Home मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेनेही गती आणि गुणवत्तेसह मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे पुनर्बांधणी कार्य केवळ १५ महिन्यात व विहीत मुदतीच्या चार महिने आधीच पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतचा पूल हा नागरिकांसाठी खूप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळीत वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही गतीने व दर्जदार होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Home राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठी काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे.

राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठी काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे.

काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करण्याकरिता राज्यात व्हिएतनाम व कंबोडियाच्या धर्तीवर अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवून राज्य आत्मनिर्भर कसे होईल या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य काजू परिषद अध्यक्ष जयकुमार रावल यांनी परिषदेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ चे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, अपेडा चे उपसरव्यवस्थापक वाघमारे तसेच शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक मनीष दळवी, डॉ. परशराम पाटील, धनंजय यादव,रुपेश बेलोसे उपस्थित होते.

Home राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत २०११ पासून प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत २०११ पासून प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली.

Home राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी २०२६ मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये ८.०५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे अपघातांची एकूण संख्या ३,१६४ वरून ३,१०० वर आली असून त्यात २ टक्क्यांची घट झाली आहे.

राज्यातील अपघातांची संख्या सन २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य व जिल्हास्तरावर रस्तासुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रस्ता सुरक्षा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’वर सुधारणा करण्यात येत आहेत.

अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तात्काळ उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारची ‘पीएमराहत’ योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत व दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघाताच्या वेळी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयाची माहिती मिळू शकते. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘जीवनदूत’ व्यक्तींना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या मते, तंत्रज्ञानाधिष्ठित अंमलबजावणी, कडक कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे राज्यात अपघाती मृत्यू कमी करण्यास यश मिळत असून २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याच्या उद्दिष्टाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे, असे परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.

Home ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव

ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव

मुंबई : कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार  मानले आहेत.

ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव  मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.

मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा  सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुन्या कर्नाक पुलाचे ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतर केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली.

Home बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

नाशिक: मराठीतील विविध बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठीला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे काढले.चौथे विश्व मराठी संमेलन २७ फेब्रुवारीपासून मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या मराठीतील बोली भाषांचा महोत्सवाचे उद्घाटन कर्णिक यांच्या हस्ते महाकवी कालिदास कलामंदिरात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. मिलिंद जोशी, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्र हे साहित्य, कला, संगीताला महत्त्व देणारे राज्य आहे. हजारो वर्षांपासून मराठीतील विविध बोली भाषा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आहेत. बोलींना महत्त्व दिले, तर मराठी भाषा समृद्ध होईल. राज्य शासनाने सुरू केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, मराठी भाषा ही ज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी. बोली भाषांना संजीवनी मिळाली, तर मराठी ही ज्ञानभाषा होईल. बोली समृद्ध झाल्या, तर मराठी भाषा समृद्ध होईल. त्यासाठी बोली भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी. आठवीच्या वर्गापासून भाषा विज्ञान शिकवावे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचे नाशिक हे साहित्य तीर्थ आहे. बोली भाषांचे महत्त्व नाकारून चालणार नाही. बोली भाषा या मराठी भाषेसाठी जीवनवाहिन्या आहेत, असे सांगितले.

यावेळी कर्णिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे,  कवी प्रकाश होळकर, सुरेखा बोऱ्हाडे, रमेश पडवळ, डॉ. प्रतिभा जाधव, विद्या सुर्वे, सुनील ढगे, रवींद्र कदम, डॉ. विजय काकतकर, चारुदत्त दीक्षित आदींचा सत्कार करण्यात आला.

निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ढवळ यांनी आभार मानले. यावेळी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरे संसार संसारने जिंकली मने

बोली भाषा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिणाबाईंची गाणी आणि कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

Home वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके

वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके

मुंबई : आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक आहे. काही मागण्यांवर कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्क देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामुळे लाँग मार्च आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, कामगार, महिला परिचर आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार विनोद निकोले, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव रवींद्र जाधव, सहसचिव मच्छिंद्र शेळके, किसान सभेचे सचिव अजित नवले आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे टीआरटीआयच्या प्र. आयुक्त चंचल पाटील, अपर आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री वुईके म्हणाले, वनहक्क व सामूहिक वनपट्टेधारक आदिवासी बांधवांकडून आदिवासी विकास महामंडळाने लागू असलेल्या शेतमालावरील बोनसचा लाभ द्यावा. तसेच महामंडळाने या आदिवासी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा. ॲग्रीस्टॅकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन धारणाबाबत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचा डाटा घेण्यात यावा. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्यात यावा.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,आदिवासी विकास महामंडळाने किमान आधारभूत खरेदी किमतीवर हिरडा खरेदी करण्यासाठी बाजारपेठ हस्तक्षेप करावा. त्यासाठी खरेदी केंद्र उघडण्यात यावी. सद्यस्थितीत बाजारात असलेल्या किंमतीपेक्षा जास्त आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, अशाप्रकारे हिरड्याची किमान आधारभूत किंमत ठरवावी. अकोले तालुक्यातील आदिवासी गावांमधील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी तांत्रिक बाबींवर सर्वेक्षण करण्यात येईल. या गावांना पाणी उपलबध करून देण्यासाठी शासनाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या मेडीक्लेम योजनेबाबत बांधकाम कामगार, सूचीबद्ध रूग्णालये आणि नियुक्ती एजन्सीमधील संदिग्धता दूर करावी. त्यासाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळाने लेखी सूचना निर्गमित कराव्यात.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, महिला परिचर यांचे मानधनाबाबत मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव आणण्यात येईल. प्रलंबित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, अहिल्यानगरचे पदाधिकारी उपस्थित होते.

