Home दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील ८६४ लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे.

दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील ८६४ लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे.

इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.१९२० च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या, इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. मात्र, या चाळींचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही; तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास चार दशके येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घराच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून, बीडीडीवासीयांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

#बीडीडीचाळपुनर्विकास

#BDDChawlRedevelopment

Home मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

‘पाणी फाउंडेशन’ ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. राज्य शासना समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात मदत केली. यापुढेही फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, तसेच अमित चंद्रा, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

काही हवामानविषयक संस्थांच्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याने राज्यात ८० टक्के पाऊस होईल, असे गृहीत धरून जलसंधारण च्या कामांचे नियोजन करावे. पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षीही शेतकरी, ग्रामस्थ जलसाक्षर होतील. पाण्याचे महत्त्व ओळखून फाउंडेशन करत असलेल्या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. फाउंडेशन राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी, त्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

#पाणीफाउंडेशन#PanniFoundation

Home केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण

केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण

वेबसाईटवर सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेची गुणपडताळणी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली असून, दोन्ही प्रक्रिया उमेदवारांना विशिष्ट मुदतीत पूर्ण करावयाच्या आहेत.

या परीक्षेची गुणपडताळणी/रिस्पॉन्स शीट ही https://mscepune.in/DTEDOLA/KP2026 ResponseSheet.aspx या लिंकवर १६ ते ३१ मार्च पर्यंत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- असून ते सदर लिंकद्वारे भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Home यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.

भविष्यातील वाहतुकीचा विचार करून येथे नवीन कामे करण्यात येतील, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिले.

विधानसभालक्षवेधी

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्याबाबत राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली आहे. हा विषय एमआयडीसीच्या संचालक मंडळासमोर मांडून निर्णय घेणार असल्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

विधानसभालक्षवेधी

परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब रुग्णांसाठी राखीव १५ टक्के खाटा उपलब्ध करून न दिल्याबाबत राज्य शासनाने कडक भूमिका घेतली असून रुग्णालयावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शासनाने विहित केलेल्या अटींचे पालन न केल्यामुळे रुग्णालयाला देण्यात आलेली अतिरिक्त एफएसआय सवलतही काढून घेण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/194341/

Home गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत आढावा घेण्यात आला.

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत आढावा घेण्यात आला.

पोलीस ठाणे निर्मितीबाबत सुधारित धोरण तयार करण्यास गती देण्यात यावी, नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करताना अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता, पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढणारा कामाचा ताण यामुळे वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस आमदार सर्वश्री समीर कुणावार, अमोल पाटील, सुहास बाबर तसेच विशेष पोलीस निरीक्षक सुवेज हक, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील देवगाव, सांगली जिल्ह्यातील खानापूर तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचा भुसावळ उपविभागात समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Home नंदुरबार जिल्हा परिषदेचे ३६ कोटी ९९ लाखांचे ‘शिलकी’ अंदाजपत्रक सादर; विकासावर मुख्य भर!

नंदुरबार जिल्हा परिषदेचे ३६ कोटी ९९ लाखांचे ‘शिलकी’ अंदाजपत्रक सादर; विकासावर मुख्य भर!

नंदुरबार: जिल्हा परिषदेच्या प्रशासकांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३६ कोटी ९९ लाख रुपयांचे विकासकामांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या असल्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी हे अंदाजपत्रक सोमवारी (दि. १६ मार्च) मांडले.

अंदाजपत्रकाचे आर्थिक गणित

प्रशासनाने सादर केलेल्या या अंदाजपत्रकात उत्पन्नाचा अंदाज ३७ कोटी २४ लाख रुपये धरण्यात आला असून, त्यापैकी ३६ कोटी ९९ लाख रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच हे अंदाजपत्रक २४ लाख ४४ हजार रुपयांच्या शिलकीचे आहे.

विभागांनुसार करण्यात आलेली तरतूद (प्रमुख हायलाइट्स):

• बांधकाम विभाग: ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी १० कोटी ८० लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः संपर्क विरहित गावांना जोडण्यासाठी ‘साकव’ उभारणीवर भर देण्यात आला आहे.

• शिक्षण विभाग: जिल्ह्यातील ११५ वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

• आरोग्य विभाग: आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि औषध खरेदीसाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिल्या जातील.

• पाणी पुरवठा: अंदाजपत्रकानुसार ९ हजार ५५० घरांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

• समाजकल्याण: मागासवर्गीय वस्त्यांमध्ये दिवाबत्तीची सोय आणि ५५० दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत उपकरणे पुरवण्यासाठी निधी राखीव ठेवला आहे.

