
आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.
मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके पूर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी २ आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी १ पथक तसेच मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण ६ पथके सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी २ आणि नांदेड, गडचिरोलीत पथके तैनात आहेत.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/206295/















