आज नवी दिल्ली येथील शास्त्री भवनात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री व रावेर लोकसभा खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी NHAI अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा व उत्तर महाराष्ट्रातील #नंदुरबार, #धुळे, #जळगांव जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीसाठी तसेच कृषी आणि व्यापार क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.
प्रकल्पाच्या गतीसाठी घेतलेले निर्णय…
डिझाईनच्या अंतिम टप्प्यास गती देण्याचा निर्देश
शेतकऱ्यांना जमिनीच्या भरपाईसाठी तत्काळ कार्यवाही
महामार्गामुळे केळी क्लस्टर आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे!
शेती, व्यापार आणि विकासासाठी नवे दार उघडणार!
#राष्ट्रीयमहामार्ग#विकसनशीलमहाराष्ट्र#अंकलेश्वर_बुरहानपूरमहामार्ग#रक्षा_खडसे#शेतीतेविकास#वाहतुकीसाठीनवेयुग#NHAI#RoadToProgress#HighwayDevelopment#InfrastructureGrowth#KisanVikas#AtmanirbharBharat#JalgaonDevelopment#BurhanpurHighway#NHdevelopment