महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’
परिमंडलातील ५० उपविभागीय कार्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित केले जाणार असून, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ग्राहकांना आपल्या तक्रारी व समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. या शिबिरामध्ये वीजबिलातील तक्रारी, वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या, मीटर, वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच सध्या ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज व संभ्रम दूर करून, स्मार्ट मीटरची कार्यपद्धती आणि फायदे याबाबतही माहिती देण्यात येणार आहे.
ग्राहकांनी आपल्या संबंधित महावितरण उपविभागीय कार्यालयात आयोजित ‘ग्राहक समाधान शिबिरा’त सहभागी नोंदवून आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १
दिवस : प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार
स्थळ : संबंधित उपविभागीय कार्यालय

