नागपूर: हवामान विभागाने विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या (हीट वेव्ह ) पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेच्या लाटेची तीव्रता विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यात अधिक राहणार असल्याचे जाहीर केले असून, विभागात करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
हवामान विभागाच्या हीट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपायोजना राबवताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड वार्ड तयार करावे तसेच उष्णतेवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधीचा साठा तयार ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागात मे व जून महिन्यात उष्णते संदर्भात अलर्ट लागू राहणार आहे. उष्माघातामुळे विभागात अतिदक्षता घेताना उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होईल याची खबरदारी घेण्यात यावी, उष्मघातासंदर्भात करावयाच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात सेंटर होम सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात ग्रीन नेट तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा, शाळा महाविद्यालय, कोचिंग सेंटर आदींना सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, या उपाययोजना 16 जून पर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच गोंदिया जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपायोजनाबद्दल माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सोलापूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अक्कलकोट येथे आयोजित सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय महामार्ग चे सचिव एस.जी. शेलार, राष्ट्रीय महामार्ग मुंबईचे विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे, तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 2014 पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 565 किमी होती, ती आता 1750 किमीपर्यंत वाढली आहे. त्यावेळी 52 हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते, त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम वगळले तर सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगून पुढील तीन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी 1020 कोटी, अहमदनगर सोलापूर कर्नाटक बॉर्डर पर्यंतच्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग 65 वरील कामासाठी 48 कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी 35 कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत चेन्नई हा महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणारे ठरेल. सोलापूर जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या कामामुळे सोलापूर जिल्हा देशाच्या मध्यभागी येऊन देशाचा लॉजिस्टिक हब बनेल असेही केंद्रीय मंत्रीगडकरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बुद्ध सर्किट हा 22 हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. बोधिवृक्षाखाली मिळालेला अनुभव त्यांनी भावनिक शब्दांत मांडला. तसेच 12 हजर कोटींचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला असून मार्गावरील 46 तलाव बांधले गेले आहेत. शेती व जलसंवर्धनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सोलर पंप व ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. पंढरपूर रिंग रोड, सोलापूर रिंग रोड, अक्कलकोट–दुधनी रस्ता यांसारख्या कामांना तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व कामांना मंजुरी दिल्याचे त्यांनी जाहीर केले. विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्व समाजघटकांना समान लाभ मिळावा, हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज भूमिपूजन होत असलेल्या सहा महामार्गामुळे अक्कलकोट येथे येणाऱ्या राज्याच्या विविध भागातील भक्तांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्याने या भागातील विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच अक्कलकोट गाणगापूर, मोहोळ ते वळसंग सोलापूर शहरात साठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
भूमिपूजन होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे :
हसापूर ते बद्दाड किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंधराशे 52 कोटीचा निधी.
वागदरी – अक्कलकोट – तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण. रस्त्याची लांबी 47.66 कि.मी. असून प्रकल्प खर्च 353 कोटी रुपये आहे.
मोहोळ – बसवनगर – वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण. रस्त्याची लांबी 82.00 कि.मी. असून प्रकल्प खर्च 756 कोटी रुपये आहे.
दुधनी येथे रेल्वे उड्डाण पूल बांधकाम तसेच रा.म.क्र. 150 ई च्या उर्वरित 4.122 कि.मी. रस्त्याचे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण करण्यात येणार असून प्रकल्प खर्च 97 कोटी रुपये आहे.
रा.म.क्र. 150 ई अंतर्गत बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून लांबी 0.75 कि.मी. असून प्रकल्प खर्च 26 कोटी रुपये आहे.
या सर्व प्रकल्पांची एकूण लांबी 171 कि.मी. असून एकूण प्रकल्प किंमत 2784 कोटी रुपये आहे. या विकासकामांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचे फायदे… प्रस्तुत पॅकेज सुरत चेन्नई ग्रीन फील्ड कॉरिडॉरचा एक भाग आहे. यामुळे 390 किलोमीटर आणि सहा तासाच्या प्रवासाच्या वेळेचे बचत होणार आहे. वन्यजीव संरक्षण उपायोजनामुळे प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री होईल. अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 ह एक भाग सोलापूर साठी अतिरिक्त रिंग रोड म्हणून काम करेल. वाहतूक कोडी प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा वापर कमी होईल. सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन उद्योग आणि रोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार आहे.
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने सहा महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रास्ताविक महामार्ग प्राधिकरणचे सचिव एस.जी. शेलार यांनी करून रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरण मार्फत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची तसेच आज भूमिपूजन होत असलेल्या सहा कामांची माहिती दिली. मुंबईतील महामार्ग प्राधिकरण चे आर्थिक सल्लागार संजय जयस्वाल यांनी आभार मानले.
