Home आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहून समन्वयाने काम करा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा. तसेच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी वेळेत पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी. टंचाई निवारण, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व यंत्रणांनी समन्वयाने व संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई व मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. या बैठकीस आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तेथे पाणीपुरवठा नियमित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा. पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी सतत समन्वय ठेवावा. जलस्रोतांची उपलब्धता, विहिरींची स्थिती, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि टँकर व्यवस्थापन याचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील गावे, वस्त्या, वाड्या आणि तांडे येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणी फिरते जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. गावांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर पाण्याच्या टाक्या उभारून त्याद्वारेच पाणी वितरण करावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून प्रत्येक नागरिकाला समानतेने पाणी मिळण्यास मदत होईल. टाक्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे गावनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात यावे आणि त्याच वेळापत्रकानुसार पाणी वितरण करण्यात यावे. पाणी वाटपावेळी तलाठी आणि ग्रामसेवक यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात यावी. पाणी वितरणामध्ये निष्काळजीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने नियमित तपासून त्याचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा. दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत पाणीपुरवठ्यासंदर्भात सुरू असलेल्या योजनांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावेत. नादुरुस्त जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन संवेदनशीलतेने कार्य करावे. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती, पाणीपुरवठा, टँकर व्यवस्थापन तसेच मान्सूनपूर्व तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

#मान्सूनपूर्वतयारी#MonsoonReady2026#अहिल्यानगर#Ahilyanagar#महाराष्ट्रशासन#MahaGov#पाणीटंचाईनिवारण#WaterScarcitySolutions#पालकमंत्री#GuardianMinister#आपत्तीव्यवस्थापन#DisasterManagement#शुद्धपाणीपुरवठा#CleanWaterMission#प्रशासनसज्ज#AdminReadiness#जलसंवाद#WaterManagement#आरोग्यदक्षता#PublicHealthSafety#समन्वय#TeamWork#सुरक्षितमहाराष्ट्र#SafeMaharashtra#लोकहित#CitizenWelfare#नियोजन#StrategicPlanning#पावसाळा२०२६#MonsoonSeason

Home फिर्यादी यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती.

फिर्यादी यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती.

गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून अंदाजे ३५५ स्थानिक व शासकीय कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली.

या पार्श्वभूमीवर आरोपीचा मागोवा घेऊन पुणे येथील एका लॉजमध्ये सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणात आरोपीच्या राहत्या घराची झडती घेऊन सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ₹ ६५,८०,००० मुद्देमाल जप्त केली.

या कामगिरीबाबत नागपूर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते मासिक सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण पुरस्कार मार्च २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.

#आपले_मपो

#DistrictCaseFiles

Home राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ

राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विधानसभा मतदारसंघ

जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ स्थापन करण्याचा शासननिर्णय जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजात अधिक समन्वय, गुणवत्ता सुधारणा आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/201395/

Home विदर्भाच्या विकासाला मोठी गती

विदर्भाच्या विकासाला मोठी गती

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीत ५४७ किमीच्या ४ द्रुतगती महामार्गांना मंजुरी.

एकूण प्रकल्प खर्च ₹५१,९०६ कोटी.

▪️ नागपूर–गोंदिया

▪️ भंडारा–गडचिरोली

▪️ नागपूर–चंद्रपूर

▪️ नवेगाव मोरे–सुरजागड ग्रीन फिल्ड रोड

गडचिरोलीच्या औद्योगिक व खनिज विकासाला मोठी चालना मिळणार. प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

Home भाविकांच्या आरोग्यासाठी जेजुरीतील ‘भंडारा’ वापराबाबत विशेष धोरण निश्चित करणार

भाविकांच्या आरोग्यासाठी जेजुरीतील ‘भंडारा’ वापराबाबत विशेष धोरण निश्चित करणार

भाविकांच्या आरोग्यासाठी जेजुरीतील ‘भंडारा’ वापराबाबत विशेष धोरण निश्चित करणार

Home एमएमआर क्षेत्रात ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ची उभारणी

