
कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, भूमी अभिलेख उपसंचालक, निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.















