Home मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खाजगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे. आजवर मंडळाने ७३० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी नव्या ग्रंथांचे प्रकाशन करण्याची परंपरा जपली आहे.

मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय व खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

#मराठीभाषागौरवदिन

Home सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार!

सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार!

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीतील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेशिवाय शैक्षणिक मदत.

शिक्षणाचा प्रवास थांबू नये, हीच शासनाची बांधिलकी.

#Education#सफाईकर्मचारी#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra

Home अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलाव

अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलाव

(नंदुरबार) नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले जे.सी.बी.वाहन क्रमांक BR-27-GA-1358 चा लिलाव 05 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

सदर जे.सी.बी. वाहन जप्त करुन खांडबारा पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले आहे. वाहन मालकाला दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार सदर वाहनावर जमीन महसुलाची थकबाकी समजून हा लिलाव करण्यात येत आहे .

सर्व इच्छुक नागरिकांनी या लिलावासाठी तहसील कार्यालय, नवापूर येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन तहसीलदार श्री. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .

Home 4 मार्चला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

4 मार्चला होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या 04 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात दुपारी 01.00 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सुट्ट्यांमुळे तारखेत बदल

शासकीय नियमानुसार, जिल्हास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. मात्र, मार्च महिन्याचा पहिला सोमवार (2 मार्च 2026) रोजी होळी सणानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच 3 मार्च रोजी धुलिवंदनची सार्वजनिक सुट्टी असल्याने, कामकाजाचा पुढचा दिवस म्हणजेच बुधवार, 4 मार्च 2026 रोजी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर करताना खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे:

• तालुकास्तरावरील प्राधान्य: शासकीय कामाशी संबंधित वैयक्तिक तक्रारी सर्वप्रथम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या तालुकास्तरीय लोकशाही दिनात मांडणे आवश्यक आहे.

• जिल्हास्तरावरील अपील: जर तालुकास्तरावरील निर्णयाने तक्रारदाराचे समाधान झाले नसेल, तरच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार किंवा निवेदन सादर करावे.

सामान्य जनतेच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी, यासाठी शासन परिपत्रकानुसार लोकशाही दिनाचे आयोजन तालुका, जिल्हा, विभागीय आणि मंत्रालय स्तरावर केले जाते. या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Home साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी सहभाग घ्यावा

साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी सहभाग घ्यावा

(नंदुरबार) राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयाच्या आधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी कन्यादान मंगल, नंदुरबार येथे “नंदुरबार ग्रंथोत्सव 2025” चे आयोजन करण्यात आले आहे, साहित्यप्रेमी, पुस्तक विक्रेते व प्रकाशकांनी या ग्रंथोत्सवात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ग्रंथ विक्री व प्रकाशकांसाठी सुवर्णसंधी

या ग्रंथोत्सवात नामवंत प्रकाशन संस्थांचे ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला, नंदुरबार येथे किंवा 9833467604 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल

ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने केवळ पुस्तक विक्रीच नव्हे, तर विविध वैचारिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे:

• कवी संमेलन: जिल्ह्यातील स्थानिक कवींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘हास्यकवी’ व ‘बहुभाषिक कवी’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्थानिक साहित्यिकांनी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाशी संपर्क साधावा.

• कथाकथन स्पर्धा: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘समाज सुधारकांच्या आयुष्यातील प्रसंग’ या विषयावर कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे जिल्हा ग्रंथालय कार्यालयात नोंदवावीत.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रंथ आणि साहित्य प्रेमी रसिकांनी 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित या ग्रंथोत्सवाचा विनामूल्य लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय समन्वय समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Home आदर्श आश्रमशाळेत प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत अर्ज जमा करावे

आदर्श आश्रमशाळेत प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत अर्ज जमा करावे

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा, खामगाव रोड नंदुरबार येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 10 मार्च, 2026 पर्यंत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत जमा करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पात्रता निकष

• विद्यार्थी 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी मध्ये शासकीय / अनुदानित आश्रमशाळा किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकत असावा.

• प्रवेशार्थी विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असावेत.

• ते महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असावेत.

• पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा अधिक नसावे.

• ही प्रवेश परीक्षा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाईल.

प्रवेश परीक्षा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 ते 12:30 या वेळेत होणार असून प्रवेश अर्ज 10 मार्च 2026 प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत कार्यालयीन वेळेत जमा करावे, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Home प्रधानमंत्री किसान मानधन योजना:वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना:वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

(नंदुरबार) प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना दरमहा रुपये 3 हजार पेन्शन देण्यात येणार असून जास्तीत जास्त पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच भू-अभिलेखांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र ठरतील.

ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना असून पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान रुपये 3 हजार निश्चित पेन्शन मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या 18 ते 40 या वयानुसार दरमहा रुपये 55/- ते रुपये 200/- पर्यंत वयाच्या 60 वर्षांपर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्याच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र सरकार पेन्शन फंडात जमा करते.

इच्छुक शेतकरी जवळच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा ऑनलाइन पोर्टल https://www.pmkmy.gov.in वर स्व-नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आदि कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असेही जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Home 3 दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम

3 दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण कार्यक्रम

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

उच्च दर्जाची, रोगमुक्त रोपे तयार करण्याचे तंत्र शिकण्याची सुवर्णसंधी!

प्रो-ट्रे नर्सरी तंत्रज्ञान, कोकोपीट/ग्रॉइंग मिडिया तयारी, पाणी व खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, तसेच नर्सरी व्यवसायातील खर्च व नफा विश्लेषण याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

सहभागी कोण होऊ शकतात?

• शेतकरी

• महिला बचत गट

• कृषी उद्योजक

• कृषी विद्यार्थी

• नर्सरी व्यवसाय सुरू करू इच्छिणारे इच्छुक

शुल्क: ₹1800/- प्रति व्यक्ती (राहण्याची व जेवणाची सुविधा समाविष्ट)

स्थळ: कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

📞 संपर्क: डॉ. वैभव गुर्वे – 9665209799

आजच नोंदणी करा:

https://docs.google.com/…/1FAIpQLSdCZNjyri…/viewform…

#KVKnandurbar#AgricultureTraining#FarmerEmpowerment#KrishiVigyanKendra#collectorofficenandurbar

Home आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण

आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण

कृषी विभाग आत्मा, नंदुरबार अंतर्गत तोरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेराकोटा मणी व दागिने निर्मिती’ या जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी नुकतीच पार पडली. या प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकरी, युवक-युवती आणि महिला प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे टेराकोटा मणी तयार करण्याची प्रक्रिया शिकली.

कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींनी मातीची निवड, मणी आकार देणे, डिझाइन तयार करणे, वाळविणे, भट्टीत भाजण्याची प्रक्रिया तसेच आकर्षक दागिने निर्मिती या सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रशिक्षणादरम्यान वातावरण अत्यंत उत्साही व सर्जनशील होते. सहभागी महिलांनी आणि युवकांनी नव्या कौशल्याच्या माध्यमातून स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व महिला बचत गटांना पूरक उद्योगाची संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नवाढ साध्य करण्याचा हा प्रभावी प्रयत्न ठरत आहे.

सदर छायाचित्रांमधून प्रशिक्षणार्थींची जिद्द, सर्जनशीलता आणि शिकण्याची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे. आत्मा, नंदुरबार यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे कौशल्याधारित उपक्रम ग्रामीण भागातील उद्योजकतेस नवी दिशा देत आहेत.

Home महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून नाशिकला प्रादेशिक नाविन्यता केंद्राचा प्रस्ताव

नाशिक: महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी नाशिक येथील ताज गेटवे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.उद्घाटन सत्राला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद, CSRBOX चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह आणि Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या-तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नाविन्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर नाविन्यता परिसंस्था मजबूत करण्याचा राज्याचा रोडमॅप मांडला आणि नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नाविन्यता केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र स्टार्टअप धोरणांतर्गत नाविन्यात सोसायटी कल्पनेपासून विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना मार्गदर्शन, संस्थात्मक भागीदारी, भांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वय यांद्वारे एकात्मिक सहाय्य प्रणाली उभारत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी रेअर अर्थ मेटल्स आणि महत्त्वपूर्ण खनिज मूल्यसाखळी यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सनी संशोधन व नाविन्यता-आधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.नाशिकमधील ३० हून अधिक उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या गोलमेज परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूलन, पाणी व कचरा व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक प्रणाली यावर चर्चा झाली. CSR आणि नाविन्यता-आधारित हस्तक्षेपांच्या माध्यमातून कुंभला जागतिक स्तरावरील “लिव्हिंग लॅब” म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

डॉ. पाटील यांच्या हस्ते सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन लॅब अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना पारितोषिक वितरण करण्यात आले. नाविन्यता-आधारित आणि प्रभावाभिमुख उद्योजकतेला चालना देण्याची नाविन्यता सोसायटी बांधिलकी त्यांनी पुनः अधोरेखित केली.

यावेळी आयोजित प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याची दृष्टी मांडली. ग्रामीण भागातील नाविन्यता, इन्क्युबेशन नेटवर्क आणि परिणामाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी राबवत असलेल्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह तसेच प्रादेशिक स्टार्टअप संवादाच्या माध्यमातून नाशिकला नाविन्यता-आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

error: Content is protected !!