• पशुसंवर्धन व कृषी: पशुधनाचे लसीकरण, वंध्यत्व निवारण आणि कृषी विभागासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद आहे.

उत्सव आणि पर्यटनाला बळ

नंदुरबारच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यासाठी काठी होळी उत्सव, सारंखेडा यात्रोत्सव आणि तोरणमाळ महोत्सव या ठिकाणी नागरी सुविधा व आवश्यक व्यवस्था राखण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या अंदाजपत्रकीय सभेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. २०२५-२६ च्या सुधारित अंदाजपत्रकासह आगामी वर्षाच्या नियोजनाला यावेळी मंजुरी देण्यात आली.

#Nandurbar#ZillaParishad#Budget2026#RuralDevelopment#MaharashtraNews#Development#NandurbarNews#नंदुरबार#जिल्हापरिषद#अंदाजपत्रक#विकासकामे

Home बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील मध्यमवर्गीयाच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगून बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरे विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता यामध्ये अनेक अडचणी होत्या. यामुळे राज्य शासनाने निर्णय घेतला की, व्यावसायिक बिल्डरवर भरवशावर अवलंबून न राहता हा प्रकल्प राज्य शासन करेल. देशातील सर्वोत्तम कंपन्यांना हे काम देऊन हा प्रकल्प उत्तमरित्या तयार झाला. मुंबईतील इतर पुनर्विकासाचे काम वेगाने झाले पाहिजे यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू असून २०२९ पर्यंत सर्व घराच्या चाव्या रहिवांशाना  देण्याचो उद्द‍िष्ट्य आहे.

नायगाव, वरळी या ठिकाणची कामे अतिशय सुंदर झाली आहेत. बीडीडी येथील रहिवांशाना  सर्व पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. नायगाव येथील पार्किंगच्या समस्येबाबत मार्ग काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या ठिकाणी असलेल्या भवानी माता मंदिराबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी ९०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे. बीडीडी चाळीला फार मोठा इतिहास आहे अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नवरत्नांची खाण या बीडीडी चाळीत राहिलेली आहे. यावर पुस्तक लिहिले पाहिजे असा मानसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील अनेक ठिकाणी चाळीत राहणाऱ्या नागरिकांना अडचनिंचा सामना करावा लागतो. सामान्य माणसामुळे मुंबई आहे. संस्कृती जपणारा मुंबईकर आहे. मुंबईतील व्यक्तींना मुंबईतच घर मिळाले पाहिजे. जेवढे प्रकल्प हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या घराच्या किमतीच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तो सोडवला जाईल, तसेच यासाठी लागणारे समग्र धोरण तयार करावे लागेल. २०१६ मध्ये पोलिसांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी धोरण आणले आहे, त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच यासाठी कायदेशीर व्यवाहारिक मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुर्नविकासाबाबत मुंबईमधील जवळपास एक हजार एकरचे पुर्नविकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात मुंबई बदलणार आहे सामान्य माणसाला घर मुंबईत मिळणार आहे. सामान्य माणसाचे जीवनात बदल घडवून राज्य शासन प्रयत्नशील आहे. बीडीडी वासीयांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार असून नागरी पुनरुत्थानाच्या दृष्टीने आशिया खंडातील पहिला व सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या १६० चौ. फूट घरांऐवजी रहिवाशांना सुमारे ५०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त टू बीएचके सदनिका विनामूल्य देण्यात येत आहेत.सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस आहे. बीडीडीमध्ये राहणारे आता टॉवर मध्ये राहणार. किती तरी वर्षाची त्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे. या चाळीमध्ये पिढ्यान् पिढ्याचा स्वतःचा लढा, अनुभव,  भावनिक, सांस्कृतिक ऋणानुबंध बांधले गेले आहेत. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर, सुख-सुविधा मिळाले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. १९ तारखेला गुढी उभारण्याचा आनंद येथील रहिवाशांना मिळणार आहे. पोलीस उन्हातानात आपली कर्तव्य बजावत असतात त्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बीडीडी मधील रहिवाशांचा १२ वर्षाचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे. बाहेर फेकला गेलेला मुंबईकर मुंबईत परत आणण्याचे काम अशा प्रकल्पाच्या माध्यमातून हे राज्य शासन करत आहे. क्लस्टर, एसआरए सारख्या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरे मिळत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रासाठी शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतला असून गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून ७० कोटींची गुंतवणूक व तीस लाख लोकांना पर्यावरण पूरक घरे उपलब्ध होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

८६४ लाभार्थ्यांना हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द हा सुवर्णक्षण – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जवळजवळ चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

1920 च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या, इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. मात्र, या चाळींचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही; तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास चार दशके येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घराच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून, बीडीडीवासीयांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,  सभापती प्रा. राम शिंदे, अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा ॲङ आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर रितू तावडे, आमदार चित्रा वाघ, कालिदास कळमकर, मनीषा कायंदे, सिद्धिविनायक न्यायाचे अध्यक्ष सदा सरवणकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य अधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळचे मिलिंद बोरीकर यांनी मानले.

