संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानपरिषदलक्षवेधी
मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद प्रभावीपणे राबवली जात आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
राज्यात आरटीई अंतर्गत नोंदणीकृत सुमारे 8,699 शाळांमध्ये 1,14,792 जागा उपलब्ध असून आतापर्यंत 2,21,553 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाची मुदत 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रती विद्यार्थी 17,670 रुपये इतकी प्रतिपूर्ती दिली जात असून 2013-14 पासून सुमारे 2,930 कोटींची रक्कम शाळांना देय आहे.
विधानपरिषदलक्षवेधी
बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने सर्वसमावेशक आरोग्य सुविधांचा आराखडा तयार करण्याबाबत महापालिकेस निर्देश दिले जातील, असे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
विधानपरिषदलक्षवेधी
राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी खासगी आयटीआय सुधारणा व कौशल्य विकासासाठी समिती करण्यात येईल. या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सूचित केले जाईल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. राज्यात सुमारे ५८५ खासगी आयटीआय आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्यात एक आयटीआय हे धोरण कायम ठेवण्यात येणार असून, नवीन तालुका निर्माण झाल्याशिवाय नवीन आयटीआयला मान्यता दिली जाणार नाही.
लक्षवेधींसंदर्भातील सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/194552/
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो,’अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिल्या.श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समारोह समितीच्या वतीने नागपुरात लक्ष्मीनगर चौकात नववर्षदिनानिमित्त शोभायात्रा आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर या याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
तात्या टोपे नगरातील श्री गणेश मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर, ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी आणि इतर मान्यवरांसह महिलांचे ढोलपथक, रामायणातील पात्रांच्या वेशभुषा केलेले कलाकार तसेच मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून आपण सारे आपल्या नूतन संकल्पांची सुरुवात करतो आणि आपल्या जीवनाला सामोरे जातो. ही भारताची गुढी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही गुढी उंचच उंच जात राहो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी सामुहिक रामरक्षा पठण तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष संदीप जोशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रातील आमदार तसेच आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली. राज्यातील आदिवासी कवी, लेखक, गायक, समाजसेवक व पर्यावरण कार्यकर्त्यांना लोकभवन येथे घेऊन यावे आपण त्यांच्याशी चर्चा करू, अशी सूचना राज्यपालांनी आदिवासी विकास मंत्र्यांना केली.
राज्याला प्रथमच आदिवासी समाजातील राज्यपाल लाभले आहे, त्यामुळे आदिवासी जनतेच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत मिळेल अशी भावना उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.देशाच्या विविध भागातील आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे असून अशा सर्व आदिवासी क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या लहान लहान पुस्तिका तयार कराव्यात, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवन कार्याची माहिती देणारे लघु नाट्य व पथ नाट्य देखील तयार करावे तसेच या कार्यात आदिवासी गायक कलाकार, कवी यांना सहभागी करुन घ्यावे. या उपक्रमामुळे आदिवासींच्या योगदानाबद्दल व संस्कृतीबद्दल नव्या पिढीला अधिक माहिती होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
महिला स्वयंसहायता गट हे महिला सक्षमीकरणाचे आंदोलन आहे असे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आदिवासी विकास विभागाला राज्यातील आदिवासी विभागांमधील महिला स्वयंसहायता गटांची संख्या व त्यांचे कार्य याबाबत विस्तृत माहिती गोळा करून सादर करण्याची सूचना केली.आदिवासी भागांमधील क्षयरोग निर्मूलनाची स्थिती तसेच आदिवासी महिलांमधील ऍनिमिया या विषयाची देखील माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या.
