदन#MissionShakti

error: Content is protected !!