Home ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव

ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव

मुंबई: कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार  मानले आहेत.

ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव  मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे.

मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

यासंदर्भात आनंद व्यक्त करताना मंत्री लोढा म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार भारताच्या वसाहतकालीन भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या पाऊलखुणा पुसून भारतीयत्वाचा  सन्मान करणारे आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये महानगरपालिकेने मुंबईतील जुन्या कर्नाक पुलाचे ‘सिंदूर ब्रिज’ असे नामांतर केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरार्थ राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आले होते, अशी माहिती ही मंत्री लोढा यांनी दिली.

Home मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!!

मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!!

मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे.मातृभाषा आपले अस्तित्व असते. बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय आणि वेगळे चैतन्य तसेच लोकजीवनाचे प्रतिबिंब सामावलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना जगातील एका अभिमानास्पद भाषेला आपण ‘माय मराठी’ म्हणतो, याचा आत्मीय अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे.

हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने व्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, माध्यमांमध्ये आणि दैनंदिन संभाषणात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करण्याचा आहे.

वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

२१ जानेवारी २०१३ रोजी मराठी भाषा विभागाने अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. तसेच ३ ऑक्टोबर रोजी राज्यात ‘अभिजात मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. तर दरवर्षी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्यभरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, वाचन उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन्ही दिवसांत राज्यभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी आणि विस्तारासाठी चिंतन करण्याची ही संधी असते. चला, यावर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला समृद्ध करणाऱ्या उपभाषांचा वाटा समजून घेऊया.

विविध उपभाषांचा समृद्ध वारसा

महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथ, महानुभाव आणि वारकरी संत परंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिक व्यापक केले. आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे…तुम्हाला माहिती आहे, श्री चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदास, शूद्रक यांच्या शाकुंतल, मृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोली भाषेत आहेत.

वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, झाडीबोली, खानदेशी, गोंडी, बंजारा, कोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.

जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होते, तशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवा, विस्तार आणि ऊर्जा दिली आहे.

उदाहरणार्थ, वऱ्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’ मध्ये वऱ्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे.तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वऱ्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो. आचार्य प्र.के.अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वऱ्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.

कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जातात, तर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.

उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. ‘अक्का’ हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड-तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वऱ्हाडीमध्ये, झाडीबोलीत हिंदीचे, तर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आहे—स्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची!

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास

उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाषाविषयक स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्राचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. मराठीचा प्रशासनिक, शैक्षणिक आणि सामाजिक वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.

शासन प्रयत्नशील आहेच; परंतु, सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विविध बोलीभाषांचा अभ्यास करून त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. भाषेचे संवर्धन हे केवळ धोरणातून नाही, तर व्यवहारातून होते.

मराठीचा वापर वाढवू या!

‘उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी’  हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असते—विशाल, सामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली.

महाराष्ट्रात येणारा कोणताही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवतो आणि सोबत घेऊन जातो. ‘तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे.

त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..

  • मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार
  • मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे
  • आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे
  • दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर

ही अत्यावश्यक पावले आहेत.

दिवंगत कवीवर्य डॉमिर्झा रफी अहमद बेग यांनी मराठीच्या सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे

मराठीची प्रतिभा, ज्ञानेश्वरीत समावते

ग्रामगीता गाथाही, मराठीतच मावते

लावणीतून मराठीचे, सौंदर्य ओसंडते

शौर्य आणि औदार्य, पोवाड्यातून सांडते

मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले

गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले

अमृताशी पैज जिंकते, मराठी बोली

आभाळाची उंची जिच्यात, समुद्राची खोली

साऱ्यांनी मराठी हुंकारावर डोलावे

मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!

चला… मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलूया..!

Home विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई: हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.

या बैठकीत राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आणि भात व सोयाबीनचे तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

कृषी मंत्री भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, उपलब्ध आकडेवारीवर तत्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती कोणताही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, उपसचिव प्रतिभा पाटील व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!