बैठकीला आमदार हरिश्चंद्र भोये, राजेश पडवी, भीमराव केराम, केवलराम कावे, राजू तोडसाम व माजी मंत्री राजेंद्र गावित उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड व आदिवासी विकास संशोधन परिषदेच्या आयुक्त मंजिरी मनोलकर यांनी राज्यपालांसमोर आपापल्या विभागांचे सादरीकरण केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेला पेपर चोरीचा गुन्हा उघड – शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कस्टडी रुममध्ये ठेवलेले इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचे पेपर 17 मार्च 2026 रोजी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा एका अल्पवयीन विधि संघर्षग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले असल्याचे सांगोला पोलिसांकडून कळविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या तपासानुसार हा गुन्हा एका अल्पवयीन विधि संघर्ष ग्रस्त बालकाने केल्याचे उघड झाले आहे. त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिलेली असून गुन्हा करताना वापरलेले इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक मोटार सायकल, चोरीस गेलेले इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेच्या प्रश्न पत्रिका व तीन कोऱ्या उत्तर पत्रिका जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती सांगोला पोलीसांकडून देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘लोकोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे आयोजन
नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या ‘लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सभागृह, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा उद्देश देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करणे हा आहे. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव’ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकगीत, लोकनृत्य तसेच पारंपरिक वाद्यसंगीत यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन रसिकांना घडणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कलांचा परिचय देशभरातील प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
दिल्ली व परिसरातील महाराष्ट्रप्रेमी नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी तसेच रसिक प्रेक्षकांनी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे तर, २१ वर्षे मुदतीचे ५३० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या 10 वर्षे मुदतीच्या एक हजार कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. राज्य शासनास पाचशे कोटी रु.पर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
२४ मार्च २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २४ मार्च २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.
यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २५ मार्च २०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.
कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २५ मार्च २०२६ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ मार्च २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी २५ सप्टेंबर आणि २५मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र शासनाचे २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या २६ वर्षे मुदतीच्या एक हजार कोटींच्या (७.६६ टक्के महाराष्ट्र शासनाचे रोखे २०५२) च्या (४ मार्च २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. राज्य शासनास पाचशे कोटी रु.पर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
२४ मार्च २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २४ मार्च २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.
यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २५ मार्च २०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.
कर्जरोख्याचा कालावधी २६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ४ मार्च २०२६ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ मार्च २०५२ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७. ६६ टक्के दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी ४सप्टेंबर आणि ४मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र शासनाचे 21 वर्षे मुदतीचे 530 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र शासनाच्या २१ वर्षे मुदतीच्या ५३० कोटींच्या (७.६६ टक्के महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०४७) च्या (दि.४ मार्च २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्रकान्वये दिली आहे.
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
२४ मार्च २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् २४ मार्च २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.
यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २५ मार्च २०२६ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.
कर्जरोख्याचा कालावधी २१ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ४ मार्च २०२६ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ४ मार्च २०४७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७. ६६ टक्के दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी ४ सप्टेंबर आणि ४मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.
20 मार्चपासून ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन
(नंदुरबार) जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ प्रदर्शन 20 ते 23 मार्च 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार आयोजित करण्यात आले असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्रीमती कांतागौरी बनकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या प्रदर्शनामध्ये स्थानिक महिलांनी तयार केलेले हस्तकला साहित्य, घरगुती उत्पादने, कृषीपूरक पदार्थ तसेच विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. नागरिकांना या वस्तू पाहण्याची आणि थेट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून महिला आणि शेतकरी बांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा मुख्य उद्देश आहे.
हे प्रदर्शन चारही दिवस सकाळी 9.00 ते रात्री 10.00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. केवळ प्रदर्शनीच नव्हे, तर दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीदेखील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “या! पाहा! खरेदी करा!” या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती बनकर यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय शस्त्रास्त्र निर्मिती दिन
१८ मार्च १८०२ भारतातील शस्त्रनिर्मितीची ऐतिहासिक सुरुवात!
स्वावलंबी संरक्षणशक्तीकडे एक प्रेरणादायी पाऊल.
#राष्ट्रीयशस्त्रास्त्रनिर्मितीदिन#AtmanirbharBharat#IndianDefense#MakeInIndia#DefenceProduction#IndiaFirst
‘महाराष्ट्रधर्म वाढवूया…मराठीची गुढी उंच उभी करुया..
आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे. नवसंकल्पना साकार व्हाव्यात, यासाठी ऊर्जा देणारे ठरावे त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना. यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा… मराठीची गुढी आणखी उंच उभी करण्याचा निर्धार करुया !’
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ह्याच सदिच्छा!