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
सोलापूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्लाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस , पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, सचिन इथापे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी तसेच अधिकारी, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सद्या पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील. पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेल्या नाहीत त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती या ठिकाणी पालखी महामार्गात विशेष रचना करून पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले. तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही विहिरींची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसने प्रवास करत पालखी महामार्गाची केली पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यांच्यासह बसने प्रवास केला.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल व्यवहारांमधील वाढती फसवणूक, डीपफेक तंत्रज्ञान आणि ऑनलाइन सुरक्षितता या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत दि. 18 ते 23 मे 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता गरुडे यांनी केले आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि AI च्या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक क्लिष्ट आणि धोकादायक बनत आहे. डिजिटल अरेस्ट, फिशिंग, बनावट कॉल्स, सोशल मीडियावरील फसवणूक, व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक व्हिडिओ, AI-generated phishing यांसारख्या नव्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे या मुलाखतीत अधोरेखित करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुलांवरील सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, वैयक्तिक माहितीची चोरी, गोपनीयतेचा भंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासातील आव्हाने याविषयीही या मुलाखतीत सखोल माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे नोंदवावी, तसेच तक्रार नोंदविताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाकडून सायबर सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, AI-आधारित सुरक्षा प्रणालींचा बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि शासकीय यंत्रणांमधील वापर, तसेच भविष्यातील सायबर सुरक्षेची दिशा यावरही या मुलाखतीत चर्चा करण्यात आली आहे.
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व गमावले आहे
अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक प्रख्यात लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत म्हणून हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ आणि ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर
ऊर्जा बचत व स्वदेशी वापरासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना.
#पश्चिमआशियाईसंकट#ऊर्जाबचत#महाराष्ट्रशासन#स्वदेशीवापर#EnergySaving#GreenMaharashtra#SolarEnergy#PublicTransport#नंदुरबार#जिल्हामाहितीकार्यालय
भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये
‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण-तिसरा टप्पा’ (एसआयआर फेज-३) राबवण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. चालू असलेल्या जनगणनेच्या ‘हाऊस लिस्टिंग’ प्रक्रियेचा विचार करून आयोगाने हे वेळापत्रक आखले असून, हवामानाची प्रतिकूलता लक्षात घेता केवळ हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण ९७,९२४ बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या ९६,९४९ बूथ लेव्हल एजंट्सची (बीएलए) मदत घेतली जाणार आहे.
आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० जून ते २९ जून २०२६ या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर ३० जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलैपर्यंत असणार आहे.
राज्यातील मतदारांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा नवीन नाव नोंदणीसाठी दावे आणि हरकती सादर करता येतील. सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील धरणांच्या जलाशयांतील वाढता गाळ, कमी होत चाललेली पाणीसाठा क्षमता आणि अनियंत्रित वाळू
उपशाच्या पार्श्वभूमीवर सहा मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास व त्याबाबतच्या सुधारित धोरणास मान्यता देण्यात आली.
यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होणार आहे. तसेच, धरणांच्या जतन – संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे. प्रायोगिक तत्वावर गाळ काढण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर धरण या प्रकल्पांचा समावेश आहे. संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना कार्यवाहीचे अधिकार दिले आहेत. शेतकऱ्यांना गाळ पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ वाहतूक खर्च करायचा आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
नाशिक जिल्ह्यातील अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजनेसाठी ४९ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे १६५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
अंबोली-वेळुंजे प्रवाही वळण योजना दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या नाल्यावर प्रस्तावित आहे. याद्वारे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे ३२.०४ दशलक्ष घन फूट पाणी उपलब्ध होणार आहे. यापैकी ४.८३ दशलक्ष घ. फू. पाणी साठा स्थानिक वापरासाठी तर २७.२१ द.ल.घ. फू. पाणी साठा गोदावरी खोऱ्यात प्रवाही पद्धतीने वळविण्याचे नियोजन आहे. ४९.२६ कोटी पैकी ४६ कोटी रुपये प्रत्यक्ष कामासाठी तर ३.२६ कोटी रुपये अनुषांगिक कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ आणखी तीन वर्षासाठी २०२८-२९ पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली. योजना कालावधीत दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि समुद्र किनारा यांच्या वापरातून पर्यटन आणि मत्स्यव्यवसायास चालना देऊन रोजगार निर्मिती करणे आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्याचे नियोजन आहे.
याची अंमलबजावणी दोन भागात करण्यात येणार आहे. योजनेच्या २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत प्रशासकीय मान्याता मिळालेल्या परंतु, अद्याप अपुरी राहिलेली कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पुर्ण करण्यासाठी योजनेच्या भाग-एक अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. योजनेच्या भाग दोनमध्ये दोन्ही जिल्ह्याच्या सर्व कामांना २०२६-२७ या वर्षात प्रशासकीय मान्यता घ्यावी. सर्व कामे २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीतच पूर्ण करायची आहेत.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास मान्यता देण्यात आली. यामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार असून आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती येणार आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील उच्च माध्यमिक शिक्षकांना १२ व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी लागू करण्यास मंजूरी देण्यात आली.
