Home महाराष्ट्र आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे...

आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ८० टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग यावर विशेष भर देण्यात आला आहे.

1
Today is a historic day in the history of Maharashtra. The government has cleared about 80 percent of the pending cases on compassionate grounds and has laid special emphasis on transparency and speed in the recruitment process.

शासनाने तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच १० हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

“प्रत्येक फाईल, प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक निर्णयामागे एक जिवंत कथा असते. त्यामुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा हे तीन शब्द प्रत्येक कर्मचाऱ्याचे मार्गदर्शक असले पाहिजेत.” नवनियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांनी ई-गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचे, लोकाभिमुख कारभार करण्याचे आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

#राज्यरोजगारमेळावा