जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा; लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य उपलब्ध करण्यावर भर
नियमित धान्य वाटप सुरळीतपणे पार पाडणे, लाभार्थ्यांची e-KYC प्रक्रिया गतीने पूर्ण करणे, मयत लाभार्थ्यांची नावे वगळणे, साखर वाटपाची अंमलबजावणी, नो-नेटवर्क क्षेत्रातील रास्तभाव दुकानांची तपासणी, शिधापत्रिकांशी मोबाईल क्रमांक संलग्न करणे तसेच पुनर्वसन गावांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विभागांतर्गत सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देत, कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश दिले.
तसेच अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांची शिधापत्रिकेसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