Home विधानसभा कामकाज

विधानसभा कामकाज

मुंबई: राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला मंत्री पाटील यांनी उत्तर दिले.

मंत्री पाटील म्हणाले की, २००१ मध्ये राज्य सरकारने नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के तर मुलींना १०० टक्के सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा खर्च भागवला जात असल्याने सध्या अनुदानित धोरणात बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यातील १२०० अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५४०० प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

२००१ पूर्वी स्थापन झालेल्या ७८ महाविद्यालयांना अनुदान दिल्यास राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचा अहवाल तयार करून वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

सदस्य जयंत पाटील यांनी जाहिरातीवरील खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, २०२० मध्ये जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात २०२२ पासून सुरू झाली. २०२२ ते २०२५ या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्यात राज्य देशात आघाडीवर आहे. या धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहिराती आवश्यक होती. त्यामुळे जाहिरातीवर खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Home सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका असल्याचे यावेळी सांगितले.

तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्री सरनाईक यांनी एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले. या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या भावना तीव्र असून, या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या.

सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटीचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम करताना चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य व पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत एस.टी. प्रशासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याची महामंडळाची भूमिका आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. त्यामुळे एसटी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सामोपचाराने तोडगा काढावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

Home राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली: साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या  पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, साहित्यिक समीक्षा, आत्मकथा आणि संस्मरण अशा विविध साहित्य प्रकारांतील विविध पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साहित्यकृतींना तज्ज्ञांच्या समितीद्वारे निवडण्यात आले आहे. मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी नियुक्त परीक्षक मंडळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले, नागोराव तम्माजी उटकर आणि राजन गवस यांचा समावेश होता.

साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार २०२५-भाषा, पुस्तक व लेखक पुढीलप्रमाणे :

असमिया – कड़ि खेलर साधु (उपन्यास) – देवब्रत दास

बांगला – श्रेष्ठ कबिता (कविता) -प्रसून बंदोपाध्याय

बोडो दोंनै लामाः मोनसे गाथोन (उपन्यास) – सहायसुलि ब्रह्म

डोगरी -‘ठाकुर’ सतसई (कविता, दोहे) – खजूर सिंह ‘ठाकुर’

इंग्रजी – क्रिमसन स्प्रिंग (उपन्यास) -नवतेज सरना

गुजराती – भट्टखडकी (कविता) – योगेश वैद्य

हिंदी – जीते जी इलाहाबाद (संस्मरण) – ममता कालिया

कन्नड -दडा सेरिसु तंदे* (कहानी) – अमरेश नुगडोणी

काश्मीरी – नजदावनेकी पॉट अलाव (कविता) – अली शैदा

कोंकणी – कोंकणी काव्यें: रुपां आनी रूपकां (आलोचनात्मक निबंध) -हेनरी मेंडोनका (एच. एम. पेरनाळ)

मैथिली – धात्री पात सन गाम (संस्मरण) – महेन्द्र

मलयाळम् – मायामानुष्यर (उपन्यास) – एन. प्रभाकरन

मणिपुरी – कंगलमद्रीब इफुत (कहानी) – हाओबम नलिनि

मराठी – काळ्यानिळ्या रेषा (आत्मकथा) – राजू बाविस्कर

नेपाली -नेपाली पारम्परिक संस्कृति र सभ्यताको ढुकुटी (निबंध) -प्रकाश भट्टराई

ओड़िआ – पदपुराण (कविता) – गिरिजाकुमार बलियारसिंह

पंजाबी – सेफ्टी किट (कहानी) -जिंदर

राजस्थानी -भरखमा (कहानी) – जितेंद्र कुमार सोनी

संस्कृत -प्रस्थानचतुष्टये ब्रह्मघोषः (कविता) – महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

संताली – मिड बिर्ना चेनने साओन इनाग सागई (कहानी) -सुमित्रा सोरेन

सिंधी – वाघू (कहानी) – भगवान अटलानी

तमिळ – तमिळ सिरुकथैयिन थडंगल (साहित्यिक आलोचना) – सा. तमिळसेलवन

तेलुगु -अनिमेष (कविता) – नंदिनी सिद्धरेड्डी

उर्दू -सफ़र जारी है (कविता) -प्रितपाल सिंह बेताब

error: Content is protected !!