एमएमआर क्षेत्रात ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ची उभारणी

उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार

#रोजगारनिर्मिती

#सामंजस्यकरार

#digitalmaharashtra

#AIinMaharashtra

#maharashtradevelopment

Home इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा – मंत्री शंभूराज देसाई

इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा – मंत्री शंभूराज देसाई

सातारा : पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, परकीय चलन संवर्धन तसेच ऊर्जा कार्यक्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ   १५ मे २०२६ रोजी होत आहे. या प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत सातारा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. ज्यामध्ये घरातून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्य तेलाचा वापर करणे, रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी करुन नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे आदी बाबींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी  शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याबाबत निर्देश द्यावेत. तसेच एकत्रित दौऱ्यांकरिता कारपूलिंगचा अवलंब करावा, अनावश्यक वाहन वापर टाळावा व इंधन बचतीबाबत जनजागृती करावी. सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले आहेत. या निर्देशांचे काटेकोरपणे पालन सर्व यंत्रणांनी करावे तसेच प्रधानमंत्री महोदयांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच शासनातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पोलीस विभागाने काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कडूकर यांनी यावेळी दिले.

Home उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

नागपूर: हवामान विभागाने विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या (हीट वेव्ह ) पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेच्या लाटेची तीव्रता  विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यात अधिक राहणार असल्याचे जाहीर केले  असून, विभागात करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

हवामान विभागाच्या हीट वेव्ह संदर्भात सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये तसेच विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकारी यांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपायोजना राबवताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड वार्ड तयार करावे तसेच उष्णतेवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधीचा साठा तयार ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

विभागात मे व जून महिन्यात उष्णते संदर्भात अलर्ट लागू राहणार आहे. उष्माघातामुळे विभागात अतिदक्षता घेताना उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार होईल याची खबरदारी घेण्यात यावी, उष्मघातासंदर्भात करावयाच्या उपाययोजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात सेंटर होम सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात यासंदर्भात उपाय योजना लागू करण्यात आल्या असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक चौकात  ग्रीन नेट तसेच आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा, शाळा महाविद्यालय, कोचिंग सेंटर आदींना सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.

नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भात उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, या उपाययोजना 16 जून पर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच गोंदिया जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपायोजनाबद्दल माहिती दिली.

Home सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोलापूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अक्कलकोट येथे आयोजित सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय महामार्ग चे सचिव एस.जी. शेलार, राष्ट्रीय महामार्ग मुंबईचे विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे, तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की 2014 पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 565 किमी होती, ती आता 1750 किमीपर्यंत वाढली आहे. त्यावेळी 52 हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते, त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम वगळले तर सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगून पुढील तीन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यामध्ये जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी 1020 कोटी, अहमदनगर सोलापूर कर्नाटक बॉर्डर पर्यंतच्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग 65 वरील कामासाठी 48 कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी 35 कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत चेन्नई हा महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणारे ठरेल. सोलापूर जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या कामामुळे सोलापूर जिल्हा देशाच्या मध्यभागी येऊन देशाचा लॉजिस्टिक हब बनेल असेही केंद्रीय मंत्रीगडकरी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बुद्ध सर्किट हा 22 हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. बोधिवृक्षाखाली मिळालेला अनुभव त्यांनी भावनिक शब्दांत मांडला. तसेच 12 हजर कोटींचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला असून मार्गावरील 46 तलाव बांधले गेले आहेत.  शेती व जलसंवर्धनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सोलर पंप व ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. पंढरपूर रिंग रोड, सोलापूर रिंग रोड, अक्कलकोट–दुधनी रस्ता यांसारख्या कामांना तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व कामांना मंजुरी दिल्याचे त्यांनी जाहीर केले. विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्व समाजघटकांना समान लाभ मिळावा, हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज भूमिपूजन होत असलेल्या सहा महामार्गामुळे अक्कलकोट येथे येणाऱ्या राज्याच्या विविध भागातील भक्तांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्याने या भागातील विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच अक्कलकोट गाणगापूर, मोहोळ ते वळसंग सोलापूर शहरात साठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

भूमिपूजन होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे : 

हसापूर ते बद्दाड किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंधराशे 52 कोटीचा निधी.

