Home शेती कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर मात...

कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रभावी ठरू शकते.

0
Artificial intelligence (AI) can be effective in overcoming the challenges of climate change, water scarcity, and income uncertainty in the agricultural sector.

पार्श्वभूमीवर एआयच्या साहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधन नेटवर्क उभारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक कृषी संशोधन नेटवर्क उभारणी या विषयावर परिसंवाद झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी. वेंकटेश्वरलू यांनी या परिसंवादाचे समन्वयन केले.

या परिसंवादामध्ये कृषी आयुक्त सूरज मांढरे, नवोन्मेष कार्यालयाचे संचालक व्हिन्सेंट मार्टिन, नेदरलँड्स येथील द हेग, अॅकग्ट्युअलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सरबजना यांनी विचार मांडले. हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

#AIforAgri2026

#AIAIC