
उपविभागीय अधिकारी (IAS) मा. अंजली शर्मा यांनी आज बाल कल्याण समिती, नंदुरबार येथे भेट देऊन सखोल पाहणी केली. बालसुरक्षा, निवारा, पुनर्वसन व मूलभूत सुविधा या सर्व बाबींचा त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आढावा घेतला.
मा. अंजली शर्मा यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत, बालकल्याण समितीचे कार्य हे जिल्ह्याच्या संवेदनशील जबाबदाऱ्यांपैकी एक असून बालकांच्या हक्कांचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्याने करण्यात यावे, असे स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.