राज्यात विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, ऊसतोड व विद्यानिकेतन अशा एकूण ९७७ आश्रमशाळा स्वंयसेवी संस्थामार्फत अनुदान तत्त्वावर चालविल्या जातात. या आश्रमशाळांतील ७८८ उच्च माध्यमिक शिक्षकांना ही वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी श्रेणी लागू होणार आहे. हा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही, तसेच यात कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानला विविध प्रकारच्या वाङ्मयीन उपक्रमांच्या आयोजनासाठी यंदाच्या आर्थिक वर्षापासून दहा लाख रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. मराठी साहित्याचा प्रसार आणि संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या सात संस्थांना दरवर्षी दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. याचप्रमाणे कार्य करणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानलाही असा निधी दिला जाणार आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक ठरेल, अशा खासगी जमिनीच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क सवलत देण्यास मान्यता देण्यात आली.
नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) मधील आडगाव-दिंडोरी रोड-डकांबळे शिवार-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८-पेठ गवळवाडी-गंगापूर -रोड-गोवर्धन-त्र्यंबक महामार्ग-बेलगाव ढगा-नाशिक मुंबई महामार्ग-विल्होली-सिन्नर फाटा अशा ६६.१५ किलोमीटरच्या आखणीस मान्यता देण्यात आली आहे. परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनासाठी ३ हजार ६५९ कोटी ४७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह विभागाकरिता सुमारे ८ हजार ७६७ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली.
२०१७ मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागातून मृद व जलसंधारण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्तालयाच्या स्थापनेसह क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेसाठी सुमारे १६ हजार ४२३ पदाचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. यात मूळ विभागाची ६ हजार ४८१ पदे व कृषी विभागाकडून ९ हजार ९४२ पदे वर्ग होणे अपेक्षित होते. यावर उच्चस्तरीय सचिव समितीने मृद व जलसंधारण विभागाकरिता मंजूर ६ हजार ४८१ व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता मंजूर २ पदांसह एकूण ६ हजार ४८३ पदांव्यतिरिक्त सुमारे २ हजार २८४ वाढीव पदांसह ८ हजार ७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधला मान्यता दिली.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
पुणे नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेस तीन शासकीय जमिनी विनामूल्य देण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेसाठी ११६ कोटी ६३ लाख ८२ हजार ३८६ रुपयांची कब्जेहक्काची रक्कम माफ होणार आहे.
पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा विकास करण्यासाठी संगमवाडी पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यानच्या बाधित होणाऱ्या पुणे पेठ संगमवाडी (भूखंड क्रमांक ८१,८५,८६ आणि ९०) येथील नदी पात्रात असलेली ११०१५ चौरस मीटर मळई जमीन, मुंढव्यातील बोटॅनिकल गार्डनची सर्व्हे क्रमांक ८८ येथील ३४१२८.१६१ चौरस मीटर आणि मुंढव्यातीलच महिला व बाल सुधार गृहाची ७७०८.४९७ चौरस मीटर जमीन पुणे महानगरपालिकेस हस्तांतरित करावी असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी पाठविला होता.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
महाराष्ट्रातून बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता बांग्लादेशातील आयात शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देणारी योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान देण्यात येत होते. या योजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. तसेच विविध संस्था, संघटना यांच्याकडून योजना बंद करण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय संस्थाच्या इमारतींना विकास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यासाठी संबंधित महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी अशा संस्थांना २५ टक्क्यांची सवलत मिळत असे.
राज्यातील नागरिकांना सुलभ तसेच परवडणाऱ्या दरात व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा संस्थांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. या संस्था वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा व आरोग्य सेवा प्रकल्प राबवित असतात.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगामध्ये उपाध्यक्ष हे पद नव्याने निर्माण करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यासाठी १७ जुलै २०२५ रोजी अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला. हा अधिनियम ११ मे २०२६ रोजी अंमलात आला आहे. मात्र, आयोगाच्या कार्यप्रणालीत प्रभावी समन्वय आणि प्रशासकीय सोयीसाठी उपाध्यक्षपद निर्माण करण्यात येत असून त्याबाबतची तरतूद अधिनियमात करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
CabinetDecision
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगात उपाध्यक्ष नियुक्त करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग स्थापन करण्यासाठी १० जून २०२५ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १७ जुलै २०२५ रोजी अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला. हा अधिनियम १२ सप्टेंबर २०२५ रोजी अंमलात आला आहे. मात्र आयोगाच्या रचनेनुसार सदस्यांतील एका सदस्यास उपाध्यक्ष म्हणून काम करता येईल, अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
त्यानुसार संबंधित महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग अधिनियम, २०२५ (सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
‘मंत्रिमंडळ निर्णय’ सविस्तर पाहण्यासाठी ‘महासंवाद’च्या पुढील
लिंकला भेट द्या – https://mahasamvad.in/201359/
हवामानबदल च्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या पहिल्या पर्वाच्या परिणाम आणि प्रभाव अहवालाचे
मुंबई क्लायमेंट वीकच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन दि. २२ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबईत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. नागरिकाभिमुख आणि प्रगतीशील हवामान उपाययोजना उभारण्यावर आमचा भर राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘प्रोजेक्ट मुंबई’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे यजमान संस्थांमध्ये सहभागी आहेत.
अहवाल प्रकाशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी आदी उपस्थित होते.
राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत
उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्यकरार करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे एमएमआर क्षेत्रात (MMR) ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ उभारला जाणार तसेच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार आदी उपस्थित होते.



