अंधेरी येथून इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेचा आरंभ झाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यपालांनी रथावर आरूढ भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडून स्वच्छ केले.
रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे. पूर्वी जगन्नाथ पुरी तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला. जो इतरांचे दुःख, कष्ट जाणतो त्यालाच ‘वैष्णव’ असे म्हणतात. भक्तीला कृतीची जोड दिल्यास ती ईश्वरीय सेवा होते. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य भक्तीने केल्यास ती सेवा ठरते – राज्यपाल
यावेळी मंत्री नितेश राणे, खासदार हेमा मालिनी, आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. सूरदास, इस्कॉन जुहूचे अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
















