
आपत्तीच्या काळातील तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचे पुनर्वसन यासाठी सक्षम व सुसूत्र यंत्रणा’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र प्र. चव्हाण यांची निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत शुक्रवार, १, शनिवार, २ आणि सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन एआयआर (News On AIR) या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात हीच मुलाखत मंगळवार, ५ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसारित होणार आहे.