वागदरी – अक्कलकोट – तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण. रस्त्याची लांबी 47.66 कि.मी. असून प्रकल्प खर्च  353 कोटी रुपये आहे.

मोहोळ – बसवनगर – वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 चे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण.  रस्त्याची लांबी 82.00 कि.मी. असून  प्रकल्प खर्च  756 कोटी रुपये आहे.

दुधनी येथे रेल्वे उड्डाण पूल बांधकाम तसेच रा.म.क्र. 150 ई च्या उर्वरित 4.122 कि.मी. रस्त्याचे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण करण्यात येणार असून प्रकल्प खर्च 97 कोटी रुपये आहे.

रा.म.क्र. 150 ई अंतर्गत बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून लांबी 0.75 कि.मी. असून प्रकल्प खर्च  26 कोटी रुपये आहे.

या सर्व प्रकल्पांची एकूण लांबी 171 कि.मी. असून एकूण प्रकल्प किंमत 2784 कोटी रुपये आहे. या विकासकामांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे फायदे… प्रस्तुत पॅकेज सुरत चेन्नई ग्रीन फील्ड कॉरिडॉरचा एक भाग आहे. यामुळे 390 किलोमीटर आणि सहा तासाच्या प्रवासाच्या वेळेचे बचत होणार आहे. वन्यजीव संरक्षण उपायोजनामुळे प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री होईल. अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 ह एक भाग सोलापूर साठी अतिरिक्त रिंग रोड म्हणून काम करेल. वाहतूक कोडी प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा वापर कमी होईल. सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन उद्योग आणि रोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार आहे.

प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने सहा महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रास्ताविक महामार्ग प्राधिकरणचे सचिव एस.जी. शेलार यांनी करून रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरण मार्फत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची तसेच आज भूमिपूजन होत असलेल्या सहा कामांची माहिती दिली. मुंबईतील महामार्ग प्राधिकरण चे आर्थिक सल्लागार संजय जयस्वाल यांनी आभार मानले.

Home पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोलापूर:  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर,  श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते जाळे  मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोचण्यास भाविकांसाठी सुलभ झाले आहेत. श्री विठ्लाच्या दर्शनासाठी पालखी घेऊन येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वेगळा रस्ता केला आहे. यामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी  केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,  माजी आमदार राम सातपुते,  जिल्हाधिकारी  कार्तिकेयन एस , पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, सचिन इथापे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी तसेच अधिकारी, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री  गडकरी म्हणाले, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे रस्ते यापूर्वी मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. त्यामुळे वारकरी भाविकांना वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या मार्गावरील रस्ते करण्याची संधी मिळाली तर ते रस्ते चांगले कर अशी इच्छा माझ्या आईनी व्यक्त केली होती. पांडुरंगाच्या व आईच्या आशीर्वादाने मला रस्ते करण्याची संधी मिळाली. सद्या पालखी महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येतील.  पालखी महामार्गावरील काही ठिकाणची रखडलेली कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील. तसेच वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून काही परवानगी आलेल्या नाहीत त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून माळशिरस तालुक्यातील घुले वस्ती या ठिकाणी पालखी महामार्गात विशेष रचना  करून पुरातन विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले.  तसेच पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील बाजीराव विहिरीचे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जतन व संवर्धन करण्यात आले आहे. या दोन्ही विहिरींची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील  करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसने प्रवास करत  पालखी महामार्गाची केली पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा, महानगरात मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन केले. मोदींच्या आवाहनानुसार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी बसने प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आपल्या  ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुरक्षा कर्मचारी, अधिकारी यांच्यासह बसने प्रवास केला.

error: Content is protected !!