राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार तालुक्यातील असाणे येथे विविध जनहितकारी उपक्रमांसह विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री. रवी मोरे, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक (LDM) श्री. नंदकुमार पैठणकर, समितीचे अध्यक्ष, सचिव, सभासद तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाबार्डच्या वतीने ग्रामस्थांना सौर दिव्यांचे (Solar Lamps) वाटप करण्यात आले. तसेच माती परीक्षण करून घेतलेल्या शेतकऱ्यांना मृदा आरोग्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. रवी मोरे यांनी नाबार्डच्या गेल्या ४५ वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण विकास, कृषी क्षेत्र, स्वयं-सहाय्यता गट, शाश्वत शेती, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रांमध्ये नाबार्डने केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नाबार्ड सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. नंदकुमार पैठणकर यांनी बँकिंग व्यवस्थेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण विकास, कृषी कर्जपुरवठा, स्वयंरोजगार, बचत आणि आर्थिक सक्षमीकरणामध्ये बँकांची भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक नागरिकाने औपचारिक बँकिंग व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान सायबर फसवणुकीपासून बचाव, बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, यूपीआय पिन आणि वैयक्तिक बँकिंग माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास DSC NGO चे श्री. शामकांत पाटील, समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#NABARD45#Nandurbar#RuralDevelopment#FinancialInclusion#SoilHealthCard#SolarLamps#TreePlantation#CyberSafety#SustainableDevelopment#BankingAwareness#NABARDIndia#NandurbarDistrict
















