(नंदुरबार) ग्रामविकास, लोकसहभाग आणि प्रभावी प्रशासनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट सरपंचांचा ‘लोकमत सरपंच अवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला. रविवारी आयोजित या विशेष सोहळ्यात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, आमदार राजेश पाडवी, ‘लोकमत’ समूहाचे अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विकासकामे, स्वच्छता, जलव्यवस्थापन, सामाजिक उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून आदर्श कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोकमत’तर्फे उत्कृष्ट सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
या गौरवामुळे ग्रामविकासासाठी कार्यरत लोकप्रतिनिधींना प्रेरणा मिळून ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#LokmatSarpanchAward#Nandurbar#GramVikas#SarpanchAward#DrMittaliSethi#NamanGoyal#RajeshPadvi#RuralDevelopment#GoodGovernance#नंदुरबार#लोकमतसरपंचअवार्ड#ग्रामविकास#उत्कृष्टसरपंच#जिल्हाप्रशासन#ग्रामीणविकास