
कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. मिराताई खडतकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोले, माजी प्र-कुलगूरु योगानंद काळे, उपेंद्र कोठेकर, माजी आमदार अरुणभाऊ अडसड, चैनसुख संचेती व मान्यवर उपस्थित होते.
सुमतीताईंनी जपलेला संघर्षाचा बाणा हा विसरता येणार नाही. त्या लढत राहिल्या. त्यांनी रणांगण सोडले नाही. एखादा नंदादीप तेवत ठेवावा तसे त्यांनी योगदान देऊन आमच्या यशाचा मार्ग सुकर केला, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.















