शहाद्यात वाद मिटवायला गेलेल्या कापड दुकानदारावर जीवघेणा हल्ला; १४ जणांवर गुन्हा दाखल
वाद मिटवणे पडले महागाततळोदा तालुक्यातील बोरद येथील संभाजीनगरचे रहिवासी असलेले रवींद्र संजय पाटील (वय २७) यांचे कापड दुकान आहे. ते शहादा शहरातील जुन्या पोस्ट गल्लीतील ‘मिना कलेक्शन’ या दुकानासमोर असलेल्या गोदामात कारपेट खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे काही लोकांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एक सुजाण नागरिक म्हणून रवींद्र पाटील हा वाद मिटवण्यासाठी आणि संबंधितांची समजूत काढण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, वाद घालणाऱ्या टोळक्याने त्यांचाच राग मनात धरला.लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि गळा आवळण्याचा प्रयत्नसमजूत काढायला गेलेल्या रवींद्र यांच्यावर तब्बल १४ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. त्यांना अत्यंत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत, त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा थेट प्रयत्न केला. या अनपेक्षित आणि जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.१४ जणांवर गुन्हे दाखल, पोलीस तपास सुरूया धक्कादायक घटनेनंतर जखमी रवींद्र संजय पाटील यांनी तातडीने शहादा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फराईझखान फिरोजखान, शाहरुख खान हैदरखान, मोईन आबिद शेख, अनस शेख शकिल शेख, फैजान खान हैदर खान, अदनान अहमद, अस्लम उर्फ पुप्या शेख, मोईद सैय्यद, समिर शेख जलील शेख उर्फ जब्बार सरकार आणि इतर पाच अनोळखी इसम (सर्व राहणार शहादा) अशा एकूण १४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९, ११५, १८१ (१) (२), १९०, ३५२, आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोनवणे करत आहेत.

