
नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘मूळवाट’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तोरणमाळ परिसरात स्थानिक नागरिकांना रोहयो (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत विविध रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे — स्थानिक लोकांना त्यांच्या मूळ गावीच कामाची संधी उपलब्ध करून देणे, स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत तोरणमाळ परिसरात जलसंवर्धन, माती संवर्धन, वृक्षारोपण, शेततळी निर्मिती, व ग्रामीण विकासाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्माण होऊन, मजुरांचे बाहेर स्थलांतर कमी करण्यास हातभार लागणार आहे. प्रशासनाने रोहयो अंतर्गत चालू असलेल्या कामांची माहिती ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.
तोरणमाळ परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ‘मूळवाट’ या जिल्हास्तरीय जनउपक्रमाला साथ द्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
.
.
.
#MoolVaat#RojgarHamiYojana#Toranmal#NandurbarDevelopment#MGNREGA#StopMigration#LocalEmployment#RuralEmpowerment#TeamNandurbar#CollectorOfficeNandurbar















