
कोल्हापूर: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांचे शेतीवर विशेष प्रेम असल्यामुळे ते शेवटपर्यंत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्यावतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.















