NandurbarNews
शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे. शासनस्तरावर ज्या काही योजना आहेत त्या शेतक-यांना समजावून...
‘टेक-वारी २.०’ चा शुभारंभ; १० लाख कर्मचाऱ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणाची ऐतिहासिक झेप
मुंबई : सामान्य प्रशासन विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाद्वारे आयोजित ‘टेक-वारी २.० – महाराष्ट्राचा तंत्रज्ञान शिक्षण सप्ताह’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
मंत्रिमंडळ निर्णय
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत स्पर्धा परीक्षा तयारीला...
आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि डिजिटल साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया अधिक भक्कम होत आहे.
ग्रामीण भागातील ज्ञानप्रवासाला नवी उभारी देत उज्ज्वल भविष्य घडविण्याचा...
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी डॉ....
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; अर्जांच्या तात्काळ निपटाऱ्याचे निर्देश
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी मा.डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली – डिजिटल शिक्षणाकडे नवी झेप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुजर भवाली येथे इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) आणि HDFC बँक यांच्या CSR निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचे...
लेगापाणी येथे बांबू विक्रीचा दुसरा यशस्वी प्रयोग; महिलांच्या पुढाकारातून रोजगार निर्मितीला...
(नंदुरबार) तोरणमाळ येथील तोरणादेवी जंगल प्रोड्युसर कंपनी आणि लेगापाणी येथील सामूहिक वन संसाधन व व्यवस्थापन समिती (CFRMC) यांच्या संयुक्त प्रयत्नातून बांबू विक्रीचा दुसरा प्रयोग...
सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच ‘टेक-वारी’! – मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई: तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे...
टेक वारी अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद
मुंबई : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक–वारी २.० अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी–कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ढोलकी, संबळ या वाद्यांच्या स्वरनादाचा आनंद घेतला.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकी–संबळच्या ठेक्यांनी परिसर दणाणून गेला. कलाकार निलेश परब (ढोलकी–संबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.तालरंग कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारी–कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
टेक वारी २.० या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. तसेच तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळगीत व कोळीगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













